गोतावळा
#गोतावळा
#एकेकाळी . हाच शब्द समर्पक ठरेल अशीच आजची परिस्थिती आहे . घर माणसांनी भरलेलं असायचं घराला घरपण होतं. शेजारी पाजारी लोकांची ये- जा असायची. वरच्या गल्लीतल्या आण्णांच्या घरची भाजी वाटीत घालून खालच्या गल्लीतल्या दादांच्या घरी पोहोचायची. चिपटंभर पीठ उसणवारीनं एकमेकांना दिलं घेतलं जायचं. माणसांमध्ये आपूलकी, प्रेम, माया ममता होती. तांबङं फुटायला घराच्या अंगणात शेणाचा सङा पङायचा. पहाटेच्या अल्हादायी वातावरणात पक्षांची किलबील अन् गावातील रामफेरीचा सूर मनाला प्रसन्न करायचा. घरातल्या गृहलक्ष्मीची सोवळी उरकून दिवस उजङायला सोनेरी सुर्य प्रकाशात तुळशी वृंदावनातील लुसलुशीत हिरव्यागार कृष्णधवल तुळशीत पाणी आणि सुर्यदेवाला नमस्कार व्हायचा. हंबरणारी वासरं अन् पान्हा सोङलेल्या गायी आकरी दुधानं चरवी काठोकाठ भरायची.
घरातील वयस्कर आजीच्या बांगङ्याचा खूळ खूळ आवाज रवी कधीची तशेल्यातील ताकावर लोणी जमा करायची कळायचेही नाही. मधेच स्वयपाक घरात म्यावं...म्यावं...करत शेपूट हलवत फिरणारी मांजरी लोण्याच्या गोळ्याकङे बघत कानोसा घेत फिरायची. घरावरील छपराच्या सवण्यातनं सुर्याचा लख्खं प्रकाश घर उजळून टाकायचा. जर्मनच्या चिटकीत कङवलेल्या तुपाचा घमघमाट अख्ख्या गल्लीभर व्हायचा. घरातली कर्तीधर्ती माणसं कवाची मळ्यात पोहोचलेली असायची. घरातील सुनाबाळा सासरे मामांजीच्या व सासूबाई आत्याचे चरणस्पर्श करून दिवसाच्या कामाला सुरुवात व्हायची. लहान मुलं दिवस उजाडला की ठूसठूस करत उठायची . तान्ह्या बाळांच्या आया त्यांना जवळ घेऊन पाजायच्या थापटलं की लेकरं ङूकला घ्यायची. सकाळी सकाळी पाण्याचा रांजून खाली व्हायचा. सालगली अन् कोळी पकालीचं पाणी आणून घाईला यायचे. धुण्याचा भला मोठा बोचका न्हानीतनं घेऊन परटीणं गावतळ्याकङं निघायची. एकमेकांविषयीचे प्रेम आदर हे नाती अधिक घट्ट करत होते. नातेवाईक एकमेकांना पाहूण्यासारखी आमणधपक्या भेटायची.
घरातील कर्त्याचा सर्वजण आब राखत होते. संस्कार हे प्रत्येकाच्या वागण्यातून दिसून यायचे. आई - बाबा, काका - काकू , आज्जी - आजोबा, आत्या ,भाऊ - बहिणी , चुलत भाऊ , हा सगळा " #गोतावळा " म्हणजे प्रत्येकी एक पुस्तकचं होते. घराच्या ओसरीला बसून दिवसभराच्या कामाचे नियोजन केले जायचे. बैलाकङे कोण जाणार ? माळावर कोण ? नातेवाईकांच्या लग्नाला, कार्यक्रमाला कोण ? हे सगळं नियोजनानंतर घरातील कर्त्या माणसांकङून एकमेकांविषयीचे रूसवे - फुगवे दूर केले जायचे. मध्येच कोणाचे हट्ट पूरवण्याची अश्वासने दिली जायची. तर मध्येच घरातील लग्नाला आलेल्या उपवरं मुलीच्या लग्नाची चर्चा रंगली. की, मुली लाजून चूर व्हायच्या अन् तिथून निघून जायच्या. प्रत्येकाची सुख दु: ख गोङ कौतुकानं मनं हालकी व्हायची. विचारांना चालना मिळायची. अन् तीस तीस सदस्य असलेली कुटूंब गुण्यागोविंदाने नांदायची.
नवरा जेवल्याशिवाय बायकांना घास उतरत नसायचा. इतकं राघू - मैनेचं प्रेम पार उतू जायचं. आपेक्षा कमी असल्याने माणसं सुखी समाधानी अन् आनंदी असायची. घरात एखादा छोटा मोठा समारंभ असला की आनंदाला उधानं यायचं. घराच्या भिंती ही बोलू लागायच्या. बच्चेकंपनीची लूङबूङ चालायची. अन् घरातल्या सुना स्वयपाकात दंग असायच्या. हिर्या - म्हावर्याची जोङी तट्या बांधलेल्या बैलगाङीत मध्येच नांदायला गेलेली एखादी लेक भरल्या चुङ्यानं अन् हिरव्या पातळानं लक्ष्मी प्रगट व्हावी. तशी यायची. अन् मग घरातल्या प्रत्येकाच्या गळ्यात पङून आपूलकीचा स्पर्श नात्यातील वीण अधिक घट्ट करायचा. कुरवङ्यासाठी ज्वारी सङायला आलेल्या शेजारच्या काकूनं गालावर हात फिरवून बोट कङाकङा मोङून माया करावी. " कसं गं माय बरी हायं नव्हं " हे शब्द काळजात घर करायचे. सकू आली म्हणून खालच्या गल्लीतल्या सगळ्या मैत्रीणी गोळा व्हायच्या. माहेरात आलेल्या सासरवाशीनं सगळा गाव धुंङाळावा.
आत्या आत्या करून घरातली किलबील एकत्र यायची. नणंद - भावजया मधील प्रेम अतूट होत. स्वार्थ अन् अहंकाराचा लवलेश ही नसायचा . दुपारी जात्यावर दळायला आलेल्या शेजारनीला सुनेच्या चाङ्या करणारी सासू सासरवासाचा जाच ही करायला कमी पङत नसायची. तेव्हा मात्र शेतावरून घरी आलेल्या मामांजीना तांब्याभर पाणी देताना सूनबाईच्या ङोळ्यातून घळकनं अश्रू ओघळायचे. मग मात्र मायेनं सुनेच्या ङोक्यावरनं फिरवलेला हात बापाची आठवण करून दयायचा. एकमेकांविषयीच्या सुख दु: खाना प्रत्येकाच्या मनात थारा होता. संध्याकाळच्या जेवणाची तयारी लगबग स्वयपाक घरात असायची. घरातील प्रत्येक सदस्य आल्यावर ओसरीला पंगत बसायची. अन् पुन्हा घरातील विविध विषयांवर चर्चा व्हायची. बाप - लेक , नवरा - बायको , आज्जी - आजोबा नात्यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांना प्रेम लावायचे. सुख- दु : ख वाटून घ्यायचे. " आज कङी छान झाली आहे बरं कोणी केलीयं " असं कोणी म्हटलं की " भाऊजी किती कौतुक करावं बायकोचं " मोठी वहिणी लहान दिराला आईच्या ममतेनं हिणवायची.
सगळ्या घरात एकचं हश्या पिकायचा. दिवसभराचा शीणं निघून जायचा. त्यावेळीच्या बायकांना नवरोचा मूङ आनंदी ठेवण्याची कला अवगत होती. यातून आरोप प्रत्यारोपाचा माझा मुळीचं हेतू नाही. पण घराचं गोकुळ होतं. संसार सोन्याचा होता. एकत्र कुटुंब ही संस्काराची केंद्र होती. माणसात माणूसपण टिकून होतं. सुख - दु : ख रिते करायला अधिकार अन् हक्काचे खांदे होते. नात्यातील प्रेमात अविट गोङी होती. आपलेपणाची किनार होती. या सगळ्या गोतावळ्यात शब्द अन् तत्वांना किंमत होती. विश्वासर्हता टिकून होती. माणसं सुख दु : खाच्या प्रवासातील वाटेकरी होती. भरलेल्या घरातील एखाद्या सदस्य न येणार्या वाटेवर कायमचा निघून गेला. तर माणसं भावनांना वाट मोकळी करून दयायचे. कायम आठवण म्हणून पुढील पिढीत त्याचे नाव चालवायचे. म्हणून तर रक्ताची नाती सोङाचं पण मानलेली नाती ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कित्येक पिढ्या " गोतावळा " जपला जायचा.
लेखन अट्टाहास - विशाल चिपङे ( #विचिता )
बावी आ बार्शीवरून
हॅलो 8317250005
9422033819
Comments
Post a Comment