!! उभा देश विकला माझा !! मी बघत राहिलो !!
!! उभा देश विकला माझा !! मी बघत राहिलो !! मी जन्म दिलेला मुलगा बदमाश निघू शकतो पण मी निवडलेली सरकार बदमाश निघूच शकत नाही ही आजची भारतातील मतदारांची मानसिक स्थिती आहे. विविध साम्राज्यांच्या आक्रमणातून, करोडो बलिदानातून, हजारो आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून, धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजाने, लोकशाहीच्या मिरवणुकीने, संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला देश, विकला माझा ! पण मी बघत राहिलो. आता कुठं ! विकासाची स्वप्ने हा देश आतुरतेने पाहू लागला होता, करोडो रोजगाराच्या गोतावळ्यात गुंतून राहणारा, पाठीवर दणके मारून शाळेत पाठविणारा, शिक्षणाने मुलं घडविणारा, नोकरी लागल्यावर आई-वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहणारा, अर्थव्यवस्थेला सातासमुद्रापार नेण्याचे स्वप्न पाहणारा, रुपयाला डाॅलरच्या शैर्यतेत जिंकविणार म्हणणारा, पाच वर्षांत बॅकेत पैसे डबल करणारा, देश माझा ! सहज विकून टाकला, आणि मी बघत राहिलो. आमची बैल रडतात, त्यांना विकल्यावर ! मालकही रडतो, पैसे हातात घेतल्यावर ! पण राजकारणी मिरवतात, देश विकल्यावर ! शेतकरी शेतीत हरला तर आत्महत्या करतो ! पण राजकारणी निवडणूक हरला तर आत्महत्या करत नाही ...