होळी
🔥 *होळी* 🔥 जीवनातील *अज्ञान* हा खरा अंधःकार आहे आणि हेच आपल्या सर्व *दुःखाचे मूळ* आहे. ज्याला *अज्ञानाची होळी* करता आली, त्याच्या जीवनात *ज्ञानाची ज्योत* कायम प्रज्वलित होते आणि राहते. आपण आपल्या जीवनातील सर्व दुर्गुण आणि विकार यांची होळी केली आणि *अज्ञान* शिल्लक राहिले, तर ते या *सर्व दुर्गुण आणि विकारांचे बीज* असते. या बीजाची आपल्याला होळी करता आली पाहिजे, तीच जीवनातील *खरी होळी* आहे. अज्ञान जाळल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. एकदा *ज्ञान* प्राप्त झाले की *जीवन अनंत रंगाने रंगून निघते*, त्या प्रत्येक रंगाचा आनंद निर्विवाद घेता येतो, म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये *होळी नंतर रंगपंचमी साजरी केली जाते*. ज्याला जीवनात होळीत नेमके *काय जाळायचे ?* हे समजत नाही, अशी माणसे कोणत्या ना कोणत्या कारणाने *सतत जळत राहतात आणि त्या जळण्याचा दाह आयुष्यभर सहन करत राहतात.* *अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया l चक्शुरूंमिलितंयेन तस्मै श्री गुरवे नमः ll* ...