Posts

Showing posts from November, 2019

चाइल्डहूड ट्रॉमा

लाडू हवाय? न्यूरॉलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे पुणे / मुंबई तो जन्मला तेंव्हाच इतका गुटगुटीत आणि गोड दिसायचा, की सगळे त्याला "लाडू" नावानंच हाक मारायचे. आईवडील अतिशिक्षित आणि दोघांकडेही गूगल असल्यानं त्यांनी सखोल गूगलवाचन करून लाडूला सर्वोत्तम पालक आणि शिक्षण द्यायचा निर्धार केला. खूप वादविवाद झाले त्यांचे, पण लाडूसमोर मात्र त्यांनी कधीही एकमेकांवर आवाज वाढवला नाही. त्यामुळे भांडण, वादविवाद, आवाज वाढवणे हे प्रकारच लाडूला कधीही पहायला, अनुभवायला मिळाले नाहीत. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत असा लाडू हळूहळू मोठा होऊ लागला.  फक्त स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्नच त्याला मिळावं यासाठी त्याचे मॉम-डॅड सदैव सतर्क असायचे. लोक खातात तसा कचरा आपण खात नाही याचा अभिमान लाडूला वाटायचा. अनेक वेळेस त्याला शाळेतल्या मित्रांबरोबर ते सगळे तेलकट, तुपकट, स्पायसी पदार्थ खावे वाटायचे, विशेषतः पाणीपुरी, कचोरी वगैरे, पण त्यातील बॅक्टेरिया आणि व्हायरसेसची त्याला भीती वाटायची म्हणून तो ती इच्छा मारून ते विचार सोडून द्यायचा. पण याचा राग हळूहळू त्याच्या मनात घर करायला लागला. हे "बेशिस्त जगणारे लोक" आपल्यापेक्...

सेवा निवृत्तीनंतर

*मी कोण होणार ( सेवा निवृत्तीनंतर )* निवृत्ती नंतर काय ? हा प्रश्र्न मी खूप लोकांना विचारलं तर सर्व साधारण असं उत्तर मिळायच वाचन, टीव्ही बघणार,  फिरायला जाणार वगैरे वगैरे.  पण कोणाकडेही ठाम उत्तर नव्हतं व कोणाचीही मानसिक तयारी नव्हती की ते नेमकं काय करणार आहेत. आपण नोकरी करत असताना एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. सकाळी उठायच ऑफिसला जाययच परत संध्याकाळी घरी आल्यावर टीव्ही पाहणे झोपणं व परत दुसऱ्या दिवशी तेच करायचं. जसं सर्कसमध्ये घोडा एका रिंगणात गोल गोल फिरतो तसं. या काळात आपण १२-१४ तास घराच्या बाहेर असतो. निवृत्ती नंतर अचानक १२ -१४ तासांची पोकळी निर्माण होते व ती कशी भरून काढायची हा मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. निवृत्तीनंतर सुरुवातीचे एक दोन महिने घरी कौतुक होत पण नंतर नंतर घरचेही कंटाळतात कारण घरी बसून काही काम नसल्यामुळे सारखी भूक लागते किंवा चहा प्यावसा वाटतो. तेव्हा घरचे म्हणतात आॅफीसमध्ये जात होते ते बरं होतं हा त्रास तरी नव्हता सकाळी डबा भरून दिल की झालं. कारण आपण निवृत्त असतो. आपल्याला काम नसतं पण आपण ऑफिसला गेल्यावर त्यांना त्यांची काम असतात त्यामध्ये आपण व्यत्यय आणत असत...

सुरक्षित अन्न

*शेतमालातील रासायनिक अंश : समस्या आणि उपाय* 💥 “हल्ली टोमॅटो, पत्ताकोबी, कोबीफ्लॉवर या फळभाज्या जनतेच्या लाडक्या बनलेल्या आहेत. मात्र, माझा एक शेतकरी मित्र टोमॅटोला ‘विषाचा गोळा’ म्हणतो, कारण टोमॅटो पिकावर अनेकवेळा म्हणजेच आठवड्यातून दोनदासुद्धा विषारी रसायनांची फवारणी केली जाते. मिरची, आलं, काकडी, कोबी इत्यादी भाज्यांचे आणि द्राक्ष, सफरचंदसारख्या फळांचेही थोड्याफार फरकाने असेच असते...” ‘मॅगी’ या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांबाबत देशात भरपूर चर्चा झाली आणि आजही सुरू आहे. मात्र, घराघरांतील उदरभरण हे मॅगी किंवा इतर फास्टफूडपेक्षाही स्वयंपाकघरात शिजवलेल्या विविध अन्नपदार्थांतूनच होते. स्वयंपाकासाठी ज्या भाज्या, धान्य, डाळी, तेल, मीठ वापरले जाते, त्यातही मानवी आरोग्यास घातक असणारे घटक असू शकतात. अगदी विषाचे अंशही असू शकतात. त्याबाबत मात्र कुणीही बोलताना दिसत नाही. शेतात, धान्य साठविणार्‍या गोदामात, प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी अन्नपदार्थांमध्ये विविध कारणांसाठी मिसळले जाणारे रासायनिक घटक दुर्लक्ष करण्याजोगे निश्‍चितच नाहीत. हल्ली टोमॅटो, पत्ताकोबी, कोबीफ्लॉवर या फळभाज्या जनतेच्या लाड...

पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक

पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक करा* 💳 पीएफ कर्मचाऱ्यांना, पीएफ अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक आहे. EPFOने आधार कार्ड पीएफ अकाऊंटला जोडण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत सहजपणे आधार क्रमांक पीएफ अकाऊंटशी जोडता येऊ शकतो. 💳 पीएफ अकाऊंट आधारशी जोडल्यानंतर पीएफ अकाऊंट होल्डरला त्याच्या PFसंबंधी सर्व अपडेट्स मिळू शकतात.  *📌आधारशी असं लिंक करा पीएफ अकाऊंट :* 💳 पीएफ अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी EPFOची वेबसाइट www.epfindia.gov.in वर लॉग इन करा 💳 लॉग इन केल्यानंतर Online Services मधून e-KYC Portal वर क्लिक करा. त्यानंतर link UAN aadhar वर क्लिक करा. 💳 एक नवीन पेज ओपन होईल, त्यात UAN नंबर आणि UAN अकाउंटवरुन रजिस्टर्ड मोबाइल नंबर अपलोड करावा लागेल. 💳 तुमच्या मोबाईल नंबरवर OTP नंबर येईल. OTP बॉक्समध्ये ओटीपी नंबर भरल्यानंतर, खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा १२ अंकी आधार क्रमांक भरा. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर समोर प्रोसिड टू OTP व्हेरिफिकेशन ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करा.  💳 पुन्हा एकदा आधारची माहिती व्हेरिफाय करावी लागेल. माहिती व्हेरिफाय झा...

रुग्णाच्या नातेवाईकांना मदतीचा हात

पुण्यात यांची सेवा ऊपलब्ध आहे रुग्णाच्या नातेवाईकांना मदतीचा हात आज कालच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेकांनी "स्मॉल एँड स्वीट" म्हणुन छोट्या कुटुंबाला प्राधान्य दिलेल आहे.. आजी/आजोबा, सुन/मुलगा आणि एखाद नातवंड  अशा घरातील कोणी हॉस्पिटल मधे एडमिट असते तेंव्हा  किंवा घरातल्या आजारी वृध्दांची काळजी घेत असतात तेंव्हाु घरातल्या मंडळींची खुप धावपळ उडते अशा वेळी मिळालेला मदतीचे हात खूप दिलासा देऊन जातो. bcare4u या ग्रुप तर्फे २६ जानेवारी २०१९ रोजी * "मोफत वृध्द व रुग्ण सहायता स्वयंसेवक सेवा"* उपलब्ध करुन देणा-या एका अनोख्या सामाजिक उपक्रमाची मुहूर्त मेढ रोवली*  घरी किंवा हॉस्पिटल मध्ये असलेल्या रुग्णांची व वृध्दांची काळजी घेतांना घरातील मंडळींची धावपळ उडते  * हीच गरज ओळखुन * "सर्वां साठी मोफत वृध्द व रुग्ण सहायता स्वयंसेवक सेवा"*  उपलब्ध करण्यात आली आहे.* या अंतर्गतपुढील सेवा देण्यात येतील :->> *१) हॉस्पिटल मधे अॅडमिट असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना त्यांच्या गरजे नुसार रिलिव्हर अटेंडंट म्हणुन हजर रहाणे.* *२) कोणाच्या घरी वृध्द व्यक्ती अथवा बेड रिडन पेशंट असतील...

कृतज्ञतेचा निर्देशांक

*!!कृतज्ञतेचा निर्देशांक!!* असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; "Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!". *(कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!).* मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं.  लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा;  *१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :* म्हणजे ...

नाती जोडा नाती जपा

*किती देखणी असतात ना नाती* टोमण्याकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी *आई* घोडा घोडा करणारे *बाबा* बाळाला मांडीवर घेऊन बसणारी *आत्या* न रागावता लाड करणारी *मावशी* 'मुलीला मांडवात घेऊन या' चा पुकारा झाल्यावर डोळे भरून येणारे *मामा* माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत भरल्या आवाजात 'येत जा गं घरी' म्हणणारी *काकू*  नि गाडी वरून फिरवायला नेणारा *काका* सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी *मैत्रिण* आणि बाकी काही तक्रार नाही हो पण फार कमी जेवते तुमची मुलगी ' असं फोनवर सांगणारी प्रेमळ *सासू,* वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा *नवरा* आणि 'आमटी फक्कड झालीय गं माझ्या आईची आठवण करून दिलीस' म्हणणारा *सासरा* ऑफीसातून परतल्यावर 'बस घटकाभर' म्हणत वाफाळता चहा पाजणारे आपल्या मुलांचा दंगा खपवून त्यांना सांभाळणारे *शेजारी* चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी *पत्नी* मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे *बाबा* आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी नातवाला फिरवून आणणारे *आबा* फेसबुकवर चिडवणारा पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा *मेहुणा* इकडे तिकडे पळत हैराण करणार्या नातवाला गरमागरम वरण भात...

बापाचं मन

👉 *बापाचं मन* 👈 *घरामधला कर्ता बाप,* *जेंव्हा येतो बाहेरून |* *पाळलेली मांजर सूद्धा,* *आनंदाने जाते शहारून |* *मॅव मॅव करत बिचारी,* *फिरते सा-या घराला |* *पण ते प्रेम कळत नाही,* *पोटच्या त्या पोराला |* *मालकाला बघून कूत्रा,* *झेपाऊन घेतो ओढ |* *साखळी दाटे मानेला,* *कमी होत नाही वेड |* *शेपटाचा गोंडा घोळून,* *घूटमळते ते दाराला |* *पण ती ओढ कळत नाही,* *पोटच्या त्या पोराला |* *दूर बघून मालकाला,* *हंबरते गोठ्यात गाय |* *वळवळ करते जागीच,* *तान्ह्या वासराची माय |* *वासराच्या आधी चाटे,* *ती मालकाच्या ऊराला |* *पण ती माया कळत नाही,* *पोटच्या त्या पोराला |* *बांधा वरचा बैल सूद्धा,* *हाक ऐकून परत वळतो |* *रागाची हाक असुनही,* *गप गुमान रानात पळतो |* *आपुलकीचा राग सुद्धा,* *कळतो मुक्या ढोराला |* *पण तो राग कळत नाही,* *पोटच्या त्या पोराला |* *जीव लावला जनावराला,* *लेकरावानी वागत आली |* *पोटची लेकरं मात्र कशी,* *परक्यावानी जगत आली |* *बाप लेकाचा सुर कधीच,* *जुळला नाही सुराला |* *जीव लावनं कळंलं नाही,* *पोटच्या त्या पोराला |* *बाप असतो जरा जरा,* *नारळाच्या फळा वानी,* *बाहेरून कठोर भासे,* *आतमध्ये ग...

*पाऊल व पाय

* *पाऊल व पाय* दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात.. *पाऊल नाजूक* ..व  *मुलायम..*  तर *पाय भक्कम* अन् *मजबूत* असावा लागतो..! *पाऊलखुणा* उमटतात तर *पायांचे ठसे ...!!* *पाऊलवाटेवर* कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण *पायवाट* ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..! *पाऊल जपून टाकायचे* असते; पण *पाय हा रोवायचा* असतो.. !! काय कमाल आहे बघा.. नावडत्या व्यक्तीच्या घरी *"कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही"* असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र *आपला पाय लवकर निघत नाही..!!☺* नको त्या ठिकाणी  *पाऊल घसरते* तर बहारदार संगीत मैफिलीत *पाय रेंगाळत राहतो !*  *पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !* जीवनात किंवा  व्यवसायात टाकलेले *पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो* तर येणार्‍या अनुभवांमुळे *आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट* ही अटळ व गरजेची असते... *...!* बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही........ ........... जन्माला येताना स्वतःच्या *पावलांनी* न येणारे आपण ,...परत जातान...

economic disaster India is facing

Greatest ever economic disaster India is facing. Media busy in communal debates. It needs revolution to stop this. """""""""""""""""""'""""""""""""""""""""""'''''"""""While every1 is busy debating on India/Pakistan, 370-Kashmir, Babri masjid- Ayodya, and Chidambaram, DK Shivkumar etc,  we miss to notice what's happening to our country in n arou tvnd !!! Recent data & Situation of our Country 👇👇 - Vodafone is in loss of ₹50,000 Crore - Airtel is in loss of ₹23,000 Crore  - BSNL is in loss of ₹14,000 Crore - MTNL is in loss of ₹755 Crore - BPCL is in loss of ₹750 Crore  - SAIL is in loss of ₹286 Crore  - AIR India is in loss of ₹4600 Crore  - Spice Jet is in loss of ₹463 Crore - Indigo is in loss of ₹1062 Crore - BHEL is in loss...

भांडणशास्त्र

*भांडणशास्त्र !* आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतूशून्य, आणि फक्त 'मी' ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेली वेळ.  हो, हेसुद्धा शास्त्र आहे, प्रशिक्षण आहे. जगाच्या शाळेत आपण ते शिकतो. एक भांडण आपलं नियतीशीसुद्धा सुरूच असतं आतल्या आत. पद्धत चुकली की, आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं. संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. साॅक्रेटिसच्या बायकोनं एकदा चिडून त्याच्या अंगावर पाणी फेकलं, यावर तो म्हणाला, "जरा जास्त तरी फेकायचंस. अंघोळीचं काम झालं असतं"  लक्ष्मीबाई टिळक यांचं 'स्मृतीचित्रे'  वाचलं तर लक्षात येईल की, तापट व्यक्तींसोबत भांडण टाळणं, हीच खरी बुद्धिमत्ता आहे, कौशल्य आहे. हे शिकून झालं, असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर शिकतच असतो. भांडण करताना काही नियम पाळले तर, आपलं जगणं सोपं होऊ शकेल. मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा; कुठंतरी लिहून ठेवा. पण, काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचं, हे आधी पक्कं करा. सर्वांत पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा, विषय सोडायचा...

डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी

*ही कविता नसून औषध आहे:* *डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी* माणूस काय करतो ? कुढतो जास्त , अन रडतो कमी ! म्हणून त्याचं हृदय , धडधडत असतं नेहमी !                 बोलणं कमी झाल्यामुळे ,                    प्रश्न निर्माण झालेत !                      सारं काही असूनही ,                     एकलकोंडे  झालेत ! भावनांचा कोंडमारा , होऊ देऊ नका ! हसणं आणि रडणं , दाबून ठेऊ नका !                 आपल्या माणसांजवळ ,                     व्यक्त झालं पाहिजे !                    खरं खरं दुःख सांगून ,                    मोकळं रडलं पाहिजे ! हसण्याने , रडण्याने , दबाव होतो कमी ! भावनांचा निचरा , ही Fresh होण्याची हमी !   ...

radio

https://play.google.com/store/apps/details?id=com.asemob.radioapp.Marathi

राम - रहिम

*राम - रहिम...!*  पुण्यातलाच एक गजबजलेला भाग...! घरं - बंगले - दुकानं आणि मध्येच कचरा टाकायची एक जागा, काहीसा उकिरडा वाटावा असा... !  याच ठिकाणी ब-याच जुन्या पुराण्या, रया गेलेल्या आॕटो रिक्षा एकमेकांना खेटुन उभ्या राहिलेल्या दिसतात.  या खेटुन उभ्या असलेल्या, रंग उडालेल्या जीर्ण रिक्षा पाहुन मला आयुष्याच्या उतारावर लागलेले आजी आजोबा संध्याकाळी एकत्र गप्पा मारायला घोळक्यानं जमतात ती आठवण येते... ! आयुष्य जगुन झाल्यावर, जीर्ण झाल्यावर, घरातुन उपरं झाल्यावर, काय गप्पा मारत असतील हि माणसं ? हा मला कायम पडलेला प्रश्न...!  जुनं वैभव आठवुन त्यातच रमतात ही माणसं, या आठवणींवरच जगतात ही माणसं... !  तसंच या रिक्षांचंही असावं का ? आपलं जुनं वैभव, गमती जमती आठवत... एकमेकींशी सुखदुःख्खं शेअर करत असतील का या जीर्ण झालेल्या रिक्षा ...?  मला तर या जीर्ण रिक्षांना पाहुन सुरकुत्यांच्या जाळ्यात वेढलेल्या, कमरेतुन पार वाकलेल्या आज्ज्याही दिसतात... ! यांनी आयुष्य जगलं असेल की भोगलं असेल ? त्यांनाच माहीती... !  जगणं आणि भोगणं... दोन्हीत फरक आहे... ! आनंद जगायचा असतो... सजा भ...

छत्रपती_शिवाजी_राजे_भोसले

#छत्रपती_शिवाजी_राजे_भोसले. कालखंड :- 1642–1680. पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले. कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण जन्म :- १९ फेब्रुवारी 1630 जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत. मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार. मृत्यू ठिकाण :- रायगड. महाराजांच्या धर्मपत्नी- १. सई बाई (निंबाळकर) २. सोयराबाई (मोहिते) ३. पुतळाबाई (पालकर) ४. लक्ष्मीबाई (विचारे) ५. काशीबाई (जाधव) ६. सगुणाबाई (शिर्के) ७. गुनवातीबाई (ईन्गले) ८. सकवारबाई (गायकवाड) मुले - संभाजी, राजाराम, मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे तरी संभाजी राजे अजुन मराठ्यांच्या छातीत जिवंत आह मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाही l डोळे काढले तरी चालेल पण नजर कुणापुढे झुकणार नाही l जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही l हात कापले तरी चालेल पण हात कुणापुढे जोडणार नाही l पाय तोडले तरी चालेल पण आधार कुणाचा घेणार नाही l गर्व नाही माज आहे या मातीला मर्द मराठा म्हणतात या जातीला l " मरण आले तरी चालेल, पण श...

आयुर्वेद

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो 1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या. 3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या. 5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या. 7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा. 8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका. 9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा. 10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या. काही आजार नसला तरी अनुलोमीलम 15 मी कपालभाती 15 मी सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा आरोग्य संवाद स्वतः साठी एवढं तरी करा १) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा. २) भरपूर टाळ्या वाजव...

Thinks twice..Act wise

Bill gates never did *Laxmi pooja* but he is the Richest man.  Einstein never did *Saraswati pooja* but he was very Intelligent.  Believe in WORK Not in LUCK.  Trust in God but don't be depended on him ...  The Best *"om"* is home !!  The Best *"age"* is courage !!   The Best *"mile"* is smile !!  The Best *"stand"* is understand !!  The Best *"end"* is friend !!  The Best *"day"* is today !!.... What is the difference between *Punya and Paap?* *Punya* is a debit card - pay first and enjoy later.  *Paap* is a credit card - enjoy first and pay later. 🍄 *KARMA* is a restaurant, where there is no need to place order - we are served, what we have cooked..! 👍"Thinks twice...  .....Act wise."🙏🌹

म्हातारपण

म्हातारपणाला नाव छान ,      कोणी म्हणत संन्यासाश्रम ,          कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम ,             मी म्हणतो आनंदाश्रम....  म्हातारपणात कसं राहायचं ,      घरात असेल तर आश्रमासारखं ,          आश्रमात असेल तर घरासारखं...  कशातच कुठे गुंतायचं नसतं ,   जुन्या आठवणी काढायच्या नाही ,          "आमच्या वेळी" म्हणायचं नाही ,              अपमान झाला समजायचं नाही ,                 उगाच लांबन लावायचे नाही...  सुखाची भट्टी जमवत जायच,    साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं ,          राग लोभाला लांब पळवायचं ,              आनंद सारखा वाटत जायचं...  म्हातारपण सुद्धा छान असतं ,     लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं ,       नव्या दातांनी सहज चावता येतं ,         ...

कौतुक

*न बोले तुम*  *ना मैने कुछ कहा...* आपल्या जगण्याच्या सर्कशीत किती गोष्टी आपण miss करतो ना...! कधी कधी वाटतं माणूस फक्त नातं टिकवायचा प्रयत्न करतो पण त्याऐवजी त्या नात्यातला जिवंतपणा टिकवायचा जर प्रयत्न केला तर नातं छान बहरतं फुलतं... सुगंधी होतं.... पण होतं काय ना... चार माणसाच्या कुटुंबात नवऱ्याला वाटतं बायकोचं कौतुक केलं तर बायको डोक्यावर बसेल नी बायकोला वाटतं नवऱ्याचं कौतुक केलं तर तो डोक्यावर बसेल... आणि नवरा बायको दोघांनाही वाटतं, मुलांचं कौतुक केलं तर ते डोक्यावर बसतील... पण माणसाच्या अनेक चुकीच्या विचारांपैकी हाही एक विचार आहे... _Appreciation always gives us strength..._ चार दिवसांच्या आयुष्यात माणुस कितीदा विचार करतो की एक दिवस मी माझ्या लाईफ पार्टनरला नक्की सांगेन की ती किंवा तो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे... अरे पण हा एक दिवस माहितीये का तुला मिळणार आहे की नाही...??? त्यामुळे जेव्हा जे वाटेल ते बोलून दाखवलं तर जगायला मजा येते, शक्ती मिळते... हा विचार आपण का करत नसू... देवच जाणे...! करा की कौतुक... म्हणा...  _"भाजी छान झालीये..."_ _"घर किती छान ठेवलंस..."...