रक्ताचा 'रंग' मात्र

नमस्कारचे सुद्धा आता 
तुकडे पडलेत
'जय जिजाऊ', 'जय भीम','जय भगवान', 'जय मल्हार','जय रोहिदास', 'जय राणा'

सकाळ सुद्धा आता 
'जात' घेऊनच उगवते
'शिवसकाळ', 'भिमसकाळ',
'लहूसकाळ'

समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता 'जात' सांगून टाकतात
'शिवकवी', 'भीमकवी', i 'मल्हारकवी'

वादळं सुद्धा आता 
 'जात' घेऊन येतात
'भगवं वादळं', 'निळं वादळं','हिरवं वादळं', 'पिवळं वादळं'

रंगात विभागलेत आता
पाऊस, वारा, वादळं,
शहरातली दुकाने
अन्
गावच्या वेशीसुद्धा !

पण 
रक्ताचा 'रंग' मात्र 
अजूनही  'लालच' !

 मनुष्य हीच खरी आहे जात , करा या वर मात ,
 नाहीतर 
देश,, जाईल  धूळ खात , यावर करा मात ,
एकच आपली भारतीय  जात .

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार