Posts

Showing posts from December, 2020

माणसांवरचा विश्वास

ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो, ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते.  माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने....फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी. अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा! पण तरीही,  फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये.  माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे.माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात, आणि त्यात वावगंही काही नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही.         प्रत्येक मानवी...

उपदेश करू नकोस

*१०१ नंबरचा कौरव* मी माझ्या स्वत:च्या केलेल्या आत्म परीक्षणावरून असे नक्की सांगू शकतो कि, मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता. श्रीकृष्ण मला कधी प्रत्यक्षात गाठ पडला मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन कि ... ” देवाधिदेवा... भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी , दुर्योधनाला आणि दु:शासनाला सांगितली  असती तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ? इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ? भगवतगीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी  बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?” सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्व ब्रह्मांड सामावलेल्या कृष्णाच्या मुखाइतकेच विशालकाय माहितीच्या ब्रम्हांडात , म्हणजेच इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, reditt , युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस इतके ट्रॅफिक ओसंड्ल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्या...

आपली कालकुपी केली का?

आपली कालकुपी केली का? परवा मला एक फोन आला. त्या व्यक्तीने सांगितले, ‘सर आपले विमा एजंट श्री रवींद्र  यांचे ३ दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराने निधन झाले आहे. मी तुम्हाला फोन केला कारण त्यांच्या डायरीत तुमचे नाव आहे आणि आपला मेडिक्लेम हप्ता येत्या १२ तारखेस ड्यू आहे. आपण चेक तयार ठेवा मी आज येऊन चेक कलेक्ट करतो. म्हणजे तारीख उलटणार नाही. मी त्यांचा मेव्हणा बोलतोय.’ मला मेव्हण्याचे कौतुक वाटले व्यक्ती जाऊन ३ दिवस झाले होते. अशा परिस्थतीत रवींद्रची डायरी उघडून मला फोन करून तारीख उलटणार नाही याची काळजी घेतली. मला त्यांनी सांगितले, ‘माझी बहिण आता एजंट म्हणून काम करणार आहे तुम्ही काळजी करू नका. मी तिला मदत करणार आहे. तुमच्या सारखे अनेकांच्या विमा तारखा या महिन्यात ड्यू आहेत. त्यांना contact करतोय.’ मी दु:ख व्यक्त केले. थोड्या माझ्या आठवणी त्यांच्याशी शेअर केल्या. माझे विमा व्यवहार तुमच्याबरोबरच रहातील असे आश्वासन दिले. वयाच्या ४३व्या वर्षी अचानक रवींद्रने एक्झिट घेतली. दु:खातून सावरून व्यवहारिक जगात येणाऱ्या त्या बहिण भावाचे मला कौतुक वाटले. कै. रवींद्र आपली कालकुपी डायरी स्वरुपात लिहित हो...

रिक्त मरण (Die Empty

*रिक्त मरण (Die Empty)* एका बिझनेस मिटींग मध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की "जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?" प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : "तेलाने समृद्ध गल्फ राज्ये."  तर दूसर्‍याने उत्तर दिले : "आफ्रिकेतील डायमंड खाणी." *त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी.*  कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत.  *याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी "Die Empty" हे पुस्तक लिहले.* सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे " तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा. *रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा ...

वेडी माणस

*भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणस..!!!*  रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का....??? पण *श्री सुरेश वाडकरांनी* तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत.  सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात.  *ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.*  ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात.  *एक  जेधे नावाच्या तरुण आहे.*  हा तरुण *२७ जानेवारी* आणि *१६ ऑगस्टला* एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. *हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून...!!!* कचऱ्...

एक फूsssss

हरवलेले ते जादुई शब्द ....                  तुम्हाला आठवतंय... जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तु़ंमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवून म्हणायचे "काही झाल नाही....  तो बघ उंदीर पळाला!" आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत , लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो... किंवा ज्या वस्तुमुळे लागलं त्या वस्तुला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तुकडे डोळे वटारून म्हणायचे "हात रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . ."  आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं की आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला रागवायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो..... हो नां..... कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो कि ते त्यावर 'फूsss' असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे "काही नाही... आता फू  केलंय ना...         मग बरं होईल हं ते...." पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-ब...