परत फिरण्याची वेळ
🙏 *परत फिरण्याची वेळ*
आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास,
“परत फिरण्याची” तयारी सुरू करा....हे सर्व केव्हा करायचं तर आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर !
का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे?
जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते..ते आपणास सांगतो.
*परत येणे ..... कधीच सोपे नसते*
एक व्यक्ती आपल्या राज्याच्या राजाकडे गेला. राजा समोर जाताच म्हणाला " मी गरीब आहे
माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे."
राजा दयाळू होता. त्याने विचारले "आपल्याला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?"
त्यावर माणूस म्हणाला " कसायला थोडी जमीन द्या."
राजा म्हणाला: "उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तु जेवढे चालु शकशील, जेवढे धावु शकशील तेवढा संपूर्ण प्लॉट तुला देण्यात येईल. परंतु एक लक्षात ठेव,तु ज्या ठिकाणाहून धावणे सुरू करशील त्याच ठिकाणी सूर्यास्तापर्यंत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही!"
माणूस खुष झाला.सकाळी राजासमोर हजर झाला.अन् तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहीला; सूर्य माथ्यावर चढला होता .. पण त्या माणूसाने धावायचं थांबवले नाही .. अजून थोडी मेहनत .. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती !
संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, आपल्याला परत ज्या ठिकाणाहून आलो आहे तेथे सूर्यास्ता अगोदर पोहचायचे आहे, नाहीतर आपल्याला काही मिळणार नाही! त्याने मागे वळून पाहिले तेव्हा आपण खुप दूर आलो आहे ..हे जाणवले. आता आपल्याला परत पोहचायला हवे .. आकाशातील सूर्य पश्चिमेकडे वळला होता.. तो व्यक्ती थकला होता. पण वेळ वेगाने निघुन जात होती .. आराम करता येत नव्हता.अजून थोडी मेहनत.. न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला.. पण त्या व्यक्ती आता श्वास घेणही कठिण झालं होतं. तो खाली पडला .. आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला !
राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला,
याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता!शेवटी त्या व्यक्तीच्या हाती काहीच लागले नाही.रिकाम्या हाताने आला होता रिकाम्या हातानेच गेला.
आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा. आपण पण तीच चूक तर करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीमीत , अफाट आहेत! आपण जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आपण तसा प्रयत्न करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
आपल्याकडे काहीही वेळ ना काळ शिल्लक राहत नाही. मोहापोटी आपण पूर्ण सर्वस्व गमावून बसतो.
मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोहचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेल? हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा! संपत्ती जरूर कमवा पण संध्याकाळी आपल्या जागेवर नक्की पोहचा..
सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आपण सर्व अभिमन्यूच आहोत. आपल्यालाही कसे परत फिरावे हे माहित नाही. एक मात्र लक्षात ठेवा आपल्याला एक न एक दिवस हे सर्वकाही सोडून जायचे आहे तेव्हा थोडं थांबा, आजुबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलाय याची खंत आयुष्यभर राहून जाईल. किमान आज या एका क्षणापुरतं खुष व्हा. म्हणून सांगतो मित्रानो, साधेपणाने जगा. सर्वांशी प्रेमाने वागा. एकमेकांचा आदर करा.. सर्वांची काळजी घ्या.. सर्वांच्या नेहमी संपर्कात रहा.. सुरक्षित रहा..!!
*मिञ-नातेसंबंध सुधारा*💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment