गोतावळा
#गोतावळा #एकेकाळी . हाच शब्द समर्पक ठरेल अशीच आजची परिस्थिती आहे . घर माणसांनी भरलेलं असायचं घराला घरपण होतं. शेजारी पाजारी लोकांची ये- जा असायची. वरच्या गल्लीतल्या आण्णांच्या घरची भाजी वाटीत घालून खालच्या गल्लीतल्या दादांच्या घरी पोहोचायची. चिपटंभर पीठ उसणवारीनं एकमेकांना दिलं घेतलं जायचं. माणसांमध्ये आपूलकी, प्रेम, माया ममता होती. तांबङं फुटायला घराच्या अंगणात शेणाचा सङा पङायचा. पहाटेच्या अल्हादायी वातावरणात पक्षांची किलबील अन् गावातील रामफेरीचा सूर मनाला प्रसन्न करायचा. घरातल्या गृहलक्ष्मीची सोवळी उरकून दिवस उजङायला सोनेरी सुर्य प्रकाशात तुळशी वृंदावनातील लुसलुशीत हिरव्यागार कृष्णधवल तुळशीत पाणी आणि सुर्यदेवाला नमस्कार व्हायचा. हंबरणारी वासरं अन् पान्हा सोङलेल्या गायी आकरी दुधानं चरवी काठोकाठ भरायची. घरातील वयस्कर आजीच्या बांगङ्याचा खूळ खूळ आवाज रवी कधीची तशेल्यातील ताकावर लोणी जमा करायची कळायचेही नाही. मधेच स्वयपाक घरात म्यावं...म्यावं...करत शेपूट हलवत फिरणारी मांजरी लोण्याच्य...