भारताचे विदारक सत्य
*अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे ......आणि लोकसंख्या आहे 31 कोटी....... भारताची आहे 135 कोटी ...... 35 कोटीची 135 कोटी झाली .....फक्त 80 वर्षात. ...एवढीच जबरदस्त प्रगती आहे...... इथै हजारो जाती.... सतराशे साठ धर्म .... कुणाचाच मेळ नाही.... प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा*.....
*एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले..... तरी एकएकाला 4-5 लेकरं.... कुत्र्यावाणी भटकत आहेत रस्त्यावर*.....
*ना शिक्षण ना संस्कार ..ना आचार ....ना शिस्त*
*सगळं बिनधास्त . आणी मस्त....*
*आताच पिण्यास पाणी नाही.... तर पुढे काय.... कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही..... निसर्गाची चाड नाही......नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत ....प्रार्थना केल्या जात आहे ..*
*ईश्वराशिवाय कुणी महान नाही.... हे ऐकुण ऐकुण 58 वर्ष झाली..... दरवर्षी तेच. पाऊस नाही पडलाच तर पिकाला भाव नाही..... शेतकरी पाऊस पडला ...तरी आत्महत्या करतो ....नाही पडला ...तरी आत्महत्या करतो*.....
*सगळंयाना आरक्षण पाहीजे म्हणता म्हणता ....आरक्षण 100%होण्याची वेळ आली*....
*तरीही काही मिळनार नाही*
....
*वित्तमंत्री सितारामन यांनी संसदेत सांगीतले ..... देशातील 1 लाख 60 हजार कंपन्या बंद झाल्या ....सहाकोटी लोक बेरोजगार झाले.*......
*नोक-याच नाही ....तर आरक्षण घेवून काय चाटायचे......आता नोक-याच बंद होत आहेत ....आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची ताकद नाही*.....
*मॅचच फिक्स असेल .....तर खेळायचेच कशाला*......
*जनता दिशाहीन झाली आहे..... स्वप्न राखेत मिसळली आहेत...... संविधान नावांला उरले आहे....*
*प्रचंड महागाई ने जनता मरणप्राय झाली आहे..... तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर वाढवतच आहे.....*
*दवाखाना कुटूंबाचे दिवाळं काढत आहे. .....जनतेला लुटण्यासाठी लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य गिधाडे सरसावली आहेत.....*
*चिंता व ताणतणावाने अर्धा भारत मधुमेह ग्रस्त झाला आहे.... .30% लोकांना रक्तदाब आहे.....*
*शेतात काम करायला मजूर नाही ....अंगमेहनतीला माणुस नाही*....
*सगळे बिनकामाची माणसं आहेत...... नवरा साहेब व बायको मॅडम झाल्या आहेत....*
😡😡😡😡😡😡🌹
*स्वयंपाकाला ...बाई ..भांडी व धुण्याला बाई.*
*तरी .. मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे....*.
*आणि*
*साहेबांना टेकल्याशिवाय बसता येत नाही.....*
*कुंभ मेळ्यात ...10,000 सुशिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी साधूची दिक्षा घेतली......आणि आता रस्त्यावर भटकत आहेत..... विरक्त झाले आहेत.... लग्नाचे वय टळून गेले आहे..... बायका मिळत नाहीत..... गांवागावांत किमान चाळीस पन्नास पोरं बिन लग्नाची आहेत..... भयंकर विदारक परिस्थिती आहे*.....
*बाजारात फळे बळेच पिकवून विकत आहेत..... मराठी शाळा बंद पडल्या आहेत..... मुलांना धड इंग्रजी येत नाही... आणि मराठी येत नाही.....*
*मराठी इंग्लिश मिक्स बोलत आहेत.... टिव्ही वरच्या मालिका फालतू झाल्या आहेत..... गुन्हेगारी जास्त दाखवत आहे... . मुलं लहानपणापासूनच हिसंक होत आहेत....*
*13 व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत... . दारू कितीही महाग केली ...तरी त्यासाठी रांगा लागत आहेत......*
*प्रार्थना स्थळे लुटीची ठिकाणं झाली आहेत.... . वृद्धाआश्रमाची संख्या झपाट्याने वाढत आहेत.... . तो एक मोठा व्यवसाय होवू पहात आहे.....*
*आईला बाळासाठी वेळ नाही..... पाळणाघरे वाढत आहेत....*
*लेका-सुनांना सासुसासरे नकोत...*
*अनाथालये वाढत आहेत.....*
*माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत..... खोटं बोलणच खरं मानलं जात आहे....*
*चोरांना लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे..... सज्जनांना वेड्यात काढत आहेत... . लोकशाही समता बंधुता स्वातंत्र्य... हे.... फक्त वाट्सअपचे संदेशा पुरतीच मर्यादित झाली आहे....*
*चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत..... प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे....आज ही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत....*
*साहित्यीक मारले जात आहेत...... शिवरायांनी 350 वर्षापुर्वी.... साहित्यकांना उत्तम लिखाणासाठी कोटी रूपया पर्यंत मानधन दिले होते..... आज साहित्यीक भीक मागत आहेत.....*
*एकंदरीत भारत विस्फोटाचा.... व ...उद्रेकाचा ज्वालामुखी बनत आहे..... भारत मानवी वस्ती साठी धोकादायक होत चालला आहे.....*
*वेळीच सावरलो नाही.. तर... आपल्या वारसांचे जीवन.... प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडनार आहे.. हे नक्की....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
*मित्रांनो ही कुठल्या चित्रपटाची कथा नाही तर आजच्या भारताचे विदारक सत्य आहे.*
खरचं याचा सर्व भारतीयांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.# हा लेख मला एका प्रसिद्ध उद्योजक मित्राने पाठवला आहे मला यातील बहुतांश गोष्टी पटतात म्हणून शेअर केला आहे#. आपणाला काय वाटते ते वाटु द्या पटेल ते पटू द्या
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Comments
Post a Comment