कर्म कसे असावे

*कर्म कसे असावे ?*
 *देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात.*
 *नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते.*

*समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे.*

 *दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित  सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी  व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही.*

 *माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही.तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते.*

*जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस अंतर मनात जळतो.*

*जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाची वाट बघत नाही.*

*जे पाहिजे  ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते  हसतमुखाने स्वीकारून  जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे.*
 
*ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो  तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम  फळच... देतो.*
  
*हे चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. आचरण तर परमात्म्या  पर्यंत घेऊन जाते.*
 *🌺🙏धन्यवाद 🙏🌺*
@निलेश प्रकाश ठाकूर,(रचना विद्यालय),नाशिक.

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार