Posts

Showing posts from June, 2020

उपचार डिटाक्सिफिकेशनचे

* होम क्वारंटाईनमध्ये काय काळजी घ्यावी त्यांच्या मी टीप्स पाठवीत आहे. त्यातील जमेल तेवढे जास्तीत जास्त वेळा करा. * हे सर्व उपचार डिटाक्सिफिकेशनचे आहेत व शरीर आतून जसजसे स्वच्छ, शुद्ध व पवित्र होत जाईल (Internal Cleanliness, Purity and Sanity) तसतसे स्वास्थ्य सुधारत जाईल. *कारण ही शरीरात साचून राहिलेली विजातीय विषद्रव्ये हाच खरा रोग असून त्यांच्या विघटनाच्या म्हणजेच सडण्याच्या प्रक्रियेतूनच हे जंतू म्हणा, bacteria म्हणा, बुरशी म्हणा किंवा व्हायरस म्हणा हे निर्माण होत असतात. *शरीर मल, मूत्र, घाम व कुपित वायू या द्वारे आतडी, मूत्रपिंडे, त्त्वचा व फुप्फुसे यातून सतत त्यांचा निचरा करून आपले स्वास्थ्य कायम राखीत असते. * आपण फक्त त्या संबंधित सवयींचा अंगिकार करायचा इतकेच. विचार करा व काळजी घ्या. ती माहिती पाठवीत आहे. धन्यवाद ! All The Best !   *DIET INTAKE*  १. आपण दोन वेळा जेवतो, तेव्हा दोन वेळा व्यवस्थित मलविसर्जन झालेच पाहिजे.  *दोन जेवणात ६ ते ८ तासांचे अंतर ठेवा. रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात ३ तासांचे अंतर ठेवा. * त्यासाठी दोन्ही जेवणात भरपूर कोशिंबीर (फक्त काकडी, टोमॅटो,...

सहजीवन म्हणजे

सहजीवनाची ३० वर्षे.... सहजीवन म्हणजे, स्वप्न बघणं, साद घालणं, हवं नको सांगणं, अटीतटीला येऊन कधी तुटेल की कायसं वाटणं. सहजीवन म्हणजे, उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकून कधी तुटेपर्यन्त ताणायचं नाही. सहजीवन म्हणजे अनेक होकार,  किती तरी नकार सहजीवन म्हणजे, एकमेकांच्या भावनांचा सन्मान, एकमेकांच्या माणसांचा स्वीकार. सहजीवन म्हणजे, एकमेकांचं मन समजून घेणं, एकमेकांच्या दु:खावर फुंकर घालणं. सहजीवनात नाही एकाचीच भरारी, नाही एकाचीच मक्तेदारी. सहजीवनात नसतं बंदिस्त, दोघांचंच, दोघांपुरतच. कुटुंब,गणगोत, आप्त, मित्र सामावून घेणं. पंख फुटून भरारणाऱ्या पिल्लांना आनंदाने निरोप देणं. चुकली माकली थकली तर उबदार सेज तयार ठेवणं. सहजीवन म्हणजे परस्परांसाठी हमेशा खुला चौथा कमरा 'जा त्या घरी' न म्हणणारा विश्वासाचा कोपरा. सहजीवन म्हणजे चुकल्या-माकल्याचा सहज दिला जाणारा हिशोब सहजीवनात 'सॉरी' म्हणायला कशासाठी असावा संकोच? सहजीवन म्हणजे पिकतांना मिळून आठवायची सारी कथा, 'माझ्याआधी तू जायचं नाही' एकमेकांना घालायच्या शपथा!!

विनाशातून विनाशाकडे की आयुषकडे

*विनाशातून विनाशाकडे की आयुषकडे!!* (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती)       एका अर्थाने हे बरेच झाले देशाची इडा-पीडा आता गेली आहे असे काही काळ तरी म्हणता येईल. याच व्यक्तीच्या प्रभावामुळे योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध यांसारख्या आयुष मंत्रालयानी मान्यता दिलेल्या एकाही चिकित्सा पद्धतीचा अंशमात्रही स्वीकार देशाच्या प्रशासन व्यवस्थेनी केलेला नाही. अॅलोपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये कोरोनावर एकही खात्रीलायक तपासणी व उपचार किंवा औषध नसताना *प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, रेम्डेसिवीर, लोपींनावीर-रोटिनविर, एण्टेरोफुरोन B1 असल्या अत्यंत विषारी औषधांचा देशातील नागरिकांवर प्रयोग कुणाच्या इशाऱ्यावर करण्यात आला हे देशातील नागरिकांना कळायलाच हवे.* या भयंकर औषधांपेक्षा *हार्वर्ड मेडिकल स्कूलनी आपल्या प्रदीर्घ संशोधनानंतर व युरोपच्या लंडन येथील कॉमन कोल्ड लॅबच्या वैज्ञानिकांनी जवळजवळ १९४९ ते १९९९ या पन्नास वर्षांच्या अब्जावधी स्टरलिंग पाउंड खर्च करून केलेल्या संशोधनानंतर असे सिद्ध केले की, ILU म्हणजे इंफ्लुएंजा लाइक इलनेस वर कोणतीही लस अॅलोप...

मुलांना आज काय शिकविण्याची गरज आहे

*मुलांना आज काय शिकविण्याची गरज आहे* 👍रात्री लवकरच झोपणे व सकाळी लवकरच उठणे. 👍किमान 5/10 मिनिटं एका जागेवर शांत बसणे , एकाग्रता वाढविणे . 👍सलग एक ते दोन तास एका जागेवर बसून वाचन , लेखन , अभ्यास करण्याची सवय लावणे . 👍चांगल्या व आवश्यक सूचना ऐकूण घेवून त्यांवर विचार करण्याची सवय लावणे . 👍घरातील लहान मोठ्या व्यक्तींशी चर्चा , संवाद साधने , विचारविनिमय करणे . 👍आपली मते घरांतील व्यक्ती , शिक्षक , सहकारी मित्र यांचे बरोबर व्यक्त करणे . 👍चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे . 👍खरे काय , खोटे काय याची वास्तवाशी सांगड घालून पडताळा घेणे व सत्याच्या मार्गानेच जाणे . 👍व्यवहारिक द्रुष्ट्या योग्य काय व अयोग्य काय याची समज येणे . 👍अंधश्रद्धा न मानता विदवा विज्ञानाच्या  आधारावर , प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा प्रयत्न करणे . 👍मोबाईल , T V , सोशियल मेडिया याचा कामापूरता व मर्यादित वापर करणे . 👍घरातील व घराबाहेरील कामे मनापासून करण्याची सवय लावणे . 👍शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी नसून माणुस म्हणून जगण्यास लायक बनविण्यासाठी ...

साठी कोणा साठी

*साठी कोणा साठी?* आयुष्याच्या डोंगरमाथ्यावरून खाली उतरायला सुरुवात झाली की पहिला टप्पा लागतो साठीचा!  साठी सुरू झाली की शांतीपाठ करतात, "साठी बुद्धी नाठी" अश्या म्हणीपण प्रचलित आहेत.... असे काय होते नेमके साठी सुरू झाल्यावर ज्यासाठी हे सगळे? सांगू?..... साठी म्हणजे मोठे संक्रमण असते. आणि ते सोपे नसते! मध्यान्हीचा सूर्य मावळतीकडे जायला लागल्यावर जश्या सावल्या लांब जाऊ लागतात तसेच साठीचे असते.वयाच्या विशीत ज्या नोकरीची/कामाची सुरुवात केली त्याला पूर्णविराम देऊन आयुष्याच्या पूर्णविरामाकडे वाटचाल सुरू करण्याचा पहिला टप्पा म्हणजे साठी! साठी म्हणजे निवृत्तीची सुरुवात असते. साधारणपणे या वयात येईपर्यंत मुले मोठी होऊन- नोकरी लग्न संसार या टप्प्यावर पोचलेली असतात.नातवंडे देखील आलेली किंवा येऊ घातलेली असतात. कालपरवापर्यंत काका काकू मावशी असणारे आपण अचानक आजी आजोबा श्रेणीत पोचतो! नाही म्हणले तरी त्याचा थोडा धक्का बसतोच! साठी एकदम ज्येष्ठ नागरिक श्रेणीत पोहोचवते!  नाही, म्हणजे पिकलेले केस, टक्कल, सुरकुत्या यांनी रूपावर आक्रमण केलेले असतेच पन्नाशी पासून!  पण आता जोडीला BP Sugar Cholest...

माणसाच्या स्वभावाला औषध

माणसाच्या स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, पण मानसोपचारात स्वभावालाही औषध आहे. हे उपचार करून घेण्यासाठी सर्वात आधी मनाची तयारी लागते. रुग्ण व डॉक्टर या दोघांनीही वेळ, चिकाटी व प्रामाणिकपणा ठेवला तर काही वर्षांनी हा आजार बरा होऊ शकतो. व्यक्ती बहिर्मुखी आहे की अंतर्मुखी, प्रज्ञाजीवी आहे कीनाही, किती ओजस्वी आहे, नतिकता कशी आहे, आक्रमकता किती आहे, अपरिचित परिस्थितीत कशी वावरते इत्यादी गुणांवरून स्वभाव कळतो. स्वभाव कळल्यावर व्यक्तीची प्रतिक्रिया कशी असेल याचा साधारण अंदाज लावता येतो. स्वभावांचे वर्गीकरण स्वभावाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. मोघम सांगायचे म्हणजे- ‘शिस्तबद्ध आणि भित्रेपणा’, ‘मानसिक स्थर्य’ आणि ‘अंतर्मुख-संशयीपणा’ या तीन गुणांचे किती प्रमाण आहे, यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव साधारण कळतो. थोडय़ा प्रमाणात शिस्त चांगली असते. पण अती झाले तर काम करायला खूप वेळ लागतो, काही बदल झाला तर सहन होत नाही आणि इतरांनी केलेले काम पटत नाही. आजूबाजूच्या लोकांना सारख्या सूचना देऊन, असमाधान दाखवून ते हैराण करत असतात. सुरक्षित राहण्यासाठी थोडा भित्रेपणा असावा लागतो, पण अतिभित्रेपणा असलेली ...

IQ, EQ, SQ, AQ

IQ, EQ, SQ, AQ .....According to psychologists, there are four types of intelligence:  1) Intelligence Quotient (IQ) 2) Emotional  Quotient (EQ) 3) Social Quotient (SQ) 4) Adversity Quotient (AQ) 1. Intelligence Quotient (IQ): this is the measure of your comprehension ability", solve maths; memorize things and recall subject matters. 2. Emotional Quotient (EQ): this is the measure of your ability to maintain peace with others; keep to time; be responsible; be honest; respect boundaries; be humble, genuine and considerate. 3. Social Quotient (SQ):  This is the measure of your ability  to build a network of friends and maintain it over a long period of time. People that have higher EQ and SQ tend to go farther in life than those with high IQ but low EQ and SQ. Most schools capitalize in improving IQ level while EQ and SQ are played down. A man of high IQ can end up being employed by a man of high EQ and SQ even though he has an average IQ. Your EQ represents your chara...

स्वसुखाआधी दुसऱ्याच्या सुखाचा

एक मुलगा एका दुकानावर काम करत असतो .त्या कामातून मिळणाऱ्या पैशातून त्याचे कसेबसे दोन वेळचे जेवण होते.तो रोज आपल्यासाठी चार चपात्या बनवत असतो.एक दिवस तो चपात्या बनवून हात धूण्यासाठी बाहेर जातो ,तोच एक चपाती कमी झाली त्याला दिसते ...असे दोन तीन दिवस सारखे झाले...शेवटी त्या चपात्या गायब करणाऱ्या म्हणजे उंदराला त्याने पकडले व त्याला खडसावले..तो म्हणाला, का रे माझ्या चपात्या गायब करतोस, मलाच खायला पुरेसे नाही . इकडे मी कसेबसे माझे मी भागवतो,मी माझ्या जीवनाला त्रासलो आहे. सांग मी काय करू कसा जगु माझी कशी प्रगती होईल ? त्यावर तो उंदीर म्हणाला, अरे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला काय विचारतोस....एका मोठ्या पहाडावर भगवान गौतम बुद्ध बसले आहेत त्यांना जावून तुझे प्रश्न विचार ते तुला ऊत्तर देतील.....तो मुलगा त्याच्या जीवनाला इतका कंटाळला होता की त्याने उंदराची गोष्ट लगेच ऐकली. त्याने आपल्या मालका कडुन चार पाच दिवसाची सुट्टी मागितली व तो भगवान गौतम बुद्धांना आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारण्यासाठी वाटेने निघाला....प्रवास खूप लांबचा होता.रात्र झाली, त्याला थांबणे गरजेचे होते, त्याला एक महाल दिसला . त...

विदेशी झाडे का नकोत

*विदेशी झाडे का नकोत ?*  *मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या. निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे ....*  *दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला ....*  *आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो .... पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली ....*  *अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे ...*   *या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी...

चिनी वस्तूंवर बहिष्कार एक स्वप्न

बेधुंद लहरी - मराठी अनुदिनी| चिनी वस्तूंवर बहिष्कार एक स्वप्न ! img विशेष आभार: गिरीष टिळक  7 तुम्ही ज्या मोबाईलवरून चिनी मालाच्या बहिष्काराचे आवाहन करत आहात त्याचे निम्म्यापेक्षा जास्त स्पेअर पार्ट चिनी बनावटीचे आहेत, किंवा तो संपूर्ण फोनच चिनी बनावटीचा आहे. तुरम्ही जे कॉम्प्युटर वापरताय त्याचे निम्मेअधिक स्पेअर पार्टस चिनी बनावटीचे आहेत. जगातील सर्व मोठे ब्रॅण्ड्स चीन मध्ये असेम्बल होतात. तुमच्या लॅपटॉप मधले अर्ध्यापेक्षा जास्त पार्टस चिनी आहेत. तुम्ही वापरत असलेल्या वाहनाचे कितीतरी पार्टस चीन मधून आयात केलेले आहेत. तुमच्या घरात फ्रिज आहे ? मग त्याचे पार्टस चीन मध्ये बनलेले आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही वापरात असलेली साबण, पावडर, शाम्पू, सेंट, डियो, पावडर यासाठी लागणारे कितीतरी केमिकल्स चीनमधून आयात होतात.  तुमच्या घरात असणाऱ्या प्लास्टिक वस्तूंपैकी कितीतरी वस्तू चीनमधून आयात केलेल्या आहेत, किंवा त्याचा कच्चा माल चीनमधून आणलेला आहे. तुम्ही बाहेर एखाद्या शोरूम मधून फर्निचर विकत घेतलेलं आहे ? मग तेसुद्धा चीन मधून आयात केले असण्याची ८०% शक्यता आहे. तुमच्या घरात सोलर वॉटर हिटर आहे...