Posts

Showing posts from January, 2022

थांबणे

डॉ. अनिल अवचट यांची शेवटची व्हॉट्स अप पोस्ट - थांबणे..! कुठे..? केव्हा..? कसे थांबावे..? ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते..! कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.  स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, 'गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही..!' विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीता...

आत्मचिंतन

                        आत्मचिंतन          काल वर्धा शहराजवळ झालेल्या अपघातात सात मेडिकल students चं निधन झालं. It's a huge loss for their parents and even for the nation. 7 budding doctors lost their lives. The vehicle was speeding. अपघात का झाला त्याचे वेगवेगळे आडाखे बांधले जाताहेत. कुणी म्हणतंय driver and passengers were drunk, कुणी सांगतंय some animal crossed the path आणि त्याला वाचवताना गाडी खाईत कोसळली. गाडीचा झालेला चकणाचुर बघितल्यावर अपघाताची भीषणता लक्षात येते.               जे झालंय त्यावर चर्चा करुन आता काहीच निष्पन्न होणार नाहीय.झालेला loss भरुन निघणार नाहीय किंवा आईवडिलांना त्यांची बाळं परत मिळणार नाहीत. पण असे सगळे प्रसंग अंतर्मुख व्हायला लावतात. आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देण्यात कुठं चुकतोय का? हा विचार सतत मनात येतो.              थोडं आठवून बघा , आपण कॉलेज मधे शिकत असताना कधी late night parties, आईबाबांची permi...

कालबाह्यतेचा सापळा

--------------------------------------------------------- थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतून – कालबाह्यतेचा सापळा!.. ---------------------------------------------------------- जानेवारी १९२५! स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने काही खास लोकांसाठी एक गुप्त मिटींग आयोजित केली होती. विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीच्या सर्व उत्पादकांना त्या मिटींगमध्ये बोलावले गेले होते. बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती. सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण वर्षागणिक सुधारणा होत गेल्या. १९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्यमान असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते. जनता बल्बवर खुश होती पण कोणालातरी बल्बचे इतके दिर्घजीवी असणे खटकत होते. ते कोण होते? साक्षात बल्ब उत्पादक! कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रील, ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्ट्रिकल ...

कडवे सत्य

*कडवे सत्य*  *कितीही पैसे द्या कामवाली घरच्या सारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्या सारख्या पोळ्या करत नाही*....   *आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही*...   *हॉटेलच्या बिर्याणी ला घरच्या खिचडी ची चव नाही आणि कितीही यूट्यूब बघा थिएटरची सर नाही*...    *साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणा सारखं सौदर्य नाही*...    *कितीही कलमं करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही*...    *शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही*...   *भाजीभाकरीची चव पिझ्झा बर्गर ला नाही आणि ग्राउंड ची सर जिमला नाही*...    *स्वता सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि  जीवनांत प्रेम करणा-या जोडीदारासारखा आधार नाही*...    *कितीही tally वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरमधे नाही*...    *कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही*...    *कितीही पाणी द्या ...

भाळणं आणि सांभाळणं

सहसंवेदना.  एक सुंदर मेसेज वाचण्यात आला... *भाळणं संपलं की सांभाळणं उरतं*  किती छान..आणि शेजारी एका वयस्क जोडप्याचा फोटो. खूप आवडलं.  भाळणं आणि सांभाळणं.. खरंच किती वेगळं आहे दोन्ही... भाळण्यामधे स्वार्थ आहे... सांभाळण्यात त्याग... प्रेमविवाह करून थोड्याच दिवसात बिनसणं हे केवळ भाळणं आहे पण एखादी भावना आयुष्यभर निस्वार्थपणे जोपासणं हे सांभाळणं आहे... प्रेम ही सहसंवेदना आहे, ती जाणवते ती आपोआप जोपासली जाते. त्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत. प्रेमात स्वार्थ नाही, त्यात काही मिळवणं नाही. खरंच फक्त अनुभुती आहे ती... भाळणं हे सोबत राहून व्यवहारी असू शकतं..दूर राहूनही एकमेकाची सुखदुःखं जाणवणं हे एकमेकांना सांभाळणं आहे. खरं प्रेम सांभाळतं. भाळण्याच्या पलिकडं जाऊन.. झाडावरचं फूल आवडलं म्हणून पटकन तोडून घेऊन सुगंध घेणं अथवा केसात माळणं, हे भाळणं आहे. पण ते लवकर सुकू नये म्हणून कुंडी सावलीत सरकवून ठेवणं, हे तर सांभाळणं आहे. सांभाळण्यामधे जोपासणं आहे... भाळण्यामधे उपभोग आहे. परफ्यूम संपल्यानंतर सुध्दा अनेक वर्ष त्याची कुपी जपून ठेवणं हे सांभाळणं आहे... भाळणं ही फक्त प्रेमाची सुरुव...

साला मी अडाणी होतो

*साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ साला मी अडाणी होतो तेच बर होत... साधा सर्दी खोकला झाला की  आलं, तुळस काढा घ्यायचो, पोट दुखल की ओवा चावत जायचो ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट, ना हॉस्पिटल च्या एडमिशन मध्ये अडकत होतो... निरोगी आयुष्य जगत होतो.. *साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ राम राम ला राम राम,  सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम  आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो ना धर्म कळत होता ना जात कळत होती  माणूस म्हणून जगत होतो... *साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,  हेल्थी ब्रेकफास्ट चा मेनू  लंच चा चोचलेपणा आणि  डिनर च्या सोफेस्टिकेटेड उपासमारी पेक्षा दिवस भर भरपेट चरत होतो... *साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो रामायणात रंगून जात होतो, चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो, ना वेबसिरीज ची आतुरता,  ना सासबहु चा लफडा ,  ना बातम्यांचा फ...

कोरोना

*डॉ.सुधीर क्षीरसागर*        *9822094196*  *एम.बी.बी.एस.(पुणे), डी.ए.(औरंगाबाद)*  *रजी.नं 58329*  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                          *घाबरू नका..* *प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..* *कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..* *कोरोना ..९९% बरा होतो.* *कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या.* *संशयित कोरोनाचा उपचार* *घरीच करा..* *ताप-/अंगदुखी* *Tab Calpol 500*  *(स...दु...सं.)* *सर्दी-* *Tab Triz/Tab Levocet m*  *(स‌‌....संध्याकाळ)* *खोकला-* *Tab Azee 500*  *(रोज 1)*  *आणि* *Sy.Grilinctus BM 10 मिली.* *(स--- दु--- सं)* *जुलाब..* *Tab O2*         *(स....सं)*  *आणि* *Tab Ocid 20*  *(स....सं)*  *ORS Powder.* *दिवसभर हवे तितके* *उलटी मळमळ* *Tab.Acilok RD*        *+स...संध्या)*..          किंवा *Tab Emcet 4mg*...

कडवे सत्य

कडवे सत्य --------------- नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा , व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी ,  घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं , एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहण्यात मजा आहे . वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही , गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा आहे , शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे , देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं , परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो, केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान , कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता. प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते व काही माणसे  प्रेम मिळावे म्हणुन जंग जंग पछाडतो.पण प्रेम मिळत नाही म्हणुन प्रेमांच्या जगात जगा एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर , दोन असणाऱ्याला वाटतं , एक वाला मजेत, मुलगी असली की , वाटतं  मुलगा हवा होता , मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते . ज्याला मूल नसतं , तो म्हणतो काहीही चालेल, नावे ठेवणारे रामातही दोष बघतात, कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात . मिळून काय ? नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाह...