चढता सूरज धीरे धीरे..
*चढता सूरज धीरे धीरे...* साधारणतः १९७० च्या दशकात लिहिली गेलेली आणि गायली गेलेली ती एक सुफी कव्वाली आहे. पण आज सुद्धा ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात ! शायर *कैसर रत्नागिरवी* यांचे शब्द आणि मशहूर कव्वाल *अझीझ नाझा* यांची गायकी यांचा सुरेल संगम या कव्वाली मध्ये दिसून येतो. तसे पाहिले तर कव्वाली हा सुफी गायन प्रकार. त्याची भाषाही उर्दू; पण तरीही *भाषेच्या, धर्माच्या भिंती तोडून कव्वालीने भारतीय मनावर पकड मिळवलेली आहे*. या कव्वालीत आपल्या जीवनाचे सार सांगितले गेले आहे. म्हणजे माणूस आपल्या काहीश्या यशाने खूप अहंकारी बनतो. इतरांना तुच्छ लेखायला लागतो पण तरीही ते काही शाश्वत नाही. कधी ना कधी त्याचा अंत हा ठरलेलाच. पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक दिवस इथून जावेच लागते आणि जसे तो येताना काही घेवून येत नाही तसेच जातानाही काहीच नेत नाही. हाचं भावार्थ या कव्वालीत आहे. सुरुवातीलाच जो शेर आला आहे त्यातच खरं तर सगळा अर्थ शायरने सांगून टाकला आहे. *हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे !* *जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे !* *आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा,...