मराठ्यांची धार्मिक परंपरा आणि मांसाहार
मराठ्यांची धार्मिक परंपरा आणि मांसाहार !
माझे कोल्हापूरचे सहकारी मिञ Amit Adsule यांनी कोल्हापूरच्या आंबाबाईला दिल्या जाणार्या खार्या म्हणजेच मांसाहारी नैवेद्याबद्दल राजर्षी शाहू छञपतींचे सहकारी तोफखाने यांच्या संग्रहातील कागदपञांच्या आधारे लेख प्रसिद्ध केला आहे.त्याच बरोबर दुसरे सहकारी मिञ आणि इतिहास संशोधक Indrajit Sawant यांनी ही मांसाहारी आणि शाकाहारी आहारावरुन मराठ्यांच्या दैवतांचे शाकाहारीकरण कसे पद्धतशीर केले जात आहे याबद्दल लिहीले आहे.तसेच,शाकाहारी लोकांची मांसाहारी लोकांबद्दलच्या एकून मानसिकेवर ही प्रकाश टाकलेला आहे.
वास्तविक पाहता शाकाहार असो वा मांसाहार यावरुन कसल्याही प्रकारचे पाविञ्य ठरवणे हे मुर्खपणाचे आहे.मांसाहार हा सर्वच जातीसमुहांमध्ये सर्रास केला जाणारा भोजन प्रकार आहे.अगदी ब्राम्हणांमध्ये सुद्धा ! यांचे पुरावे स्वत: वि.दा.सावरकरांनी त्यांच्या ग्रंथांमधून दिलेले आहेत.तर मुळ मुद्दा असा आहे की,मराठ्यांच्या धार्मिक कार्यात मांसाहार हा अविभाज्य असा भाग आहे.मांसाहार करण्यामुळे अथवा तो करुन धार्मिक विधी केल्यामुळे मराठ्यांना कुठला ही अडथळा येत नाही हे ऐतिहासिक पुराव्यावरुन आधीच सिद्ध झालेले आहे.थोड्यात काय तर धार्मिक कार्यात मराठ्यांना मांसाहार वर्ज नाही.आणि हे सर्व ब्राम्हणांनीही एकमुखाने मान्य केलेले आहे.
याबाबतचा आधार म्हणजे इसवी सन १८३२ साली सातारा छञपती प्रतापसिंह महाराजांनी एक धर्म सभा भरवून मराठ्यांसंदर्भातील अनेक वादांचा निकाल लावून घेतला होता.या धर्मपरिषदेमध्ये मराठ्यांच्या बाजूने वेदशास्ञसंपन्न विठ्ठल सखाराम ऊर्फ आबासाहेब पारसनीस या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु व्यक्तींची तर ब्राम्हणांकडून वेदशास्ञसंपन्न राघवचार्य गजेंद्रगडकर यांना मुखत्यारपञ दिले होते.व प्रत्येक पक्षात दहा दहा दुसरे विद्ववान पंच नेमले होते.सातारच्या वाड्यात कित्येक दिवसापर्यंत लेखी व तोंडी वाद चालू होता.ज्या दिवशी पंचाचा ठराव व्हावयाचा होता त्या दिवशी सर्व महाराष्ट्रातील हजारो ब्राम्हण मंडळी जमली होती.याप्रसंगी काही वाद उत्पन्न होऊ नये आणि झाला तर तो निवारण्यासाठी स्वत: छञपती प्रतापसिंह महाराज तलवार हाती घेऊन राजवाड्यापुढे बदोबस्त करित होते.
या धर्मसभेत एकमताने सुमारे २० ठराव मान्य करण्यात आले.यातील क्रमांक ३ च्या ठरावानुसार "मांस भक्षण करणे हा क्षञियांचा (मराठ्यांचा) धर्मच आहे.त्यामुळे त्यास वैदिक कर्म करण्यास काहीच हरकत येत नाही." असा ठराव मान्य करण्यात आला.यावरुन मराठ्यांच्या दैवतांचे होणारे शाकाहारीकरण हे चुकीचे नव्हे तर धर्मबाह्य असे कृत्य आहे.हेच सिद्ध होते.त्यामुळे Amit adsule यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईबद्दलच्या खार्या म्हणजेच मांसाहारी नैवेद्याबद्दल पुराव्यासह दिलेली माहिती आणि Indrajit Sawant यांनी मांसाहारी लोकांवर होणार्या शाकाहारी लोकांच्या सांस्कृतिक आक्रमणाबद्दल मांडीलेली मते योग्यच आहेत.
संदर्भ :- मराठा क्षञियांचा इतिहास.
लेखक :- के.बी.देशमुख.
इ.सन १९२९
आपला
अमरजित पाटील.
संस्थापक,सत्यशोधक इतिहास संशोधन मंडळ,पंढरपूर.
Comments
Post a Comment