अंधाराकडुन प्रकाशाकडे वाटचाल
अंधाराकडुन अंधाराकडे वाटचाल - पहीला व्यक्ती.. ह्या व्यक्तीच्या आयुष्यात वर्तमानात खुप दुःख ,पारीवारीक दुःख , आरोग्य्याचे दुःख ,सामाजिक दुःख , धनसंपत्ती चा विचार केला तर तेथेही दुःख सगळीकडे दुःख दुःख दुःख कुठेच आनंद नाही आणि अशा परीस्थितीत तो सतत अशांत सतत दुःखी स्वताला मिळणार्या दुःखांचे दोष सतत ईतरांना देणार , क्रोधित होणार ,अमुक व्यक्ती माझ्या दुखाचे कारण , हेयाच्यामुळे असे झाले त्याच्यामुळे असे झाले अमुक व्यक्तींवर द्वेष ईत्यादी ईत्यादी.म्हणजेच स्वताच्या वर्तमानात ईतका अंधार ,दुःख अस्तानासुद्धा तो दुःखांचे ,क्रोधाचे ,द्वेषाचेच रोप लावत आहे त्यामुळे येणार्या काळामध्ये हा क्रोध ,द्वेष नक्कीच दुखाचेच फळ घेऊन येणार म्हणजेच त्याचे वर्तमान पण दुखात व भविष्यकाळ पण दुखात. वर्तमान अंधारात भविष्य पण अंधारात .म्हणजेच ह्या व्यक्तीची वाटचाल अंधाराकडुन अंधाराकडे ..
प्रकाशाकडुन अंधाराकडे वाटचाल - दुसरा व्यक्ती..ह्या व्यक्तीजवळ पुर्वकर्मांमुळे सर्व काही आहे .आरोग्य ,धनसंपत्ती,सर्व सुखसुविधा ,सामाजिक प्रतिष्ठा ,सामर्थ्य ,मान सन्मान ,पारीवारीक सुख सगळे काही .कशाचीच कमी नाही..परंतु अहंकारी,स्वकेन्द्रित व्यक्ती ,सतत ईतरांचा द्वेष. मी खुप हुशार म्हणुन मी आनंदी बाकी सगळे मुर्ख.मागील चांगल्या कर्मांमुळे सध्या त्याच्याकडे सर्व काही परंतु प्रत्येक क्षणी तो दुःखांचे ,क्रोधाचे,द्वेषाचे रोपटे लावत आहे म्हणजेच हा व्यक्ती दुखाकडे धावत आहे .प्रकाशाकडुन अंधाराकडे धावत आहे.
अंधाराकडुन प्रकाशाकडे वाटचाल - तीसरा व्यक्ती..हा व्यक्ती अगदी पहील्या व्यक्तीसारखा चोहबाजुला दुखच दुःख पण शहाणपन असलेला ,नेहमी हसतमुख .हे दुःख माझ्या पुर्वकर्मांमुळे आहे चला त्यांचा आता अंत करु ,माझ्या ह्या दुखद परीस्थितीला कोणी हा किंवा तो व्यक्ती जबाबदार नसुन ही परिस्थिती माझ्याच चुकांमुळे व माझ्याच कर्मांमुळे आली आहे .ह्यात कोणाचा दोष नाही म्हणजेच तो सर्वांप्रती प्रेम ,दयाभाव ,करुणाभाव व्यक्त करतोय .तो प्रेमाचे ,दयाभावाचे रोपटे लावत आहे.सध्या जरी बराच अंधार असाला तरी भविष्यात मात्र प्रकाशच प्रकाश . लगेच कींवा काही काळाने हा अंधार दुर होऊन प्रकाश येणारच .प्रकाशाचे रोपटे प्रकाशच घेऊन येणार आनंदच घेऊन येणार म्हणजेच हा व्यक्ती अंधाराकडुन प्रकाशाकडे धावत आहे.
प्रकाशाकडुन प्रकाशाकडे वाटचाल - चौथा व्यक्ती..आयुष्यातील सर्व सुखसुविधा येथे आहेत ऊत्तम आरोग्य ,धनसंपत्ती,सर्व सुखसुविधा ,सामाजिक प्रतिष्ठा ,सामर्थ्य ,मान सन्मान पारीवारीक सुख सगळे काही .कशाचीच कमी नाही..तरी अंगात शहाणपन आहे की हे सर्व माझ्या भुतकाळातील कर्मांची फळे आहेत आणि जर माझी कर्म अशीच चांगली राहिली तर हे पण शाश्वत राहील म्हणुन मी ह्या धनाचा,प्रतिष्ठेचा ,सामर्थ्याचा उपयोग हा माझ्यासाठी तसेच माझ्यावर अवलंबुन असलेल्यांसाठी तसेच समाजातील ईतरांच्या भल्यासाठी ईतरांच्या कल्याणासाठी करेल.म्हणजेच प्रत्येक क्षणी तो प्रेम ,दयाभाव उत्पन्न करत आहे दुसर्यांचे भलं करत आहे म्हणजेच प्रकाशाचं रोपटं लावत आहे .प्रकाशाकडुन तो प्रकाशाकडे धावत आहे .आनंदाकडुन तो आनंदाकडे धावत आहे.
आपण पहील्या किंवा दुसर्या व्यक्तीच्या गोटात नसायला हवे .आपण तिसर्या किंवा चौथ्या गोटात असायला हवे पण आपल्या भुतकाळातील कर्मांमुळे ते आपल्या हातात नाही. पण आपण आपल्या वर्तमानकाळाचे स्वामी आहोत .आपण आपल्या स्वताचे स्वामी आहोत दुसरा कोणीच नाही .आपण स्वःताच आपल्या भविष्यकाळाचे गुरु आहोत दुसरा कोणीच नाही .जे काही भुतकाळात झाले ते होऊन गेले.त्यामुळे आपण आपल्या वर्तमानात अशी कुठलीच गोष्ट करणार नाही की जी भविष्यात आपल्याला दुःख घेऊन येईल .जर आपण खरच आपल्या वर्तमानाचे गुरु झालो तर भविष्य म्हणजेच वर्तमानाचे बाळ (मुल) आहे .त्यामुळे जर वर्तमान हा जर वरीलप्रमाने असेल तर भविष्य फक्त आणि फक्त आनंदच घेऊन येईल...
Comments
Post a Comment