Posts

Showing posts from August, 2022

इमोशनल मॅनेजमेन्ट

मूल जेव्हा टीका झेलत वाढतं; ते प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या वृत्तीचं होतं.   मूल जेव्हा सतत विरोध सोसत वाढतं; तेव्हा ते भांडखोर बनतं.   मूल जेव्हा उपहासाचा विषय बनतं; तेव्हा ते भीत्र आणि बुजरं बनतं.   मुलाला जेव्हा स्वतःबद्द­ल लाज वाटायला लागते तेव्हा त्याच्या मनात अपराधीपणाची भावना घर करुन बसते.   मूल जेव्हा सहनशिल बनतं; तेव्हा त्याच्या अंगी चिकाटी निर्माण होते.   मूल जेव्हा प्रमाणिकपणे वागायला शिकतं; तेव्हा ते इतरांशीही न्याय बुद्धीने वागतं.  मूल जेव्हा सुरक्षित वातावरणात वाढतं; ते इतरांवर विश्वास टाकयलाही शिकतं.   मूल जेव्हा त्याच्या लहान सहान गोष्टींसाठी इतरांच्या कौतुकास पात्र ठरतं; तेव्हा ते स्वतःवर प्रेम करायला लागतं.   मूल जेव्हा आनंदानं स्वीकारलं जातं, मैत्रीनं वाढवलं जातं तेव्हा प्रत्येक लहान सहान गोष्टीतला आनंद शोधायला आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीतून प्रेम शोधायलाही ते शिकतं.   डोरोथी लाॅ नोल्टे (लहान मुलांना कसं वाढवावं या संदर्भातील ही कविता जगप्रसिद्ध आहे  इंग्रजीमधल्या या कवितेचा स्व...

दहीहंडी गोविंदात्सोव

*आत्मा हरवलेला उत्सव - दहीहंडी गोविंदात्सोव* *महाराष्ट्रातील गोविंदा दहीहंडीचे मूळ कोकणातील आहे. हे खरे आहे. पण त्याचे निश्चित मूळ म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील बाणकोट भाग, दापोली भाग, मंडणगड, खेड तालुक्यातील, तसेच त्या जवळच्या सध्याच्या रायगड जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागातील (महाड, आंबेत, श्रीवर्धन) बाळ्ये/बाल्या, कुणबी आदी लोकांमधून आले आहे असे वाटते. यांना कृष्णबाळ यावरूनच बाळा, बाळ्या असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश 'बाल्या' असा झाला. हे बाणकोटी लोक 'ळ' चा उच्चार 'ल' असा करतात.*    *दक्षिण मुंबईत हे बाल्या लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त फार पूर्वी गेल्या शतकात दिडशे वर्षात स्थायिक झालेत. गिरगाव, खेतवाडी, माझगाव, घोडपदेव, लालबाग, परळ, वरळी या भागात हे बहुतांश लोक सुमारे शंभर दिडशे वर्षांपूर्वी मिलमध्ये बदली कामगार म्हणून कामाला किंवा त्या वेळच्या श्रीमंत लोकांकडे त्यात विशेषतः गुजराती, मारवाडी लोकांकडे घरगडी म्हणून कामाला होते. यांना रामा गडी असेही म्हटले जाते.*   *हे लोक त्याकाळी छोट्या प्रमाणावर दही-हंडी साजरी करत आणि गणेशोत्सवात त्यांच्या पारंपारिक पद्धत...

खरी_अंधश्रद्धा_कोणती

 *खरी_अंधश्रद्धा_कोणती* ? फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायाना मानले शिवरायांनी संत तुकारामाना मानले, संत तुकाराम महाराज यानी विठ्ठलपांडुरंगाला मानले, पांडुरंग दगडाचा देव, त्या मुर्तीला पूजतो मी, समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. ! माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी, का? --अन्नदान होते --दवाखाना चालतो --शिक्षण संस्था चालते --परिसराचा विकास होतो आणि हो-- -देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो -! -- मुर्तीकार -- फुलझाडे लावणारा शेतकरी -- फुले विकणारा माळी -- बेल आणणारा मजूर -- बेल विकणारा गुरव -- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार -- हॉटेल चालक -- स्टेशन वरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक -- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर हे सर्वजण काही भटजी नसतात हो या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो ! म्हणून मायच्यान सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी-! दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी -! दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी "पूजा करा पूजा" म्हणत भटजीही फिरत नाही घरोघरी अभिषेक करताना देतो ज्ञानाचीच शिदोरी-! --कशी--? -तो सूर्याला देवता मानतो, -तो पाण्याला...

द टर्न ऑफ टाईड

आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.  त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली... शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले ... ‘‘मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची खात्रीही देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी.’’  गॉर्डन तयारच होते... त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले,  ‘‘या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा. पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको. दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’  दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले...  सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली...  त्यावर लिहिले होते ... ‘ऐका.’  काय ऐकायचे... ?  त्यांना प्रश्‍न पडला...  ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले... एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले... झाडीतून वाह...

पता ही नहीं चला !

😊 *Sixteen to Sixty* *कैसे कटा 16 से 60*  *तक का यह सफ़र,*  *पता ही नहीं चला ।* *क्या पाया, क्या खोया,* *क्यों खोया,* *पता ही नहीं चला !* *बीता बचपन,*  *गई जवानी*  *कब आया बुढ़ापा,*  *पता ही नहीं चला ।* *कल बेटे थे,*  *कब ससुर हो गये,*  *पता ही नहीं चला !* *कब पापा से*  *नानू बन गये,*  *पता ही नहीं चला ।*  *कोई कहता सठिया गये,* *कोई कहता छा गये,*  *क्या सच है,*  *पता ही नहीं चला !* *पहले माँ बाप की चली,* *फिर बीवी की चली,*  *फिर चली बच्चों की,*  *अपनी कब चली,*  *पता ही नहीं चला !* *बीवी कहती*  *अब तो समझ जाओ,*  *क्या समझूँ,*  *क्या न समझूँ,*  *न जाने क्यों,*  *पता ही नहीं चला !*          *दिल कहता जवान हूँ मैं,* *उम्र कहती है नादान हूँ मैं,*  *इस चक्कर में कब*  *घुटनें घिस गये,*  *पता ही नहीं चला !* *झड़ गये बाल,*  *लटक गये गाल,*  *लग गया चश्मा,*  *कब बदली यह सूरत*  *पता ही नहीं चला !* *समय बदला,*  *मैं बदला*  *बदल गई म...

B-Mart Concept

मी खूप चिंतेत आहे, देशाची स्थिती वाईट आहे, अतिशय नाजूक परिस्थितीतून जात आहे...... वाहनांच्या शोरूममध्ये जा, नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सुरू आहे, ग्राहकांना सहा महिने वाहनांची प्रतीक्षा करावी लागेल.... 😎 रेस्टॉरंट्समध्ये एकही टेबल रिकामे नाही, अनेक रेस्टॉरंट्सवर रांग!  😎 दारुच्या दुकानांवर लाईन तुटत नाही, जेवणात चिकन लेगपेक्षा कमी मागणी नाही. शॉपिंग मॉल पार्किंगसाठी जागा नाही, इतकी गर्दी.......😎 अनेक मोबाईल कंपन्यांचे मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक आहेत, ऍपल लॉन्च होताच स्टॉक संपत आहे......😎 ऑनलाइन शॉपिंगच्या काळात कामाच्या दिवसातही संध्याकाळी बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याने ठप्प अशी परिस्थिती रोजच निर्माण होते!  😎 ऑनलाइन शॉपिंग उद्योग तेजीत आहे....😎 मात्र पेट्रोलचे दर वाढवून त्यांचे कंबरडे मोडल्याचे लोक सांगत आहेत जेव्हा निरर्थक दिवे चालू असतात, पंखा चालू असतो, माझ्या घरात टीव्ही असतो तेव्हा मला वाईट वाटत नाही 😀 पण जेव्हा विजेचे दर वाढतात तेव्हा माझा विवेक हलतो 😎   जेव्हा माझी मुलं सोळा अंश सेंटीग्रेड तापमानात AC वर ब्लँकेट लावून झोपतात 😀 मी काहीच बोलू शकत नाही पण जेव्हा व...

दुर्दैवी अश्या २ घटना

*आजच्या अत्यंत दुर्दैवी घटना आणि शिकवण* मित्रहो, आज अतिशय दुर्दैवी अश्या २ घटना घडल्या आणि आपल्याला खूप काही शिकवून गेल्या.  आज पहाटे ५.०५ मिनिटांनी महाराष्ट्रातील तडफदार नेते विनायक मेटे यांचे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघातात निधन झाले. मेटे हे काल रात्री १.३० वाजता बिडवरून मुंबईला स्वतःच्या फोर्ड इंडेव्हर या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मोठ्या गाडीने निघाले होते असे समजते. या प्रवासात पहाटे त्यांच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुढील वाहनाला डाव्या  बाजूने धडक बसली असे गाडीचे फोटो पाहिल्यावर कळते.  दुसरी घटना म्हणजे भारतातील शेअर मार्केटमधील नामवंत असे अतिशय श्रीमंत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या अवघ्या ६२ व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार व्यवसायाने सी. ए. असलेल्या झुनझुनवाला यांनी १९८५ साली अवघ्या रु.५०००/- इतक्या छोट्या रकमेने शेअर मार्केट मधील आपली गुंतवणूक सुरू केली आणि आज ते काही हजारो कोटींचे मालक होते. त्यांचे फोटो पाहिल्यावर त्यांचे वजन जास्त असावे असे दिसते आणि त्यामुळे त्यांना इतरही शारीरिक व्याधी असाव्यात यात शंका ...

असे हे नासिक

*"असे हे नासिक..."* भाग-६... *" विद्येच्या वाटेवर..."* मराठेशाही संपुष्टात आली आणि नासिकच्या तीर्थक्षेत्र स्वरूपाबरोबर तिथे इतर अनेक बदल घडून आले. १८४० साली "सार्वजनिक वाचनालय" सुरू झाले.माझ्या आठवणी प्रमाणे ते सरकार वाड्याच्या मागील भागात होते. १८५४ साली धर्मांतर करून नव्याने ख्रिस्तधर्मात आलेल्या शरणार्थींसाठी "शरणपूर कॉलनी" निर्माण झाली.  १८५७च्या उठावानंतर १८६१मध्ये देवळाली येथे सैन्यासाठी कायम तळ (कॅन्टोन्मेंट) निर्माण झाला. १८६१मधे इंग्रजांनी 'ॲग्लो व्हर्नाक्युलर स्कूल' सुरू केले. १८६२ला नासिक रोड रेल्वे स्टेशन झाले. १८६४-नासिक म्युनिसिपालटीची स्थापना. १८६९-नासिक जिल्हा स्थापना. १८९४-नासिक व पंचवटीस जोडणारा बारमाही पूल "व्हिक्टोरिया पुलाची" निर्मिती. १८९६ स्थानिक टिळकवादी मंडळींनी "शिवाजी विद्यालयाची" स्थापना केली. १९१०- पोलिस अधिकारी प्रशिक्षण संस्था,(PTC) १९२२- सैन्यातील व पोलिस अधिका-यांच्या सोयीसाठी नासिक रोड येथे "डिस्टिलरी"निर्माण झाली. १९२७- नासिक रोडला "सिक्युरिटी प्रेस" सुरू झाला. १९४...