विचारातून प्रकटते वैचारिकता

*✍️ _विचारातून प्रकटते वैचारिकता_ ‼️*
*_________________________*

*जर तुमचे मन शांत नसेल तर तुम्ही अपमान पचवू शकत नाही.*
*अपमान करणारा किती वैचारिक आहे❓*
*त्याची मानसिकता का बिघडली आहे❓*
*त्याचे सवंगडी आणि संस्कार कुठल्या दर्जाचे आहेत❓*
*याची पडताळणी केली की, अपमानकर्ता कुठल्या पातळीचा आहे हे कळायला विलंब लागत नसतो❗*

*कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास न करता केलेले वर्तन अथवा मांडलेल्या मताची किंमत शून्य असते.*
*अश्या शून्यात हरवलेल्या व्यक्तीला महत्व देऊन आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू*
*नका❗*

*मते मांडण्याचा अधिकार घटनेने दिला असला तरी व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य मांडताना सत्याची कास सोडता कामा*
*नये❗*

*आपल्या पोटाची भूक आणि आपली समस्या कुणीतरी मिटवावी अशी भाबडी आशा धरायचा अधिकार त्यांनाच असतो जो इतरांच्या समस्येवर फुंकर घालायला पुढाकार*
*घेतो❗*

*जोपर्येंत आपण सोन्याचा नांगर धरून माणसे नांगरत नाही तोपर्येंत आपल्याला सुवर्णकाळ भोगता येत नसतो❗*

*कुठल्याही दुर्लक्षित व्यक्तीला महत्व आणि मान समाज तेंव्हा देतो जेंव्हा त्याचे कर्तृत्व उजळून निघते❗*

*व्यक्तीला महत्व नसून त्याच्या पदाला अथवा कर्तुत्वाला लोकं सलाम करतात हे नव्याने सांगायला नको❗*

*पद, पैसा, प्रतिष्ठा यापुढे भलेभले झुकतात, मात्र हे जेंव्हा नामशेष होते तेंव्हा दरातील कुत्रेसुद्धा साथ सोडते हा अनुभव आहे❗*

*एखाद्या सिंहासनावर गाढव जरी बसले तरी देखील त्या गाढवाला सलाम ठोकायला फौजा तयार असतात. कारण त्या गाढवाची किंमत केली जात नसून त्या सिंहासनाची किंमत केली*
*जाते❗*

*मानसिकता बदलायला धर्माची अफू गोळी चारली की माणूस गुलाम बनतो हे  सिद्ध झाले आहे.*
*गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करीत नाही, हे वाक्य आठवले तर अर्धी लढाई मनुष्य जिंकल्यात जमा आहे❗*

*कुठलाही राजकारणी लोकांच्या भल्यासाठी नसतोच मुळी, तो तसा असता तर त्याच्या विरोधात प्रचार करायला मुद्दाच उपस्थित राहिला नसता❗*

*तुमचे प्रश्न..*
*तुमच्या समस्या..*
*तुमचे दुःख..*
*केवळ आणि केवळ तुम्हालाच मिटवावे लागतील याची जाणीव जेंव्हा होईल. तेंव्हा देशाचे राजकारण तुमच्या भल्यासाठीच केले जाईल, आणि हेच नेमकं होऊ न देणे यावर सर्वपक्षीय गुप्त मिटिंगा होतात आणि आम्ही मात्र आमक्याचे तमक्याचे चेले म्हणून जीवन संपवत जातोय❗*

*तुमच्या स्वभावाचे भांडवल जर वैमनस्य आणून तुमच्या जीवनात काटे पेरीत असेल तर तुम्ही दुसऱ्याकडे फुलांची मागणी करू शकत नाही❗*

*अहंकार असावा बुद्धीवर..*
*गर्व बाळगावा मैत्रीवर..*
*दया करावी शत्रूवर..*
*आणि*
*वार करावा दुर्गुणावर. अशी विचारसरणी जतन केली की भल्याभल्या समस्येवर आपोआप दैवसुद्धा नतमस्तक होऊन समाधान बहाल करत असते❗*

*सहनशीलता हा माणसाचा सर्वात मोठा दागिना असून त्याला जगातला कुठलाही चोर चोरू शकत नाही❗*

*जर तुमच्याकडे अन्यन्य साधारण बुद्धिविकास असेल तर अणुबाँब चे बटन दाबणारा व्यक्तिदेखील दहा वेळा विचार करेल,याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुठल्याही सायंटिस्टचा घात आजवर केला गेला नाही.*
*हाड नसलेल्या जीभ या हत्यारासमोर ब्रह्मस्त्र ही फेल आहे‼️*

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार