Posts

Showing posts from March, 2021

होळी

🔥 *होळी* 🔥        जीवनातील *अज्ञान* हा खरा अंधःकार आहे आणि हेच आपल्या सर्व *दुःखाचे मूळ* आहे. ज्याला *अज्ञानाची होळी* करता आली, त्याच्या जीवनात *ज्ञानाची ज्योत* कायम प्रज्वलित होते आणि राहते.         आपण आपल्या जीवनातील सर्व दुर्गुण आणि विकार यांची होळी केली आणि *अज्ञान* शिल्लक राहिले, तर ते या *सर्व दुर्गुण आणि विकारांचे बीज* असते. या बीजाची आपल्याला होळी करता आली पाहिजे, तीच जीवनातील *खरी होळी* आहे.        अज्ञान जाळल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. एकदा *ज्ञान* प्राप्त झाले की *जीवन अनंत रंगाने रंगून निघते*, त्या प्रत्येक रंगाचा आनंद निर्विवाद घेता येतो, म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये *होळी नंतर रंगपंचमी साजरी केली जाते*.        ज्याला जीवनात होळीत नेमके *काय जाळायचे ?* हे समजत नाही, अशी माणसे कोणत्या ना कोणत्या कारणाने *सतत जळत राहतात आणि त्या जळण्याचा दाह आयुष्यभर सहन करत राहतात.*      *अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया l चक्शुरूंमिलितंयेन तस्मै श्री गुरवे नमः ll*     ...

पोस्टकार्ड

आज चाळीशीपार असलेल्याना हे सगळं अनुभवता आलेलं आहे, नव्या पिढीला जिथे आईबाप स्मार्ट फोन आणि इमेल्स वापरतात त्यांना हे पुरातन वगैरे वाटेल कदाचित !! “ तुझ्या डोळ्यात का पाणी आलय ? “ “ अवो ,काई न्हाई ,चुलीच्या धुरान पाणी आलय जरा , न तुमच्या डोळ्यात का पाणी आलय ?” “आग ,वावधान उठल न फुफाटा डोळ्यात गेलाय बघ " दोघांनी एकमेकाला खोटच सांगितलेलं. तालुक्याला शिकणाऱ्या पोराच पत्र आलेल. खुशाली कळवली ,अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितल त्याचा दोघांना आनंद झालेला. पत्र आलेल डालडाच्या पत्र्याच्या डब्यात भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं. त्याला भाकरीचा,लोणच्याचा गंध लागलेला. खाजगी मेस दुर्मिळ आणि असल्या तरी आर्थिकदृष्ट्या न परवडणारी बाब, एसटी महामंडळ ही डब्यांची सेवा द्यायच त्यामधून अनेकांची शिक्षण पूर्ण झाली. काल सकाळी आईन पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडलान लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेल. " पाऊस बराय,गहू काढणीला आलाय ,गाईला कालवड झालीय तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईन ,तुझ्या मित्रांना पण दे ,बाकी खुशाल ,सुट्टीत आल्यावर बोलू ,काळजी घ्या " घरच्या जुन्या वहीच्य...

जीवनातील फोमो

*लेख : जीवनातील फोमो*  *लेखक : राजेंद्र वैशंपायन*  मागच्या आठवड्यातला प्रसंग. माझ्या भाचीकडे गेलो होतो. तिचा सहा महिन्याचा मुलगा आहे. मी गेलो होतो त्या वेळी थोडं खेळून झाल्यावर त्या मुलाला खरी खूप झोप आलेली होती पण तो झोपायला काही तयार नव्हता. शेवटी गाणं ऐकव, मांडीवर घेऊन थोपट असे सगळे उपाय करून तो झोपला एकदाचा. साधारणतः मुलं  वर्ष-सहा-महिन्याची  झाली की ही गम्मत सुरु होते.  डोळ्यावर खूप झोप आलेली असते पण मुलं झोपायला अजिबात तयार नसतात. ताणून ताणून जागं राहण्याचा प्रयत्न सुरु असतो. मी कुतूहल म्हणून एकदा याबद्दल एका  डॉक्टरना विचारलं होतं.  त्यावर त्यांनी एक खूप स्वारस्यपूर्ण माहिती दिली होती. ते म्हणाले की याला बरीच कारणं असतात पण त्यातलं एक कारण म्हणजे फोमो (FOMO - Fear of Missing Out) हेही असतं. म्हणजे मुलाच्या आजूबाजूला जे काही रंगीबेरंगी जग ते अनुभवत असतं, ते जग आपण झोपलो तर आपल्यापासून दूर जाईल याची त्याला भीती वाटते आणि त्यामुळे ते मूल झोपायला तयार नसतं.  मला या गोष्टीचं खूप नवल वाटलं.मुलाच्या न झोपण्याच्या अनेक कारणामागे फोमो (FOMO) हे कारण...

झाडांची लागवड

मला आवडलेली पोस्ट...🙏🙏 *😇स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे*: *अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्* *न्यग्रोधमेकम्  दश चिञ्चिणीकान् ।* *कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।* *अश्वत्थः = पिपंळ* *पिचुमन्दः = कडूनिंब* *न्यग्रोधः = वट वृक्ष* *चिञ्चिणी = चिंच*  *कपित्थः = कवठ*  *बिल्वः = बेल* *आमलकः = आवळा* *आम्रः = आंबा*  *(उप्ति = झाडे  लावणे)*  जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही.  *हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे*.  अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू.  *गुलमोहर निलगिरी सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत.*  तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या *वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू* .🌱🌱🌳🌳 *दुष्काळाचे खरे कारण*  *पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने होत आहे हे वाचुन आपल्याला विचित्र वाटे...

असफल प्रयत्नांचा नियम

*असफल प्रयत्नांचा नियम* आपल्या माहिती आहे का , सिंह हा जंगलाचा राजा असून देखील त्याच्या शिकारीच्या प्रयत्नापैकी फक्त 25% प्रयत्न यशस्वी होतात आणि 75% अयशस्वी.  सफलतेचे प्रमाण कमी असले तरी सिंह किंवा इतर प्राणी शिकार करायचे, पाठलाग करायचे किंवा शोध घेण्याचे थांबवत नाहीत. आपल्याला काही जणांना वाटेल की फक्त भूक हेच कारण आहे असे वाटले असेलही. पण असफल प्रयत्नांचा नियम हा जन्मतः प्राण्यामध्ये असतो की ज्यामुळे ते थांबत नाहीत. या नियमावरच निसर्ग ही चालतो. निम्याहून अधिक माश्याचे अंडे ही  खाल्ली जातात. अस्वलाच्या पिल्लाबद्दल हे ते जन्म घेण्याआधिच मृत्यू पावतात. जगात पडणारा जास्तीत जास्त पाऊस हा समुद्रातच पडतो. झाडाच्या बिया देखील निम्याहून अधिक पक्षाकडून खाल्या जातात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार झाडे, प्राणी आणि इतर नैसर्गिक जे बल आहेत त्याना या असफल प्रयत्नाचा नियम अंगीकारूण घेतलेला आहे. *फक्त माणूस असे समजतो की यशाचा अभाव म्हणजे असफलता आहे, पण खर तर हे आहे की, आपण जेव्हा आपले प्रयत्न थांबवतो तेव्हा आपल्याला अपयश येते.* यश म्हणजे असा रस्ता नाही की जिथे अडथळे किंवा खड्डे नाहीत. यश म्...

झाडांची लागवड

मला आवडलेली पोस्ट...🙏🙏 *😇स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे*: *अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्* *न्यग्रोधमेकम्  दश चिञ्चिणीकान् ।* *कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।* *अश्वत्थः = पिपंळ* *पिचुमन्दः = कडूनिंब* *न्यग्रोधः = वट वृक्ष* *चिञ्चिणी = चिंच*  *कपित्थः = कवठ*  *बिल्वः = बेल* *आमलकः = आवळा* *आम्रः = आंबा*  *(उप्ति = झाडे  लावणे)*  जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही.  *हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे*.  अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू.  *गुलमोहर निलगिरी सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत.*  तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या *वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू* .🌱🌱🌳🌳 *दुष्काळाचे खरे कारण*  *पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने होत आहे हे वाचुन आपल्याला विचित्र वाटे...

म्हातारपण येणे

*म्हातारपण येणे* *" हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "*   *"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.* *'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.*     त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठ...

साहेबाची मीटिंग

*साहेबाची मीटिंग* साहेबाच्या मागे भरपूर मिटिंग.. ...कामाच्या व्यापामुळे  काही मीटिंग साहेब विसरून जातो.....साहेबाच्या  खुर्चीच्या समोरच्या फळ्यावर पुढच्या  मीटिंग  ,कार्यक्रम वगैरे लिहिण्याची फॅशन  साहेब जॉईन  झाल्यापासून 5-6 दिवसात बंद पडते.. मीटिंग चा agenda येऊन पडतो... मरणामातीचे विषय... नेहमीप्रमाणे agenda आल्यानंतर तयारीला सुरुवात! मागची मीटिंग झाल्यापासून महिनाभर  पाट्या टाकणे , भानगडी सोडविणे, कुटाने मिटविणे,आंदोलन, उपोषण,   आमदार, मंत्री, उदघाटन प्रोटोकॉल ,कमिट्या, दुष्काळ, पूर, पाणी , पाऊस, धंदापाणी,   पार्ट्या , अध्यात्म  वगैरे यातच गेला... मग मिटिंगसाठी कर्मचारी  कसले तरी report आणून टाकतेत, काही बिचारे  तर आकडे बदलायची पण तसदी  घेत नाहीत ,काही अंदाजेच आकडे हाणून टाकतेत...काही काही विषय तर फक्त साहेबालाच   माहीत असतात... त्याचा बाकीच्या स्टाफ ला गंध पण नसतो!! शेवटी जमेल त्या पत्रावळ्या  बांधून घेऊन साहेब मीटिंग ला निघतो...मीटिंग सुरू होण्यापूर्वी साहेब डायरी उचकुन बघतो, साहजिकच ती मागच्...

विसावा

" मेल्यावरही आपल्या तिरडीला विसावा देतात , सगळं आयुष्य धावपळीत गेलं शेवटी जाताना शेवटचा निरोप द्यायला जे जिवलग स्नेही नातेवाईक आप्तेष्ट आलेले असतात त्याच्या सोबतचा शेवटचा विसावा असतो तो ,  स्मशानभूमीच्या थोडं अलीकडे तिरडीला जमिनीवर टेकवून देतात , सोबत भाकरीचा घास तुकडा असतो , का तर जिवंतपणी कुठेही प्रवासाला जाताना वाटेत भूक लागली तर खायला शिदोरी सोबत ठेवायचास आता आयुष्यातील तुझा हा शेवटचा प्रवास आहे आणि ही शेवटची तुझ्या सोबत असणारी शिदोरी त्यामुळे दोन क्षण उसंत घे आणि शिदोरी खा आणि कायमस्वरूपीचा रामराम कर तुझ्या ह्या शरीर रुपी प्रवासाला ...     आयुष्यभर जे शोक पाणी केलं जस की सिगारेट बिडी काडी दारू तंबाखू सुपारी अगदी हेही ठेवलं जातं विसाव्याच्या ठिकाणी का तर शेवटच्या विसावा तुझ्या आवडत्या गोष्टी सोबत घ्यावास म्हणून ...     थोडक्यात काय तर मित्रांनो मेल्यावरही विसावा मिळतो जाळायच्या अगोदर तर मग जिवंतपणी इतकी सगळी धावपळ मरमर सुरु आहे तेव्हा मनाचा शरीराचा थकवा दूर करण्यासाठी जरासा विसावा घ्यायला काय हरकत आहे .   जिवंतपणी हा विसावा घ्यायचं ठिकाण असते ते म्हणजे...