Posts

Showing posts from May, 2020

अभियंता

अभियंता, अजातशत्रू,  सर्वांचे परममित्र,  हुशार सीओईपीयन्स, सर्वमान्य व्यक्तीमत्व, उच्चपदस्थ अधिकारी, दिलदार, विशाल हृदयी, साधे, सरळ, मनमिळावू, शांत, सुस्वभावी, सज्जन,  स्वच्छ उच्च विचारसरणी, गोड, स्वच्छ, खुली वाणी, साधी बिगरदिखावा राहणी, सर्वच थरात एकरुप होणारी, कुणालाही तुच्छ न लेखणारी, कुणाचाही अपमान न करणारी, सर्वांना सोबत घेऊन चालणारी, कनिष्ठांशीपण प्रेमाने वागणारी, सचोटी इमानदारीत काम करणारी, हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेणारी, केलेल्या कामांचा दिखावा न करणारी, पुरस्कारा करिता वशिला न लावणारी, शासन दरबारी हांजी हांजी न करणारी, नियम कायदा चौकटीत काम करणारी, कुटुंब मित्र सहकारी सर्वां सांभाळणारी, शासकीय सेवेत पण कामसू परोपकारी, अजूनही अशा कैक सद्गुणांनी भरलेली ही *शिवाजी व सुनीलची अधीक्षक अभियंत्यांची जोडी*, आज ३६ वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर निवृत्त होत आहे. सीओईपी ८४ स्थापत्य अभियंता या बॅचमधील सरकारी नोकरीत असणाऱ्या सर्व बॅच मेट्स मध्ये *सर्वोत्कृष्ट सरकारी अधिकारी व सर्वोत्कृष्ट अभियंता* म्हणून या जोडीला पहिल्या नंबरचे पारितोषिक न बोलता न सांगता कुठलाही गाजाव...

अर्थव्यवस्था

*एका अनिश्चित नाजुक काळात जग शिरले आहे. लाॅकडाऊन उठवला तर कोरोनाचा प्रसार होऊन मानवजातीच्या जीवावर बेतेल आणि चालू ठेवला तर अर्थव्यवस्था मोडेल असा अभूतपूर्व पेच आहे.* लाखो माणसांनी मुख्यत्वे श्रमजीवी मजूर वर्गाने शहरे सोडून, जीवावर उदार होऊन, आहे त्या स्थितीत गावाकडे पायी कूच केले. शहरे ही परावलंबी, बांडगुळी व्यवस्था या समस्येत पूर्ण उघडी पडली. शहरं जगवतात हा भ्रमाचा भोपळा फुटला. *शहर ही कृत्रिम व्यवस्था पूर्णपणे गावांवर म्हणजे पृथ्वीच्या अन्न देण्याच्या क्षमतेवर जगते. आज जे पाणी व वीज शहरांना मिळत आहे ते देखील गावं व पृथ्वी स्वतःची आहुती देऊन पुरवत आहेत.* युरोप, अमेरिकेत दोन अडिचशे वर्षे व  आपल्या देशात  सुमारे साठ ते दीडशे वर्षे कृत्रिम मानवी व्यवस्थेने जीवनाच्या अस्सल व्यवस्थेला वेठीस धरले होते. शेवटी आदिम काळातील, पृथ्वीच्या जीवन सुरू करणाऱ्या प्रतिनिधिने उन्मत्त झालेल्या मानवाला जेरबंद करून जीवसृष्टीच्या मुक्तीचा मार्ग दाखवला. सरकारकडे पैसे नाहीत. तरी 'येन केन प्रकारेण' पैसा उभा करून, तो खेळवुन, जगण्याचा देखावा ते पुन्हा सुरू करू इच्छिते. जनता खरेदी करू लागेल व पुन्हा अर्थ...

"अ''_ पासून 'ज्ञ' पर्यंत

🌹सुरेश भटांचे  शेर.🌹 सगळी 'अ''_ पासून 'ज्ञ' पर्यंत अक्षरे आहेत. 🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 (अ) अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली? (आ) आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली (इ) इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते (ई) 'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा माणसांनी माणसांना मारले कोठे? (उ) उरले उरात काही आवाज चांदण्याचे.. आकाश तारकांचे उचलून रात्र गेली (ए) एक मी निःशब्द किंकाळीच होतो  ऐकण्यासाठी सुना बाजार होता (ऐ) ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले (ओ) ओळखीचा निघे रोज मारेकरी ओळखीचाच धोका मला यार हो (क) कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली (ख) खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले? तुझा सुगंध कसा ये न आढळून मला? (ग) ‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’ (घ) घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते (च) चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?...

लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी

*निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी* १) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- *ती तुझ्याकडेच बघतेय* २) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- *मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा* ३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- *फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा* ४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- *घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको* ६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- *पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं* ७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- *मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही* ८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- *पोहे मुलीनेच बनवलेत* ९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- *मी Occasionally ड्रिंक्स घेतो* १०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- *माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत* ११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- *हा रंग तुमच्यावर उठून दिसतो* १२) "टेबल पार्टनर" ने सांगितलेली खोटी गोष्ट- *बिअर म्हणजे दारू नव्हे* आणि सर...

कोरा आशीर्वाद

असाच एक दिवस मनासारखा पार पडला. जरा कुठे टेकतो तोच देव उभा राहिला...  म्हणाला केंव्हा पासुन लक्ष्य आहे तुझ्यावर फार मेहनत घेतोस तू तुझ्या कामावर मी आज तुझ्यावर  प्रसन्न झालो आहे बोल कोणता  आशीर्वाद हवा आहे देवाला म्हणालो  काय ते समजुन देऊन टाक देव म्हणाला वेड्या मनात असेल ते मागुन टाक विचार करून सांगेन म्हटले, तर त्याला घाई होती दुसऱ्या दिवशी बोलावून येईल याची खात्री नव्हती विचार केला आणि म्हटले एक *blank* आशीर्वाद दे जेंव्हा इच्छा होईल  तेंव्हा कॅश करायची  सोय करून दे  तेव्हापासून खिशात एक कोरा आशीर्वाद घेऊन फिरतोय *सगळच तर छान दिलंय देवाने* *आणखी काय मागु* *याचाच विचार करतोय !*           

आनंदी राहा , आनंदात जगा

एक चांगला मेसेज फॉरवर्ड करीत आहे *तुम्हाला कोण आनंदात ठेवतं ?* एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले , *" तुमचा नवरा तुम्हांला आनंदात ठेवतो का ?"* तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला पूर्ण खात्री होती , की ती " हो " असंच म्हणेल . कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती .... !! *पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , " नाही "*   *ती म्हणाली , " माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात !! "* *तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं . तेवढ्यात ती पुढे म्हणाली , " मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही , मी स्वत:च आनंदात राहते ....!! "* *" मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे . "* *" कुठल्याही परिस्थितीत , आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते . जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर , एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल ."* *...

या जगण्यावर शतदा प्रेम करावे

.... *या जगण्यावर शतदा प्रेम करावे* तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की ज्या गोष्टीचा आपल्या मनात विचार चालु असतो, तीच गोष्ट अचानक डोळ्यासमोर येते. काल तसंच झालं. वाचन करीत असताना एका शब्दापाशी अडखळले, तो शब्द होता..जिजीविषु. आधी वाटलं, काहीतरी चूक असावी. त्याजागी त्याच्याच जवळपास जाणारा, थोडासा अनवटच पण क्वचित प्रसंगी एेकलेला विजिगीषु म्हणजे विजयाची इच्छा असलेला असा शब्द असावा. पण म्हटलं थोडं शोधुन पाहावं तर याही शब्दाचा अर्थ सापडला. जिजीविषु म्हणजे जगण्याची इच्छा असलेला आणि जिजीविषा म्हणजे जगण्याची दुर्दम्य इच्छा ! Survival instinct! सरपणाला काढलेल्या लाकडाला जेव्हा पालवी फुटली.. त्याचे त्यालाच कळेना जगायची ही जिद्द कुठली?  हीच ती जिजीविषा! Survival instinct म्हणजे नेमकं काय हे जर खरंच जाणुन घ्यायचं असेल तर 127 hours हा इंग्रजी सिनेमा पाहा. सत्यघटनेवर बेतलेला. अॅरन राल्स्टन हा गिर्यारोहक त्याच्या उटा येथील साहसी मोहिमेदरम्यान एका कपारीत अडकतो. मग सुरु होतो जगण्यासाठीचा संघर्ष. केवळ अर्धी भरलेली पाण्याची बाटली , डिजीटल कॅमेरा, एक दोर आणि एक वापरलेले ब्लेड या सामग्रीनिशी. त्या कपा...

मैत्रीची पाठशाळा

*मैत्रीची पाठशाळा:* व्यक्ती कधी स्ट्रेसमधे जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही. पण काहीवेळा अशावेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे जीवनच बदलून जाते.   मुंबई - अलिबाग मुख्य रस्त्यावरील एका छोटेखानी पिकनिक स्पाॅटचे एक गांव. त्या गावातील एका व्यक्तीची ही गोष्ट.  बावीस वर्षांचा तरूण मुलगा. सुशिक्षित व रोज दोन घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला. काही कारणाने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात भात झाला नाही. शेतातून येणार्‍या भात व वालावर वर्ष काढणार्‍या कुटुंबाला पीक न आल्याने अर्थातच वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला होता. वडील , मोठा भाऊ व हा मुलगा रोजंदारीवर काम मिळेल ते करू लागले. पण रोज काम मिळेल याची काहीच खात्री नाही. त्यामुळे उद्या जेवायचे काय? हा प्रश्न सतत ग्रासत असायचा. याच विवंचनेतून या कुटुंबातील धाकट्या मुलाला स्ट्रेस ने गाठले. सतत विचित्र विचार करत हा मुलगा अनाकलनिय गोष्टी व निरर्थक बडबड करू लागला. आईवडिलांना याला आता वेडबीड लागते की काय अशी भिती वाटू लागली. अचानक या मुलाने परवा आत्महत्या करायची असे निश्चित केले. पण  आत्महत्या ...

Withdrawal होता आलं पाहीजे

"Withdrawal होता आलं पाहीजे....."     सहज, 'मैत्रिणीशी बोलतांना निघालेल वाक्य'           परंतु नंतर जेव्हा त्यावर विचार केला कायं खोट आहे? त्यात किती गरजेच आहे? निरामय जीवनासाठी ज्यांना हे करता येतं ते किती आनंदी जीवन जगतात, ज्यांना करता येत नाही ते गुंत्यात अडकुन गुंता वाढवून जगणं दुःखद करून घेतात.        साधं उदाहरण घ्या ना 'मुलाच लग्न झाल्यावर सुन घरात येते 'तरी आपण हयातीत उभ्या केलेल्या संसारातुन थोडं सैल होत नाही. हिंदी सिनेमात दाखवतात ना ,सासूबाई आपल्या पदराला असलेली चाबी सुनेला देत ,"बेटी अब तुम्हे सँभालना है "असं हसत म्हणते मेलोड्रामाटीक असलं तरी जमलं पाहीजे withdrawal होता आल पाहीजे......       लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधिही माहेरच्यांना विसरू शकत नाही . नेहमीच तिचं मन आठवणीत रमलेलं असतं पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते .     कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही म्हणून तुलना...

आत्मनिर्भरता

forwarded                                                             *आत्मनिर्भरता म्हणजे काय रे भाऊ?* मोदींनी कोरोना आल्यापासून ४ भाषणे केली. त्यातल्या चौथ्या भाषणात ‘आत्मनिर्भरता’ हा शब्द जोर देऊन वापरला. भारतीय राजकारणात आत्मनिर्भरता हा शब्द आजवर कटाक्षाने टाळला गेला होता. सबसिडी, मदत, पॅकेज हे परवलीचे शब्द होते. या शब्दांची सद्दी असताना आत्मनिर्भरता हा शब्द कुणा राजकारण्याला सुचणे शक्यच नव्हते. समाजातल्या कोणत्याही स्तराला आत्मनिर्भर होऊ द्यायचे नाही. सरकारी मदतीवर वा परवानगीवर अवलंबित्व ठेवणे, हा राजकारण्यांचा आवडता खेळ. कॉंग्रेसच्या लायसन्स-राजकाळात आत्मनिर्भर होता येते, हेच लोक विसरले होते. मायबाप सरकारकडे आशेने बघणे, ही एकमेव गोष्ट गरीब असो वा श्रीमंत, करत असत. रेशनकार्ड असो, पासपोर्ट असो, कारखान्याचे लायसन्स असो, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट लायसन्स असो. जिथे-तिथे मध्यस्थ हा लागायचाच आणि क्षुल्लक कारकुनाच्या मर्जीवर तुमचे भवितव्य अवल...

आईचे डोळे

*सावर रे- प्रविण दवणे* *आईचे डोळे* गुणवत्तायादीत चमकलेल्या सलीलचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर शोधता शोधिता प्रश्न पडला-अशा झोपडपट्टीत राहतो सलील ? पण राहतो किती नीटनेटका त्याच्या व्यत्ति-मत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेलो. 'इथंच तो राहतो', म्हणून कुणीतरी सांगितलं. काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा सलील माझ्या आवाजानंच बाहेर आला. 'सर ?' आत गेलो. 'अभिनंदन!' गुच्छ देत म्हटलं. मला जायला तसा तीन-चार दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रूटिन सुरू झालं होतं. गुणवत्तायादीत आलेल्या मुलाचं हे असं घर ? सलीलन अभ्यास कुठे केला असेल ? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल ? त्याचं पुन:पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखे कोपरे पाहत स्वतःलाच विचारीत होतो. "सर, खूप खूप बरं वाटलं, खरं तर तुम्ही घरी आलायत, हे खरंच वाटत नाहीये. सावरलेलो नाहीये मी. तुमच्यासाठी चहा करतो," म्हण...

जातानाचे शब्द

*जातानाचे शब्द........* "मी असा काय गुन्हा केला ?" हे शब्द प्रमोद महाजन यांनी, गोपीनाथ मुंढे यांच्याजवळ, आपल्या अंतसमयी उच्चारले होते. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. "अरे, अरे हे काय करताय ?" असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते.  महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, "हे राम" तर चाफेकर बंधू किंवा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी "वंदे मातरम" म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते.  आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्रयोपवेशन केले. एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची  आपल्याला अतिशय उत्सुकता लागून राहिलेली  असते. एखादे वयोवृद्ध वडील गेल्यावर जेंव्हा नातेवाईक भेटायला येतात तेंव्हा  "काय म्हणाले हो ते जाताना ?" असे हमखास विचारले जाते.  अगदी बोलायला यायला लागल्यापास...

मराठ्यांची धार्मिक परंपरा आणि मांसाहार

मराठ्यांची धार्मिक परंपरा आणि मांसाहार ! माझे कोल्हापूरचे सहकारी मिञ Amit Adsule यांनी कोल्हापूरच्या आंबाबाईला दिल्या जाणार्‍या खार्‍या म्हणजेच मांसाहारी नैवेद्याबद्दल राजर्षी शाहू छञपतींचे सहकारी तोफखाने यांच्या संग्रहातील कागदपञांच्या  आधारे लेख प्रसिद्ध केला आहे.त्याच बरोबर दुसरे सहकारी मिञ आणि इतिहास संशोधक Indrajit Sawant यांनी ही मांसाहारी आणि शाकाहारी आहारावरुन मराठ्यांच्या दैवतांचे शाकाहारीकरण कसे पद्धतशीर केले जात आहे याबद्दल लिहीले आहे.तसेच,शाकाहारी लोकांची मांसाहारी लोकांबद्दलच्या एकून मानसिकेवर ही प्रकाश टाकलेला आहे. वास्तविक पाहता शाकाहार असो वा मांसाहार यावरुन कसल्याही प्रकारचे पाविञ्य ठरवणे हे मुर्खपणाचे आहे.मांसाहार हा सर्वच जातीसमुहांमध्ये सर्रास केला जाणारा भोजन प्रकार आहे.अगदी ब्राम्हणांमध्ये सुद्धा ! यांचे पुरावे स्वत: वि.दा.सावरकरांनी त्यांच्या ग्रंथांमधून दिलेले आहेत.तर मुळ मुद्दा असा आहे की,मराठ्यांच्या धार्मिक कार्यात मांसाहार हा अविभाज्य असा भाग आहे.मांसाहार करण्यामुळे अथवा तो करुन धार्मिक विधी केल्यामुळे मराठ्यांना कुठला ही अडथळा येत नाही हे ऐतिहासिक पुराव...

आई बाबा

*बाबा नेहमीच मागे का असतात हे माहित नाही*🤔  १. आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५  वर्षे ओझं वाहतात, दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही बाबा मागे का आहेत हे माहित नाही.   २. आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात, त्यांचे दोन्ही प्रयत्न समान आहेत, तरीही बाबा मागे का पडतात माहित नाही.  *Mom* आई आपल्याला पाहिजे ते शिजवते, बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात, त्यांचे दोन्ही प्रेम समान आहेत, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शविले गेले आहे.  बाबा मागे का आहेत हे माहित नाही.  *You* जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा आपल्याला प्रथम आईशी बोलायचे असते, दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असे ओरडतो.  जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असेल फक्त तेव्हाच त्यांची आठवण होते, परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही की आपण इतर वेळी त्यास आठवत नाही?  पिढ्यान्पिढ्या मुलांचे प्रेम मिळवताना आपण पाहतो की बाबा नेहमीच मागे पडतात.  कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरले जातील परंतु वडिलांचे कपडे फारच कमी आहेत, कुटुंबियांच्या गरजेपुढे...

महाभारत

महाभारतात असे म्हंटले आहे की सुमारे ८०% मनुष्यबळ युद्धाच्या अठराव्या दिवशी मृत्युमुखी पडले होते. जेव्हा युद्ध संपले तेव्हा संजय युद्ध झाले तिथे म्हणजेच कुरुक्षेत्राच्या मैदानात आला. त्याचा मनात शंका आलेली होती की हे युद्ध खरंच झाले आहे का? खरंच एवढा मोठा नरसंहार झालेला आहे का? ती हिच जागा आहे का जिथे सामर्थ्यवान पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उभे होते? ही तीच जागा आहे का जिथे श्रीमद् भगवत गीता सांगितली गेली? हे सगळे खरंच झाले आहे की मला तसा भ्रम होतोय?? "तुला कधीच ह्याचे सत्य माहित होणार नाही!!", एक शांत वयोवृद्ध आवाज त्याचा कानी पडला. संजयने आवाज आलेल्या दिशेला पाहिले तर त्याला एक साधू तिथे दिसला. साधू हलक्या आवाजात परत म्हणाला, "मला माहित आहे तू इथे कुरुक्षेत्राचे युद्ध खरंच झाले आहे का ते पाहायला आला आहेस. परंतु तुला ह्या युद्धाबद्दल सत्य कधीच समजणार नाही जोपर्यंत तुला खरे युद्ध कसले होते ते कळणार नाही." संजय म्हणाला, "म्हणजे??" साधू म्हणाला, "महाभारत हे एक महाकाव्य आहे - एक वास्तविकता आहे परंतु त्यापेक्षा अधिक ते एक तत्वज्ञान आहे." आणि एवढे सांगून...

रोजगार..?मराठी तरुण उद्योग

परप्रांतीय कामगारांची संख्या पाहिली का? एवढा रोजगार आहे आपल्या राज्यात... मग आपली टुकार-रिकामटेकडी टाळकी का मिळवत नाहीत हा रोजगार..? मराठी तरुण उद्योगी केंव्हा होणार..? 👉 सगळे सूतार हे उत्तरभारतीय/ राजस्थानी आहेत. आणि सगळे चांगले कारागीरच आहेत. *उत्तम फर्निचर* बनवतात. दिवसभर मेहनत करतात. सिंगल हजेरी म्हणजे सकाळी नऊ ते पाच - पाचशे रुपये. आणि ड़बल हजेरी सकाळी नऊ ते रात्री अकरा म्हणजे दिवसभराची अधिकतम मजूरी एक हजार रुपये. या सगळ्यांचा *म्होरक्या* जो आहे तो उत्तर भारतीय तरूण  तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. *मोठ्या कारागीरांच्या हाताखाली* पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात. *विनातक्रार दिवसभर* काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण भात आणि रात्री अकरा नंतर यांच्या मधील एक शिकाऊ मुलगा *सगळ्यांचे जेवण* बनवतो. ह्या उत्तर भारतीय तरूण म्होरक्याच्या हाताखाली निव्वळ गोरेगाव ते विरार या विभागात असे सत्तरेक कारागीर काम करतात... मन लावून काम करतात. कुठेही *खळखळ* दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर...

काळानुरुप हवा स्थापत्यशास्त्र शिक्षणपद्धतीत बदल

दै. सकाळ (ई पेपर) मधील सिव्हील इंजिनिअरिंग बद्दलचा अंतर्मुख करायला लावणारा लेख. *काळानुरुप हवा स्थापत्यशास्त्र शिक्षणपद्धतीत बदल*  महादेव ईश्‍वर पंडीत  (शनिवार, 17 मार्च 2018)  स्थापत्य अभियांत्रिकी हे शास्त्र मुळापासूनच शिकण्याचे शास्त्र आहे. याकरीताच ते शास्त्र साईटवरच प्रात्यक्षिकामार्फतच आत्मसात केले पाहिजेत. वैद्यकीय शाखेमध्ये निष्णांत होण्यासाठी जशी एमडी सर्जनची सोय आहे अगदी त्याच धर्तीवर अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सुद्धा एम. ई. व एम. टेक. ची सोय आहे. पण त्याची सुद्धा योग्य ती कार्यवाही प्रात्यक्षिकामार्फत केली जात नाही. यामुळे अभियंत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे थांबविण्यासाठी रामबाण उपाय आहे तो म्हणजे "प्रत्यक्ष साईटवर प्रशिक्षण व शिक्षण.'  अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. पण या व्यतिरिक्त शिक्षण ही सुद्धा मानवाची चौथी मुलभूत गरज आहे. आजचे भारतीय शिक्षण हे मुख्यत्वे 10+2+3, 10+2+4 व 10+5 ह्या पॅटर्न मध्येच पहायला मिळते. त्यातील प्रामुख्याने 10 वी व 12 वी ह्या दोन वर्गानांच सर्वत्र अति महत्त्व दिले जाते. 10 वी नंतर जवळ जवळ सर्...