Posts

Showing posts from July, 2022

आई

            *🙏🏻 आई🙏🏻* *🌿काहीच बोलता न येणारी बाळं*        *बोलायला शिकतात* *बोलायला शिकवलेल्या आईला*       *कधी कधी खूप खूप बोलतात🌿* *🌿मान्य आहे पहिला संघर्ष*         *आईशीच असतो* *बोलताना, तिच्या भावनांचा अर्थ*       *समजून का घ्यायचा नसतो?🌿* *🌿नको म्हणा, रागवा, तिरस्कार करा*     *हवे तसे बोला, मस्करी करा* *ती कायम तुमच्या पाठीशीच असते*     *कारण ती वेडी असते🌿* *🌿नाही जेवला, अभ्यास नाही केला,*     *लवकर नाही उठला, नाराज दिसला* *सतत विचारपूस करत राहते*    *कारण ती वेडी असते🌿* *🌿तुम्हाला रागावते, पण तीच रडते*       *मोठे व्हावे तुम्ही म्हणून सतत झटते* *स्वतःला विसरते, तुमच्या विश्वात रमते*      *कारण ती वेडी असते🌿* *🌿जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते*     *हरला तर खंबीर बनवते* *तुम्ही असाल कसेही,* *जीवापाड जपते*      *कारण ती वेडी असते🌿* *🌿ती नाही कळणार , नाही उमगणार* ...

कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,, आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली ● स्वतःला वाचविण्यासाठी  झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली ● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला  ● झाडावरच बसून  असहाय मुंगीला मरताना पाहू लागला ● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली ● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल ● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली ● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं ★ पारधी येणार हेच विसरून गेलं ★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला •कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले.  【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】  *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.* _मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. *सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻* *हा जन्म पुन्हा नाही...😊*  विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपल...

पावसाला विचारलं तुझं वय काय?

*आज मी पावसाला विचारलं तुझं वय काय?* *पावसानं मला सुंदर उत्तर दिलं, जर तू पावसात सैर वैरा आनंदात धावत असशील तर माझं *वय १०* *जर तू पावसात कविता लिहित असशील तर माझं वय १६* *जर तुला पावसात विरह जाणवत असेल तर माझं वय १८* *जर तुला पावसात ट्रेकिंग ला जावंस वाटत असेल तर माझं वय २४* *जर तुला पावसात गजरा घ्यावासा वाटत असेल तर माझं वय ३०* *जर तुला मित्रां सोबत पावसात भिजत भजी खावी असं वाटत असेल तर माझं वय ४०* *जर तुला पावसात छत्री घ्यावी लागली, तर माझं *वय ५०* *मग मी पावसाला म्हणालो* *"अरे एक काय ते वय सांग,*  *शब्दात गुंतवू नकोस!"* *स्मितहास्य देऊन म्हणाला पाऊस, तू जसे अनुभवशील* *तेच माझे वय!!* ☔ *Happy Morning*🌞

ते सध्या काय करतात?

ते सध्या काय करतात??? मागच्या रविवारी आमचा शाळकरी ग्रुप एकत्र आला. १९७१ सालचे मॅट्रिकचे विद्यार्थी..  एका मित्राने पुढाकार घेऊन सर्वांशी संपर्क केला आणि दोन दिवसांचे गेट टुगेदर अरेंज केले....   ४८ वर्षांच्या प्रदीर्घ गॅपनंतर सर्वांची भेट होणं, एक वेगळाच अनुभव होता.  तेव्हाचे राजेश खन्ना, अमिताभ, विनोद खन्ना आता सरसकट ए.के.हंगल; तर हेमा,जया,रेखा,श्रीदेव्या, सरसकट लीला मिश्रा झाल्या होत्या.....   विशेष म्हणजे प्रत्येकाची स्वतःची एक खासियत होती. त्यातलाच एक मित्र.  त्याला एकच छंद होता.  "रिकाम्या लोकांना मनोरंजनाचे साधन पुरवायचे...."   "रिकामे लोक.." ही परंपरा आजचीच नसून थेट पुरातन काळापासून चालत आलेली आहे..... शाळेत येतांना ह्याची एकच सवय होती.  एखाद्या चौकात उभा राहायचा. आम्हां मित्रांना त्याच्याजवळ बोलवायचा आणि आकाशाकडे बोट करून काहीतरी दाखवायचा.  आम्ही नकळत आकाशाकडे बघायचो. तो आम्हाला हळूच कानात सांगायचा,  "फक्त पाच दहा मिनिटे मी दाखवतो तिकडे बघत रहा आणि हळूच दप्तर घेऊन सटका.." आम्ही तसंच करायचो. पाचेक मिनिटांत आमच्या भोवती पन्नासेक लोक...

गेटटूगेदर

*गेटटूगेदर हे एक औषध आहे आपल्याला पटणार नाही पण हे नक्की वाचा  त्यातील १०% जरी  जमले तरी  तूम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल* का असावे  ? गेट टुगेदर                           ४0शी नंतर  गेट टूगेदर चे महत्त्व वरचेवर मित्रांच्या, मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा  मनसोक्त पैसे वेळ खर्च करा आयुष्य  मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा  शेवट होईल  तेंव्हा  इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत  नेता येणार नाही .!  मग जीवनात  खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे  तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो  त्या गोष्टी  केल्याच पाहिजेत . आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच  चिंता करु नका . कारण आपला  देह जेंव्हा  मातीत मिसळून जाईल तेंव्हा  कुणी आपले  कौतुक केले काय किंवा टीका  केली काय ?           जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या  पैशांचा आनंद घेण्याची वेळ  निघून गेलेली असेल...