Posts

Showing posts from May, 2021

वानोळा

*"वानोळा"* *तू सासरी निघाली आहेस तर जातांना "वानोळा" घेऊन जा.. रिकाम्या हाताने जाऊ नये, तुझे घरचे लोकं काय म्हणतील?"* *वरिल वाक्य कानावर पडले, आणि "वानोळा" शब्द मनात फिरत राहिला, आणि नकळत मन बालपणात गेलं..* *तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर, किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना..* *तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा, तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली डाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी..* *आणि असलंच बागायतदार घर, तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की, मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला....* *मग घरी येऊन जोवर तो "वानोळा" पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची.. तो "वानोळा" केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं...* *वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची. तरी शेजार पाजारी...

कोण होते बुद्ध

कोण होते बुद्ध ?(न विसरता दोन वेळा वाचावे)    आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणार्या समाजामध्ये तथागत गोतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धान्ना एका विशीष्ट समाजाच्या चौकटीत अडकउन आम्हाला आजपर्यंत खरा बुद्ध समजुच दिला गेला नाही . जर आम्हाला खरा बुद्ध समजला असता तर आज भारतावर ही वेळच आली नसती. कोण होते बुद्ध ?        1) बुद्धांच पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन गोतम शाक्य ...गोतम हे त्यांच आडनाव आणी शाक्य हे त्यांच्या गणाच नाव...कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण ! 2 ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस " कणबी " असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ....मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणी त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला " कणबी " असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला " कुणबी " कुणबी म्हणजे आजचा ओब...

अंतःकरण

🌱🎋🌱 "मुलगा चांगलाय." बाई अगदी खात्रीनं बोलल्या. त्यांच्या थोरल्या मुलीसाठी स्थळ आलं होतं. त्याविषयी काय सांगू नि काय नको, असं त्यांना झालं होतं.  मुलाची नोकरी, पगार, घर वगैरे सचित्र सांगून झाल्यावर बाई सांगू लागल्या, "एक म्हणून व्यसन नाही. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. दारू पित नाही. सिगारेट ओढत नाही. कसला नाद करत नाही. कसली सवय नाही." हा महामिस्किल. तो म्हणाला, "अहो, मग करतो काय हा गोट्या?" बाई म्हणाल्या, "करतो काय म्हणजे, मोठ्या कंपनीत इंजिनिअरचा जॉब करतो." "अहो, पण त्याला काही नाद आहे की नाही? काही सवय आहे की नाही? कोणत्या सवयी नाहीत, हे कळलं, पण सवयी मग आहेत कोणत्या? करतो काय म्हणजे!" आपलं जरा चांगलं झालं की लोक असे आडव्यात बोलणारे असतात, हे बाईंना माहीत होतं. याला त्यापैकी एक मानून त्यांनी याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. काय करत नाही, यावरच आपल्याकडं चारित्र्य ठरतं. "हे करू नकोस, ते करू नकोस". अरे, पण करायचं काय, हे मुलांना कोणी सांगतच नाही. पालकांना तरी ते कुठं माहीत असतं!  दारू पिऊन मिळणारा आनंद खरा नाही, हे सांगायला ह...

वीस रूपयाची नोट

*वीस रूपयाची नोट........* आज मैत्रिणीबरोबर माॅलमधे शॉपिंग   आणि त्यानंतर बर्गर /पिझ्झाचं डिनर करून संध्याकाळ मस्त घालवयाची असा बेत बनवला.माझी मैत्रीण,  लीना ठरल्याप्रमाणे चार वाजता घरासमोर मला पिकअप करायला पोहचली. घराला कुलूप लावून मी तिच्या कारमध्ये जाऊन बसले. गाडी मॉलच्या रस्त्यावर धावू लागली. माझी नजर तिच्या रियर व्ह्यू आरश्याला लटकवलेल्या कार हँगिंगवर पडली. काहीतरी एकदम वेगळं. 20 रुपयाची लॅमिनेट केलेली एक नोट! मी  लीनाला उत्सुकतेने विचारलं !" 20ची नोट? काय गं हे?  पहिली कमाई, लकी चार्म, का कुणी स्पेशल व्यक्तीने दिलेली आठवण?" तिने हसून सांगितलं!"अहं,!यापैकी काहीच नाही.  हे आहे "रिमाइंडर"!! " रिमाइंडर? कसले रिमाइंडर"?  ती म्हणाली "यामागे छोटासा किस्सा आहे. ऐकशील?"  मी सीटमध्ये थोडीशी वाकडी होऊन बसले आणि उत्सुकतेने तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हटलं "हो नक्कीच! काहीतरी गंमतशीर वाटतंय"  ती म्हणाली ,"हो गंमतशीरही आणि माझ्या चेहऱ्यावर एक चपराकही." लीना सांगू लागली," मी नुकतीच एका एक्झिबिशनमधे शॉपिंग करायला गेली. कोविडनंतर भर...

मध्यमवर्गीय

*मध्यमवर्गीय* १. दारावर टॉवेल, पंचा वाळत टाकलेला असतो. २. गोदरेजचं कपाट आणि त्याच्या आरशावर टिकल्याच टिकल्या! ३. महाराष्ट्रात घरांचे २ प्रकार असतात. महालक्ष्मी कालनिर्णय ४. रविवारी सकाळी लवकर जाऊन मटण/चिकन आणायचं आणि दुपारी जेवून मस्त झोप काढायची आणि रात्रीच्या जेवणाला पण तेच खायचं(रात्री फक्त रस्सा उरलेला असतो). ५. दुधाच्या राहिलेल्या पातेल्यातली खरवड (साय) चमच्याने काढून खायची. (कधी कधी त्यात चहासुद्धा करतात) ६. थंडी जरा कुठं कमी झाली रे झाली की घरात सगळ्यांना गार पाण्याने अंघोळ करायला सांगायची(करायलाच लावायची!). ७. पूर्वी रेशनिंगचा तांदूळ मिळायचा त्याच्या रविवारी इडल्या, डोसे करायचे आणि आम्ही ते शक्तिमान बघत बघत खायचो. ८. लग्नाच्या रात्रीच पाकिटं फोडून कोणत्या पाहुण्याने लग्नात किती आहेर दिला हे लिहून ठेवायचं. ९. पोरांना दिवाळीत फराळ करायला जबरदस्ती मदत करायला लावायची. बरं ते करतांना चुकीला माफी नाही. जसं काय मी वर्षभर शाळेत 'करंजीच्या पारीमध्ये सारण कसं भरतात', 'चकली न तुटता कशी पाडतात' हेच शिकायला जातो! त्यात पण मातोश्रींचे तेच ठरलेले डायलॉग मुलाला - "मी आहे म...

जुन्या काळातील लग्न

#जुन्या काळातील लग्न😊      लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत  टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल दिमाखात दाखवत, गावात पूर्ण फेरफटका मारायचा, त्यावेळेस त्याची शान काही औरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की. लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण, किंवा लापशी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेतांना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झालेय. लग्नाआधी मुला-मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावयाची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला  मळवट, त्यावरून लावलेली चमकी सगळे नव्या पिढीला...

२१ मे चहा दिन

*२१ मे चहा दिन !* *चहा*☕ *चहा म्हणजे चहा असतो* *कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो* *उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार☕☕ असतो*. *कधीही मिळाला तरी वाह वाह असतो*... *मुंबईत तो पिला जातो*, *पुण्यात घेतला जातो*, *कोल्हापुरात टाकला जातो तर* *नागपुरात तो मांडला जातो*. *चहा म्हणजे चहा असतो* *कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो*... *क्षण आनंदाचा असो*,  *वा आलेल असो*, *टेंशन*  *आळस झटकायला लागतो तसाच थकवा घालवायला ही लागतो*. *चहा म्हणजे चहा असतो* *कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो*... *काहीच काम नसताना पण चालतो, आणि खूप काम असलं तरी पण लागतो* *गप्पा मारताना जसा लागतो*, *तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो*. *चहा ला वेळ नसते पण*, *वेळेला चहाच लागतो*. *चहा म्हणजे चहा असतो* *कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो*... *एक चहाप्रेमी* ☕ कडून  *चहा दिनाच्या मंगलमय शुभेच्छा !* ☕☕☕☕☕☕☕

माहिती

*खुप छान माहिती आहे   आपल्याला ऐकत्रीत कुठेही मिळनार नाही आणि कुणी ही सांगनार नाही. :-* 👇🏻 *01*  **एक हरी (आत्मा)** *एक जननी ( मुळ माया )*  जगदंबा *02* *दोन लिंग* नर आणि नारी *दोन पक्ष* शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष। *दोन पूजा* वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त) *दोन अयन* उत्तरायन आणि दक्षिणायन *03* *तीन देव* ब्रह्मा, विष्णु, शंकर *तीन देवि* महा सरस्वती, महा लक्ष्मी, महा काली *तीन लोक* पृथ्वी, आकाश, पाताल *तीन गुण* सत्वगुण, रजोगुण, तमोगुण *तीन स्थिति* ठोस, द्रव, गेस *तीन स्तर* प्रारंभ, मध्य, अंत *तीन पड़ाव* लहान, किशोर, वृद्ध  *तीन रचना* देव, दानव, मानव *तीन अवस्था* जागृत, मृत, बेशुद्ध *तीन काळ* भूत, भविष्य, वर्तमान *तीन नाड़ी* इडा, पिंगला, सुषुम्ना *तीन संध्या* प्रात:, मध्याह्न, सायं *तीन शक्ति* इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति *04* *चार धाम* बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, द्वारका *चार मुनि* सनत, सनातन, सनंद, सनत कुमार *चार वर्ण* ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र *चार निति* साम, दाम, दंड, भेद *चार वेद* सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद *चार स्त्री* माता, पत्न...

भारताच्या गुलामीचे रहस्य

!!  भारताच्या गुलामीचे रहस्य !!  हाँगकाँगचे लोक अजूनही भारतीयांचा तिरस्कार का करतात ??  कारण तेथे राहणार्‍या काही लोकांचे अनुभवः  हाँगकाँगमध्ये जवळपास एक वर्ष घालवल्यानंतर एका भारतीय व्यक्तीने बर्‍याच लोकांशी मैत्री केली, पण तरीही त्याला वाटलं की तेथील लोकांनी त्याच्यापासून काही अंतर ठेवले आहे !!  कोणत्याही मित्राने त्यांना कधीही त्यांच्या घरी बोलावले नाही ??  शेवटी त्याने जवळच्या मित्राला विचारले सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर  थोड्या विलंबानंतर त्याने जे सांगितले त्यावरून त्या भारतीय मान्यवरांना स्वतःची लाज वाटली  हाँगकाँगच्या मित्राने विचारले की "200 वर्षे राज्य करण्यासाठी किती ब्रिटिश भारतात राहिले?"  भारतीय महामहिम म्हणाले, "10,000 असणे आवश्यक आहे"  "मग इतकी वर्षे राज्य करण्यासाठी 32 कोटी लोकांवर अत्याचार कोणी केले?  ते तुझे स्वतःचे लोक होते ना?  जेव्हा जनरल डायर "# फायर *" म्हणाले तेव्हा 1300 निशस्त्र लोकांना गोळ्या घालून कोणी ठार केले  ब्रिटीश सेना तेथे नव्हती ??  एकाही गनर मागे वळून जनरल डायरला का मारू शकला नाह...

गोष्ट खूप छोटी असते हो

खुपच छान आहे पण "वेळ असेल तेव्हाच" एकदा मन लावुन वाचा....  1} *गोष्ट खूप छोटी असते हो....* Good तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते.... *गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.* स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं... *गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.* अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात.... *गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.* आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो.... *गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.* घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी skin चं मलम देऊन टाकायचं... *गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.*...

मधमाशी

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल .. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं* ते सांगतात कि *मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.* अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते. *हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे.* मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि *डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभ...

मृत्यूचं सत्य

*मृत्यूचं सत्य !*  झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं.  मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, "काही त्रास नाही ना झाला ?"  सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं.  काही क्षण असेच गेले...  आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, "झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?"  म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं.  फुल म्हणालं, "निमिषार्धासाठी वाईट वाटलं..  कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं.  पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा.  कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं.  पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो... "  "तू आ...

पिक्चर रस्त्यावरचा

*पिक्चर रस्त्यावरचा...🎥* आमच्या मित्राने पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ  झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख  आमच्या लहानपणी  तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रो हा  रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर  बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात  बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत.   .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर  फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा.गणपतीमधे 10 दिवस रोज ...

नकारात्मक प्रभाव

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *नकारात्मक प्रभाव* असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते. एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो, पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?  आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,  कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,  का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं? आणि एखादीला मनातुन मुलगी नको, मुलगी नको असा सतत धावा करुनही मुलगीच होते?  का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?   तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे, आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..     तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, ...

खेळ

*सध्या, वय ५० पेक्षा अधिक असलेल्या सर्वांना* *देवानं खूप काही भरभरून दिलं आहे.* *हे जरूर वाचा, म्हणजे लक्षात येईल.*  *आपल्या पिढीला,, विधात्याचे* *विशेष आशिर्वाद प्राप्त आहेत..* *आपण कधी जीव खाऊन पळत* *शाळेतून क्लासेसना गेलो नाही.* *शाळा सुटल्यावर छान रमत गमत,खेळत*  *घरी गेलो आहोत..* *आपण,, आपल्या ....* *खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो,* *नेट फ्रेंड्स सोबत नाही....* *तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे* *आपल्यासाठी सेफ होते..* *आपल्याला कधी ,,,* *बिसलेरी घ्यवी लागली नाही..* *आपण चार जणांत ,,* *एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो,* *पण आजारी नाही पडलो..* *आपण रोज पोटभर भात खाऊनही* *कधी स्थुल नाही झालो..* *आपण कितीदा अनवाणी फिरलो* *तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..* *आपल्याला हेल्दी राहण्यासाठी* *कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..* *आपली खेळणी आपणच बनवली.* *दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा* *आपल्यासाठी ,,,,* *गाडी,फोन किंवा पिस्तूल बनायच्या..* *आपला भरपुर वेळ ,,,,* *आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..* *आपल्या जवळ ,,,* *मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते....* *कारण आपल्या ज...

बेस्ट आउटलेट

STRESS MANAGEMENT लाखो जीव घेणारा क्रूरकर्मा  *हिटलर* ने पण आत्महत्या केली शेवटी. सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात. #मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. #आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण करु कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज*  आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* आत्महत्या केली नैराश्यातुन . आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल आमटे करजगी* आपलं जीवन संपवतात.  ही झाली सेलिब्रिटींची उदाहरणं  यातुन काय शिकायचं आपण.?  *पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात*. *वर शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात*.  *माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही....मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते*.. *किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहेर्याच्या आड लपवत असतो*, *लपवण्याचा ...

खेळ

*सध्या, वय ५० पेक्षा अधिक असलेल्या सर्वांना* *देवानं खूप काही भरभरून दिलं आहे.* *हे जरूर वाचा, म्हणजे लक्षात येईल.*  *आपल्या पिढीला,, विधात्याचे* *विशेष आशिर्वाद प्राप्त आहेत..* *आपण कधी जीव खाऊन पळत* *शाळेतून क्लासेसना गेलो नाही.* *शाळा सुटल्यावर छान रमत गमत,खेळत*  *घरी गेलो आहोत..* *आपण,, आपल्या ....* *खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो,* *नेट फ्रेंड्स सोबत नाही....* *तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे* *आपल्यासाठी सेफ होते..* *आपल्याला कधी ,,,* *बिसलेरी घ्यवी लागली नाही..* *आपण चार जणांत ,,* *एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो,* *पण आजारी नाही पडलो..* *आपण रोज पोटभर भात खाऊनही* *कधी स्थुल नाही झालो..* *आपण कितीदा अनवाणी फिरलो* *तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..* *आपल्याला हेल्दी राहण्यासाठी* *कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..* *आपली खेळणी आपणच बनवली.* *दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा* *आपल्यासाठी ,,,,* *गाडी,फोन किंवा पिस्तूल बनायच्या..* *आपला भरपुर वेळ ,,,,* *आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..* *आपल्या जवळ ,,,* *मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते....* *कारण आपल्या ज...

शहाण्या माणसांचा क्लास

‘शहाण्या माणसांचा क्लास’ “अरे, पण गरज काय आहे याची?” हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात. ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत.  रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील.  भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत.  अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील.  अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत.  पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील.  हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे.  अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणत...