Posts

Showing posts from January, 2023

जनकल्याण समिती

*मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा* 🌎🚩 *दान / देणगी देण्याची सुवर्ण संधी* 🌺🌸💐 🚶‍♂🚶‍♀🚶🏼🚶‍♀🚶🏼🚶‍♀ *चला त्वरा करा संपर्क करा.... सुरू झाला........ सुरू झाला ...... *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा निधी संकलन पंधरवडा* दि.15 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 सुरू झाला..... रा. स्व. संघ जनकल्याण समिती , नासिक जिल्हा संचलित *सेवा कार्य* • *चला तर या कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलू या...* 👀 •  *आरोग्य आयाम* आपल्या नाशिक जिल्ह्यात खालील प्रकल्प चालतात. (१) *साप्ताहिक आरोग्य केंद्र* :- जिल्ह्यात 6 ठिकाणी चालविले जाते. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १)पिठुंडी, २) एकदरा, ३) राहुडा ४) उंबरपाडा  ५) डहाळेवाडी ६) देवडोंगरी या ६ ठिकाणी दुर्गम भागात चालविले जातात. यात नासिकहुन डॉक्टर, कार्यकर्ते औषधासह तेथे जातात. सकाळी १० ते ५ रुग्णाची तपासणी करतात.व रुग्णांना तपासुन मोफत औषधे दिली जातात. ( अंदाजे खर्च रु.27.5 लाख) संपर्क :- नरहर जोशी 9850395279 ,सतीश माशाळकर  83085552503,  वामनराव रहाणे 7588707161, जयंत केळकर 9130053451,  प्रदीप रत्नपारखी 87934807...

पानिपतात पेशव्यांचा पराभव का झाला ?

*पानिपतात पेशव्यांचा पराभव का झाला ?* ---------------------------  -डॉ.श्रीमंत कोकाटे ---------------------------                            14 जानेवारी 1761 रोजी पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला. अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले, हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे. महाराष्ट्राची एक पिढी गारद झाली. पण हा दारुण पराभव का झाला, याची कारणे काय आहेत? त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन वर्तमानकाळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो.                        पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिवभाऊ आणि विश्वास पेशवे करत होते, त्यांच्या सैन्यात मराठा (कुणबी, माळी, धनगर, कायस्थ, रामोशी मातंग, महार, आग्री इत्यादी होते. मराठा हा शब्द जातीवाचक नसून समू...

सिंदखेडराजा

*मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील एक अविस्मरणीय अनुभव!!!* मराठा उद्योजक आणि मार्गदर्शन संस्थेच्या (मराठा उद्योजक कक्षाच्या) वार्षिक मिटींगसाठी आणि आई जिजाऊंच्या दर्शनाच्या ओढीने,आमच्या नाशिक टिमचा प्रवास मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या दिशेने सुरू झाला.उगवत्या सूर्याच्या दिशेने होणारा तो समृद्धी महामार्गावरील प्रवास आम्हा सर्वांना एक अस्मरणीय अनुभव होता.इश्वेद बायोटेक कंपनीमध्ये आमचे सुंदर स्वागत करण्यात आले. आम्हाला फ्रेश होण्यासाठी सुसज्ज गेस्ट हाऊस ओपन करून देण्यात आले.आम्ही कंपनीच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारत असतांना इश्वेद  बायोटेक चे फाऊंडर आणि ज्यांच्या व्हिजनमुळे "इश्वेद  बायोटेकचा" कारभार 57 देशांपर्यंत पसरला असे शिवश्री संजय वायाळ सर यांच्याशी भेट झाली.अतिशय ग्राउंड टू अर्थ माणूस,कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अगदी जमिनीशी जुळलेला माणूस आणि मॅनेजमेंटची (MBA) अक्षरशः चालती बोलते विद्यापीठ त्यांच्याशी बोलतांना त्यांचे  मायभूमी बद्दलचे प्रेम, त्यांच्या व्यावसायावरचे प्रेम आणि एकंदरच उद्योजकतेवर त्याचे प्रेम आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास ऐकुन खुप मोटिव्हेशन मिळाले.  थोड्याच...

चांदवड....

चांदवड.... राष्ट्रकुटकालीन खान्देशचा राजा श्री शेऊणचंद्र याची उपराजधानी असलेले ‘तामलिंदापुरम्’, माहुरनिवासनी देवी रेणुकेचा भक्त यादववंशीय राजा चंद्रहास ह्याची राजधानी ‘चंद्रदिव्यपुरी’ आणि मराठयांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणार्र्या मल्हारराव होळकरांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकरांचा पदस्पर्श लाभलेले ‘चांदवड’ हे खरोखर ‘इतिहासाचे साक्षी’ आहे. चांदवड हे शहर अनेक शतकांचा वारसा लाभलेल्या देशभरातल्या निवडक शहरांपैकी एक आहे. म्हणुन येथे ९ व्या शतकातील राष्ट्रकुटांच्या काळातील इंद्रायणी किल्ला(इंद्राई), चंद्रहास राजवटीची साक्ष देणारा चांदवडचा किल्ला (चंद्राई), होळकरकालीन टाकसाळ, १८ व्या शतकाच्या वास्तुकलेचा नमुना असणारा रंगमहाल, आदि वारसास्थळे इतिहासाची आठवण करून देतांनाच अंगावर शहारे येतात. चांदवडचा महिमा वाढवणाऱ्या कार्यात ऋषी अगस्थी, महर्षी मार्कंडेय, उज्जैनाधिपती राजा विक्रमादित्य, या व अशा कित्येक महामनांच्या उपस्थितीचा ठसा उमटलेला आहे. ह्या जोडीलाच शहरात असणारी प्राचीन शिल्पकलेची साक्ष पटवून देणारी बांधकामे, प्राचीन शिलालेख, मंदिरे, ऐतिहासिक लढायांच्या खुणा मिरविणारे भग्न वाडे, पुरा...

नात्यांची "स्माईलिंग फोडणी"

नात्यांची "स्माईलिंग फोडणी"  आमटीला फोडणी घातली की कसा चर्र असा आवाज आला आणि घरभर घमघमाट सुटतो तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, हळद यांचा स्वतःचा गंध आणि त्यांच्या एकत्रित झालेल्या सुवासानं सगळ्यांच्या नाकाचा ताबा घेतला जातो!!"   ही अशी स्वैपाकातली फोडणी, मग ती भाजीची असो वा आमटीची, सगळ्यांचीच भुक चाळवते, भुरळ घालते, एकत्र आणते आणि तृप्त करते.  नाती पण अशीच हवीत ना!! सगळ्यांना जवळ आणणारी, एकत्र ठेवणारी, हवीहवीशी वाटणारी, तृप्त करणारी!! फक्तं "अंदाज" बरोबर यायला हवा. प्रत्येक घटक अंदाजानच, पण प्रमाणात पडायला हवा. नाही समजलं?? अहो समजा फोडणीत मोहरी, जिरंच जास्तं पडलं, तर भाताशी, पोळीशी खाताना किंवा अगदी पिताना, जिरं मोहरी सारखं दाताखाली आलं तर वैतागायलाच होतं, म्हणुन ते प्रमाणातच घालायला हवं. नात्यातही तसंच असतं. कुठल्या नात्यात किती इंटरफिअर करायचं (नाक खुपसायचं) हे समजलं की कोणचंच नातं खुपत नाही. हिंग कितीही औषधी असला तरीही जास्तं पडला की तोंड वाकडं करुन डोळे मिटले जातात आणि राग येतो!!! आपणही कधीतरी प्रमाणाबाहेर बोलतो, पद्धत सोडुन बोलतो, तीव्र बोल...

पुनर्भेट

      🤝 पुनर्भेट 🤝 *कुणाचे आयुष्य किती असेल हे आपणास माहिती नाही, म्हणून जो क्षण येईल तो आनंदाने जगा...*     *ही गोष्ट आहे चार जिवलग मित्रांची....* *जे एकाच शाळेत जुन्या एसएससी पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं आलिशान असं एकच हाॅटेल होतं, ते कॅम्पमध्ये.*  *त्याची चर्चा त्यांच्याही कानावर आलेली होती की, तेथील चहा देखील त्यावेळी दहा रुपयाला मिळत असे, जेव्हा अमृततुल्यचा चहा पंचवीस पैशाला होता.*       *एसएससीची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की, आपण त्या हाॅटेलमध्ये जाऊन एकदा चहा घ्यायचाच.*  *त्यासाठी चौघांनी चाळीस रुपये जमवले.*       *रविवारचा दिवस होता, साडेदहाच्या सुमारास आपापल्या सायकलीवरुन चौघेही त्या हाॅटेलवर पोहोचले.*  *तेथील सिक्युरीटीवाल्याने त्यांना फाटकाशी अडवले.*  *तेव्हा चौघांनी आम्हाला चहा घ्यायचा आहे, असे सांगितले.*  *तेवढ्यात एका सुटातील तरुणाने त्यांना आत बोलावले.*  *हे चौघेही गार्डन रेस्टाॅरंटमध्ये बसल्यावर त्या तरुणाने जवळ येऊन चौकशी केली.*  *तेव्हा प्रत्येकाने आपलं ...

अंधश्रद्धा एक महारोग

*अंधश्रद्धा एक महारोग.....* *************************    *पुजेला मांडलेली खारीक* *आपल्या लहान मुलाने उचलुन खाल्ली तर त्याच्या गालफाडात मारणारा बहुजन, तीच खारीक खाऊन भटजीचं पोरगं गुटगुटीत होत आहे याचा आपण कधीच विचार करीत नाही,शेतात राब-राब राबुन हाडाची काडं केलेल्या आपल्या पत्नीला ती खारीक खाऊ घालावी हा विचार पण कधीच करीत नाही.*   *पुजेची तीच खारीक,खोबरं,काजु,बदाम भटजीला देऊन वर अजुन दक्षिणा देऊन त्याच्या पाया पडायचे ही खुप मोठी गुलामगिरी आहे हे बहुजनांना कधी समजलंच नाही.*  *पण फुले,शाहु,आंबेडकरांनी सांगितलं होतं कि ही गुलामगिरी सोडा...पण आम्हांला कधी ते जमलंच नाही...*   *भावा बहिणींनो,* *छत्रपती शिवरायांनी ३६१गड-किल्ले बांधले-जिंकले,पण एकाही गडकोटाची पुजा केली नाही की सत्यनारायण कधी घातला नाही,कधी मुहुर्त -पंचांग पाहुन लढाया केल्या नाहीत...*  *मग त्या छत्रपती शिवरायांचे मावळेच नां आपण ???*  *तुम्ही हे अंधश्रद्धा-कर्मकांड आणि ही गुलामगिरी सोडा "भटमुक्त व्हा.. भयमुक्त व्हा..."* *कोणतंही कार्य करताना बुद्ध,कबीर,रविदास,संत तुकाराम,जिजाऊ,शिवराय, संभाजीराजे,...

रक्ताचा 'रंग' मात्र

नमस्कारचे सुद्धा आता  तुकडे पडलेत 'जय जिजाऊ', 'जय भीम','जय भगवान', 'जय मल्हार','जय रोहिदास', 'जय राणा' सकाळ सुद्धा आता  'जात' घेऊनच उगवते 'शिवसकाळ', 'भिमसकाळ', 'लहूसकाळ' समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता 'जात' सांगून टाकतात 'शिवकवी', 'भीमकवी', i 'मल्हारकवी' वादळं सुद्धा आता   'जात' घेऊन येतात 'भगवं वादळं', 'निळं वादळं','हिरवं वादळं', 'पिवळं वादळं' रंगात विभागलेत आता पाऊस, वारा, वादळं, शहरातली दुकाने अन् गावच्या वेशीसुद्धा ! पण  रक्ताचा 'रंग' मात्र  अजूनही  'लालच' !  मनुष्य हीच खरी आहे जात , करा या वर मात ,  नाहीतर  देश,, जाईल  धूळ खात , यावर करा मात , एकच आपली भारतीय  जात .