Posts

!! उभा देश विकला माझा !! मी बघत राहिलो !!

!! उभा देश विकला माझा !! मी बघत राहिलो !! मी जन्म दिलेला मुलगा बदमाश निघू शकतो पण मी निवडलेली सरकार बदमाश निघूच शकत नाही ही आजची भारतातील मतदारांची मानसिक स्थिती आहे. विविध साम्राज्यांच्या आक्रमणातून, करोडो बलिदानातून, हजारो आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून, धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजाने, लोकशाहीच्या मिरवणुकीने, संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला देश, विकला माझा ! पण मी बघत राहिलो. आता कुठं ! विकासाची स्वप्ने हा देश आतुरतेने पाहू लागला होता, करोडो रोजगाराच्या गोतावळ्यात गुंतून राहणारा, पाठीवर दणके मारून शाळेत पाठविणारा, शिक्षणाने मुलं घडविणारा, नोकरी लागल्यावर आई-वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहणारा, अर्थव्यवस्थेला सातासमुद्रापार नेण्याचे स्वप्न पाहणारा, रुपयाला डाॅलरच्या शैर्यतेत जिंकविणार म्हणणारा, पाच वर्षांत बॅकेत पैसे डबल करणारा, देश माझा ! सहज विकून टाकला, आणि मी बघत राहिलो. आमची बैल रडतात, त्यांना विकल्यावर ! मालकही रडतो, पैसे हातात घेतल्यावर ! पण राजकारणी मिरवतात, देश विकल्यावर ! शेतकरी शेतीत हरला तर आत्महत्या करतो ! पण राजकारणी निवडणूक हरला तर आत्महत्या करत नाही ...

*आखिर सुख किसको है*

*आखिर सुख किसको है* *एक भिखारी किसी किसान के घर भीख माँगने गया। किसान की स्त्री घर में थी, उसने चने की रोटी बना रखी थी। किसान जब घर आया, उसने अपने बच्चों का मुख चूमा, स्त्री ने उनके हाथ पैर धुलाये, उसके बाद वह रोटी खाने बैठ गया। स्त्री ने एक मुट्ठी चना भिखारी को डाल दिया,भिखारी चना लेकर चल दिया।*     *रास्ते में भिखारी सोचने लगा:- “हमारा भी कोई जीवन है? दिन भर कुत्ते की तरह माँगते फिरते हैं। फिर स्वयं बनाना पड़ता है। इस किसान को देखो कैसा सुन्दर घर है। घर में स्त्री हैं, बच्चे हैं, अपने आप अन्न पैदा करता है। बच्चों के साथ प्रेम से भोजन करता है। वास्तव में सुखी तो यह किसान है।*         *इधर वह किसान रोटी खाते-खाते अपनी स्त्री से कहने लगा:- “नीला बैल बहुत बुड्ढा हो गया है, अब वह किसी तरह काम नहीं देता, यदि कही से कुछ रुपयों का इन्तजाम हो जाये, तो इस साल का काम चले। साधोराम महाजन के पास जाऊँगा, वह ब्याज पर दे देगा। ”भोजन करके वह साधोराम महाजन के पास गया। बहुत देर चिरौरी बिनती करने पर 1रु.सैकड़ा सूद पर साधों ने रुपये देना स्वीकार किया। एक लोहे की तिजोरी में से ...

HAPPY THOUGHTS

HAPPY THOUGHTS *झुका तितकंच जितकं बरोबर आहे. कारण, विनाकारण झुकण्याने सुध्दा आपली किंमत कमी होत जाते. आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो❗* *प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही, कधी कधी एकटे पण लढावे लागते, पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम* *करतील❗* *कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका. कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही. आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही❗* *भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो❗* *मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात❗* *श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपसता ती पण "श्रीमंती" असते❗* *परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आ...

जनकल्याण समिती

*मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा* 🌎🚩 *दान / देणगी देण्याची सुवर्ण संधी* 🌺🌸💐 🚶‍♂🚶‍♀🚶🏼🚶‍♀🚶🏼🚶‍♀ *चला त्वरा करा संपर्क करा.... सुरू झाला........ सुरू झाला ...... *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा निधी संकलन पंधरवडा* दि.15 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 सुरू झाला..... रा. स्व. संघ जनकल्याण समिती , नासिक जिल्हा संचलित *सेवा कार्य* • *चला तर या कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलू या...* 👀 •  *आरोग्य आयाम* आपल्या नाशिक जिल्ह्यात खालील प्रकल्प चालतात. (१) *साप्ताहिक आरोग्य केंद्र* :- जिल्ह्यात 6 ठिकाणी चालविले जाते. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १)पिठुंडी, २) एकदरा, ३) राहुडा ४) उंबरपाडा  ५) डहाळेवाडी ६) देवडोंगरी या ६ ठिकाणी दुर्गम भागात चालविले जातात. यात नासिकहुन डॉक्टर, कार्यकर्ते औषधासह तेथे जातात. सकाळी १० ते ५ रुग्णाची तपासणी करतात.व रुग्णांना तपासुन मोफत औषधे दिली जातात. ( अंदाजे खर्च रु.27.5 लाख) संपर्क :- नरहर जोशी 9850395279 ,सतीश माशाळकर  83085552503,  वामनराव रहाणे 7588707161, जयंत केळकर 9130053451,  प्रदीप रत्नपारखी 87934807...

पानिपतात पेशव्यांचा पराभव का झाला ?

*पानिपतात पेशव्यांचा पराभव का झाला ?* ---------------------------  -डॉ.श्रीमंत कोकाटे ---------------------------                            14 जानेवारी 1761 रोजी पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला. अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले, हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे. महाराष्ट्राची एक पिढी गारद झाली. पण हा दारुण पराभव का झाला, याची कारणे काय आहेत? त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन वर्तमानकाळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो.                        पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिवभाऊ आणि विश्वास पेशवे करत होते, त्यांच्या सैन्यात मराठा (कुणबी, माळी, धनगर, कायस्थ, रामोशी मातंग, महार, आग्री इत्यादी होते. मराठा हा शब्द जातीवाचक नसून समू...

सिंदखेडराजा

*मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील एक अविस्मरणीय अनुभव!!!* मराठा उद्योजक आणि मार्गदर्शन संस्थेच्या (मराठा उद्योजक कक्षाच्या) वार्षिक मिटींगसाठी आणि आई जिजाऊंच्या दर्शनाच्या ओढीने,आमच्या नाशिक टिमचा प्रवास मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या दिशेने सुरू झाला.उगवत्या सूर्याच्या दिशेने होणारा तो समृद्धी महामार्गावरील प्रवास आम्हा सर्वांना एक अस्मरणीय अनुभव होता.इश्वेद बायोटेक कंपनीमध्ये आमचे सुंदर स्वागत करण्यात आले. आम्हाला फ्रेश होण्यासाठी सुसज्ज गेस्ट हाऊस ओपन करून देण्यात आले.आम्ही कंपनीच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारत असतांना इश्वेद  बायोटेक चे फाऊंडर आणि ज्यांच्या व्हिजनमुळे "इश्वेद  बायोटेकचा" कारभार 57 देशांपर्यंत पसरला असे शिवश्री संजय वायाळ सर यांच्याशी भेट झाली.अतिशय ग्राउंड टू अर्थ माणूस,कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अगदी जमिनीशी जुळलेला माणूस आणि मॅनेजमेंटची (MBA) अक्षरशः चालती बोलते विद्यापीठ त्यांच्याशी बोलतांना त्यांचे  मायभूमी बद्दलचे प्रेम, त्यांच्या व्यावसायावरचे प्रेम आणि एकंदरच उद्योजकतेवर त्याचे प्रेम आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास ऐकुन खुप मोटिव्हेशन मिळाले.  थोड्याच...

चांदवड....

चांदवड.... राष्ट्रकुटकालीन खान्देशचा राजा श्री शेऊणचंद्र याची उपराजधानी असलेले ‘तामलिंदापुरम्’, माहुरनिवासनी देवी रेणुकेचा भक्त यादववंशीय राजा चंद्रहास ह्याची राजधानी ‘चंद्रदिव्यपुरी’ आणि मराठयांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणार्र्या मल्हारराव होळकरांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकरांचा पदस्पर्श लाभलेले ‘चांदवड’ हे खरोखर ‘इतिहासाचे साक्षी’ आहे. चांदवड हे शहर अनेक शतकांचा वारसा लाभलेल्या देशभरातल्या निवडक शहरांपैकी एक आहे. म्हणुन येथे ९ व्या शतकातील राष्ट्रकुटांच्या काळातील इंद्रायणी किल्ला(इंद्राई), चंद्रहास राजवटीची साक्ष देणारा चांदवडचा किल्ला (चंद्राई), होळकरकालीन टाकसाळ, १८ व्या शतकाच्या वास्तुकलेचा नमुना असणारा रंगमहाल, आदि वारसास्थळे इतिहासाची आठवण करून देतांनाच अंगावर शहारे येतात. चांदवडचा महिमा वाढवणाऱ्या कार्यात ऋषी अगस्थी, महर्षी मार्कंडेय, उज्जैनाधिपती राजा विक्रमादित्य, या व अशा कित्येक महामनांच्या उपस्थितीचा ठसा उमटलेला आहे. ह्या जोडीलाच शहरात असणारी प्राचीन शिल्पकलेची साक्ष पटवून देणारी बांधकामे, प्राचीन शिलालेख, मंदिरे, ऐतिहासिक लढायांच्या खुणा मिरविणारे भग्न वाडे, पुरा...