स्वसुखाआधी दुसऱ्याच्या सुखाचा
एक मुलगा एका दुकानावर काम करत असतो .त्या कामातून मिळणाऱ्या पैशातून त्याचे कसेबसे दोन वेळचे जेवण होते.तो रोज आपल्यासाठी चार चपात्या बनवत असतो.एक दिवस तो चपात्या बनवून हात धूण्यासाठी बाहेर जातो ,तोच एक चपाती कमी झाली त्याला दिसते ...असे दोन तीन दिवस सारखे झाले...शेवटी त्या चपात्या गायब करणाऱ्या म्हणजे उंदराला त्याने पकडले व त्याला खडसावले..तो म्हणाला, का रे माझ्या चपात्या गायब करतोस, मलाच खायला पुरेसे नाही . इकडे मी कसेबसे माझे मी भागवतो,मी माझ्या जीवनाला त्रासलो आहे. सांग मी काय करू कसा जगु माझी कशी प्रगती होईल ? त्यावर तो उंदीर म्हणाला, अरे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला काय विचारतोस....एका मोठ्या पहाडावर भगवान गौतम बुद्ध बसले आहेत त्यांना जावून तुझे प्रश्न विचार ते तुला ऊत्तर देतील.....तो मुलगा त्याच्या जीवनाला इतका कंटाळला होता की त्याने उंदराची गोष्ट लगेच ऐकली. त्याने आपल्या मालका कडुन चार पाच दिवसाची सुट्टी मागितली व तो भगवान गौतम बुद्धांना आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारण्यासाठी वाटेने निघाला....प्रवास खूप लांबचा होता.रात्र झाली, त्याला थांबणे गरजेचे होते, त्याला एक महाल दिसला . त्याने तिथे कळवळा करून आसरा घेतला...त्या घरातील महिलेने त्या मुलाला तिकडे जाण्याचे कारण विचारले.त्यावर त्याने सर्व वृत्तांत त्या महिलेला सांगितला...नंतर ती महिला म्हणाली तु तिकडे जातच आहेस तर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर विचारून ये...त्या मुलाने होकारार्थी मान हलवली.
महिला म्हणाली, माझी मुलगी विस वर्षाची आहे पण अजूनही एक शब्द सुद्धा नाही बोलली , ती कधी बोलेल एवढं विचार..असे म्हणून ती रडायला लागली...त्याला तिची सांत्वना करता येईना...त्याने हो म्हटलं.....सकाळ झाली व तो जायला निघाला.जाता जाता दिवसाची सायंकाळ झाली कळले नाही. मोठे मोठे पहाड आले,त्याला रस्ता दिसत नव्हता तोच त्याला एका झाडाखाली बसलेला विदूषक दिसला त्याने विदूषकाला विनवणी केली...मला या पहाडातून रस्ता दिसत नाही आहे तो मला पार करून द्या. त्यावर विदूषकाने तिकडे जाण्याचे कारण विचारले त्यावर त्याने सांगितले..विदूषक म्हणाला ठिक आहे मी रस्ता पार करून देतो पण माझा पण एक प्रश्न आहे तो तेवढा विचार त्याने हो म्हटलं.....मी विस वर्षापासून तपश्चर्या करत आहे तर मला मोक्ष कधी मिळणार हे विचार.....मग विदूषकाने जादूई काडी फिरवून त्याला पहाड पार करून दिले. तो सपाट रस्त्यावर आला तोच त्याला नदी दिसली. आता ही नदी कशी पार करायची हा मुद्दा होता .मग त्याला मोठे कासव दिसले त्याने कासवाला त्याच्या पाठीवर नदी पार करून देण्याची विनंती केली . कासवाने सुद्धा भगवान गौतम बुद्धांना प्रश्न विचारावयास सांगितलं.....मला खूप मोठ व्हायचं आहे त्यासाठी मी काय कराव हे विचार.......कासवाने नदी पार करून दिली..मग तो गौतम भगवान बुद्धांच्या आश्रमात पोहचला..तोच भगवान गौतम बुद्ध म्हणाले कि, मी तुझ्या कोणत्या तीन प्रश्नांची उत्तरं देणार... कारण ते अंर्तयामी होते . त्यावर त्या मुलाला प्रश्न पडला आपल्याला तर चार प्रश्न विचारायचे होते. आता कोणाचे प्रश्न विचारावे व कोण्या एकाचा सोडावा हे समजत नव्हते. त्याला डोळ्यात आसवे असलेली महिला, विस वर्षाची तपश्चर्या असलेला विदूषक,अन पाठी वर नदी पार करून देणारा कासव हे तिघे अन स्वतःचे प्रश्न काय करावे ? शेवटी त्याने निर्णय घेतला .मला कशीतरी नोकरी आहे व कसेबसे पोट भरतो आहे .पण बाकीच्यांचे प्रश्न व समस्या महत्वाचे आहेत. त्याने त्या भेटलेल्यांच्या प्रश्नांची उत्तरे विचारली.....मग भगवान गौतम बुद्धांनी उत्तरे सांगितली ....महालातील महिलेच्या मुलीचे लग्न ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून ती बोलेल, विदूषक जेव्हा त्याची जादूई कांडी सोडेल त्या दिवशी त्याला मोक्ष मिळेल, कासव जेव्हा त्याचे वरचे कवच काढून टाकेल तेव्हा तो खूप मोठा होईल....
भगवान गौतम बुद्धांनी सांगितेले उत्तरे घेवून तो परतीच्या वाटेने निघाला. प्रथम कासवाला त्याचे उत्तर सांगितले . सांगितल्याप्रमाणे कासवाने लगेच कवच काढून टाकले तर त्यातून भरपुर मोती सांडले. कासव म्हणाला मी या मोत्यांचे काय करणार . ते तु घेवून जा. कासव मोठा होवून निघून गेला . तो विदूषकाजवळ आला व उत्तर सांगितलं त्यावर लगेच विदूषकाने ती जादूई कांडी त्या मुलाला दिली व त्याला मोक्ष प्राप्त झाला . महालातील महिलेला भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मुलीचे लग्न होताच ती बोलायला लागेल हे एकल्यावर महिलेने त्या मुलीचे लग्न त्या मुलाशीच लावून दिले व लगेच ती मुलगी बोलायला लागली....
सर्व काही दुसऱ्याला मदत करतांना आपोआप प्राप्त झाले .
तात्पर्य:-
त्या मुलाने स्वतःचा विचार न करता बाकीच्यांचाच विचार केला...स्वतःचे प्रश्न बाजुला ठेवले . विचारले असते तर त्याला बाकीचे उत्तरे मिळाले नसते.म्हणून जो स्वतः आधी दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो तो नेहमी सुखात असतो.... पैशांच्या सुखापेक्षाही आंतरिक सुखाची किंमत कोणत्याही रकमेत मोजता येणार नाही....
नेहमी आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे- स्वसुखाआधी दुसऱ्याच्या सुखाचा व हिताचा विचार करणे ...सुख आपोआप आपल्या पायी लोटांगण घालेल... !
Comments
Post a Comment