Posts

Showing posts from June, 2022

चढता सूरज धीरे धीरे..

*चढता सूरज धीरे धीरे...* साधारणतः १९७० च्या दशकात लिहिली गेलेली आणि गायली गेलेली ती एक सुफी कव्वाली आहे.  पण आज सुद्धा ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात !  शायर *कैसर रत्नागिरवी* यांचे शब्द आणि मशहूर कव्वाल *अझीझ नाझा* यांची गायकी यांचा सुरेल संगम या कव्वाली मध्ये दिसून येतो.  तसे पाहिले तर कव्वाली हा सुफी गायन प्रकार. त्याची भाषाही उर्दू; पण तरीही *भाषेच्या, धर्माच्या भिंती तोडून कव्वालीने भारतीय मनावर पकड मिळवलेली आहे*.  या कव्वालीत आपल्या जीवनाचे सार सांगितले गेले आहे. म्हणजे माणूस आपल्या काहीश्या यशाने खूप अहंकारी बनतो. इतरांना तुच्छ लेखायला लागतो पण तरीही ते काही शाश्वत नाही. कधी ना कधी त्याचा अंत हा ठरलेलाच.  पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक दिवस इथून जावेच लागते आणि जसे तो येताना काही घेवून येत नाही तसेच जातानाही काहीच नेत नाही. हाचं भावार्थ या कव्वालीत आहे.   सुरुवातीलाच जो शेर आला आहे त्यातच खरं तर सगळा अर्थ शायरने सांगून टाकला आहे.  *हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे !* *जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे !* *आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा,...

One liner Geeta

. *हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही हे सत्य आहे.* *त्यावर एका काकांनी लिहिले आहे. पण नुसतीच टीका न करता त्यांनी एक सोल्युशनही देण्याचा प्रयत्न केला आहे.* *फक्त हे सोल्युशनच पुरेसे नाही हे मला मान्य आहे. पण आताच्या इंग्रजी मिडीयमच्या मुलांना गीतेत नक्की आहे तरी काय हे प्रत्येक चॅप्टरचे सार इंग्रजीत एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. गीता तत्वज्ञानाची तोंडओळख म्हणा ना.* -------------------------------------------------------------  शाळेत गीता शिकवली जात नाही . कॉलेजात अर्थ समजावला जात नाही . खाजगी क्लासेस मध्ये गीतेचा अंतर्भाव नाही .  *मी तुम्हाला  १८ अध्यायांचे सार सांगणारी १८ वाक्ये देतो  - इंग्रजी मध्ये देतो -* *One liner Geeta.* *करताय त्याचा प्रसार ?* *प्रत्येकानी ४  दिवसात त्याला* *किमान १०० फॉरवर्ड करा .* *सगळ्या महाराष्ट्रात काय पण सर्व भारतभर पसरवा.* *One liner Geeta.* *Chapter 1 - Wrong thinking is the only problem in life .* (चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे) *Chapter 2 - Right knowledge is the ultimat...

अष्टांग हृदयम

*आपल्या भारतात ३००० वर्षांपूर्वी एक फार मोठी ऋषी होऊन गेले.* *त्यांचं नाव होतं महाऋषि वागभट!!* *त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं* *त्या पुस्तकाचं नाव होतं* *अष्टांग* *हृदयम!!* *(Ashtang   hrudayam)* *आणि याच पुस्तकात त्यांनी*  *आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती !* *हे त्यातीलच एक सूत्र आहे !!* *महर्षी वागभट लिहीतात की कधीकधी हृदयाचा घात होत असतो!* *म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage  व्हायला सुरुवात झालेली असते!* *म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे!* *आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच!* *यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात acidity !!* *आम्लता  दोन प्रकारची असते !* *एक असते  पोटाची आम्लता !* *आणि दुसरी म्हणजे रक्ताची (blood) आम्लता !!* *आपल्या  पोटात जेव्हा  आम्लता वाढते!* *तेव्हा आपण म्हणतो  पोटात आग पडल्यासारखं वाटतंय!!* *आंबट ढेकरा येतायत!* *तोंडात सारखं पाणी येतय!* *आणि ही आम्लता (acidity) जेव्हा आणखीन वाढते तेव्हा!* *तिला इंग्रजीत hyperacidity म्हणतात !* *आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत ज...

भारताचे विदारक सत्य

*अमेरिकेचे क्षेत्रफळ  भारता पेक्षा तिप्पट  आहे ......आणि लोकसंख्या  आहे 31 कोटी....... भारताची आहे 135 कोटी ...... 35 कोटीची 135 कोटी झाली .....फक्त 80 वर्षात. ...एवढीच जबरदस्त  प्रगती आहे...... इथै हजारो जाती.... सतराशे साठ धर्म .... कुणाचाच मेळ नाही.... प्रत्येकजण  म्हणतो आमचाच देव खरा*..... *एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले..... तरी एकएकाला 4-5 लेकरं.... कुत्र्यावाणी भटकत आहेत रस्त्यावर*.....  *ना शिक्षण  ना संस्कार ..ना आचार ....ना शिस्त*  *सगळं  बिनधास्त . आणी मस्त....*      *आताच पिण्यास पाणी नाही.... तर पुढे काय.... कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही..... निसर्गाची चाड नाही......नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत ....प्रार्थना  केल्या जात आहे ..*   *ईश्वराशिवाय कुणी महान नाही....  हे ऐकुण ऐकुण  58 वर्ष  झाली..... दरवर्षी  तेच. पाऊस नाही पडलाच तर पिकाला भाव नाही..... शेतकरी पाऊस पडला ...तरी आत्महत्या करतो  ....नाही पडला ...तरी आत्महत्या करतो*..... *सगळंयाना आ...

मराठीत *"लागण्याची"* गंमत बघा

पुलं दी ग्रेट ..।।।।। 😃😃😃😃😃 मराठीत *"लागण्याची"* गंमत बघा: ------------------------------------------ बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला* होता.  तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला *"लागला"*. त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच *"लागला"* होता.  बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला *"लागला"*.  घरचे जेवायचा आग्रह करू *"लागले"*. मला जेवणात गोड *"लागतं"* हे माहिती असल्याने गोड केलं होतं.  भात थोडा *"लागला"* होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला *"लागली"*. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार *"लागली"*. निघताना बस फलाटाला *"लागली"*च होती, ती *"लागली"च* पकडली.  पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस *"लागली"*. मग काय ... घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी *"लागली"* कारण आल्या आल्या घाईची *"लागली"*. थोडक्यात माझी अगदी वाट *"लागली"*.. घरची मंडळी हसायला *"लागली"*. 😅...

स्पर्धा

🏃🏻‍♂️ *स्पर्धा ... एक चिंतन*🏃🏻‍♂️ ✍🏻 आज सकाळी फिरायला गेलो. तेव्हा माझ्यापासून ५० मिटर पुढे एक व्यक्ति चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार. निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी. मी थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन, असा मनाशीच विचार केला आणि मग काय तर मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. खरतर रोजच्या प्रमाणे मला अजून एक मैल चालायचे होते आणि घराकडे परत फिरायचे होते. तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती. थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर बरेच कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझी गती पाहून माझा मलाच अभिमान वाटू लागला होता. आणि तो क्षण आला. मी त्याला पार केले.. मागे टाकले.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा !!! 🌾 *स्पर्धा ? पण याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, म्हणजे तो तर या स्पर्धेचा भाग ही नव्हता. आणि मी मात्र जिंकण्याच्या ओढीने माझा नेहमीचा रस्ता सोडून ...

Prevention is better than Cure

लोकप्रिय हिंदी गायक केके याचं काल वयाच्या ५३ व्या वर्षी ह्दयाघाताने निधन झालं. तो कोलकात्याला एका कार्यक्रमांत असतांनाच त्याची तब्येत खालावली. त्याने तरीही कार्यक्रम पूर्ण केला. पण हॉटेलवर परतल्यावर त्याची तब्येत सावरली नाही आणि त्यातच त्याचं निधन झालं. ५३ हे आजच्या काळात काही जाण्याचं वय नाही. अपघात समजू शकतो पण शारिरीक आजाराने अशा पद्धतीने जाणे हे दुःखद आहे. कलाकार हे अत्यंत व्यस्त आयुष्य जगत असतात आणि त्यांत त्यांना आपल्या तब्येतीची काळजी घेता येत नाही. किंवा अनेकदा ते त्याकडे दूर्लक्ष करतात. बऱ्याचदा आपल्याला काही होणार नाही हा अनाठायी विश्वासही अनेकांना असतो. मृत्यु मग त्यांना अवचित गाठतो.ही शोकांतिका आहे पण मला वाटतं की यातनं आपण सर्वांनीच काही धडा घेण्याची नितांत गरज आहे. जगणे ही काही शर्यत नाही. आणि असली तरीही त्यांत प्रत्येकाला जिंकण्याची संधी आहे. त्यासाठी अति घाई करण्याची गरज नसते. कदाचित अति घाई करून तुम्ही जिंकालही पण त्या जिंकण्याचा आनंदही तुम्हाला साजरा करता येणार नाही. आपल्या तब्येतीकडे दूर्लक्ष करणं ही अनेकांची वाईट सवय बनलेली आहे. बऱ्याचदा आपण इतरांना त्रास होईल किं...