आम्ही मध्यमवर्गीय
"आम्ही मध्यमवर्गीय" साधारण 20-25 वर्षा पूर्वी ' मध्यमवर्गीय ' ही जमात अस्तित्त्वात होती. तसं संपूर्ण भारतभर ती पसरली होती.. पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड ' होता. घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंड, नवरा बायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकुण कुटुंबसंस्था होती...एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6.. हे चित्र सगळीकडे सारखचं होत...काही ठिकाणी महिला वर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता.. पण आजच्या इतका नाही..म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्री वर्गाची सत्ता होती,एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःच एक गणित होतं, पक्क गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.. अन्नाच्या बाबतीत,"पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको" असा शिरस्ता होता..माझी आजी नेहमी म्हणायची,"खावून माजावं, पण टाकून माजू नये.." कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायच,आंब्याचा रस असेल तर भाजी कमी लागते, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्या तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी साधी समीकरण असायची.. घरातली माणसांची जेवणं...