परिघ

मला आई कधी कधी विचारते, “अरे तो अमुक तमुक आजही तुझ्या संपर्कात आहे का?” किंवा “आता ती अमकी तमकी तुला पहिल्यासारखी आजही फोन करते का?” या दोन्ही प्रश्नांची उत्तरे टेक्निकली #नकारार्थीच असतात. त्याचं आईला थोडं वाईट वाटतं. भांडणतंटे किंवा वादविवाद न होता माणसं तुटतात कशी? संबंध दुरावतात का? या प्रश्नांची कोडी माऊलीला आजतागायत उलगडलेली नाहीत. कारण खरंतर सोपं आहे, फक्त ते उमजायला हवं.

युनिवर्सची एक स्वतंत्र सिस्टीम आहे. प्रत्येक माणसाच्या परिघात (Orbit 💫) अमुक एक व्यक्ती काही काळापुरत्या असतात. मग कार्य संपलं, भाग संपला की ती माणसं आपसूकच बाजूला सरतात आणि नवी मंडळी प्रवेशतात. परिघ कितीही विस्तारत गेला तरी माणसं येण्याजाण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु रहाते. ती Unending प्रक्रिया आहे. आणि ते व्हायला हवंच. ज्यांचा कार्यभाग संपला अशांची भावनिक ओझी परिघाने कशासाठी बाळगावीत? नव्या माणसांसोबत तुमची एनर्जी एक्स्चेंज कधी होणार? तीच तीच माणसं परिघात फिरत राहीली की predictable होतात आणि कंटाळवाणीही.... रक्ताच्या नात्यातील काही ठराविक मंडळी आणि कुटुंबिय यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ठिय्या मांडून बसण्याची फारशी गरज नाही. इतरांनी तुमच्या परिघात आणि तुम्ही इतरांच्या....

जुनी आणि काम संपलेली माणसं ही तुमच्या परिघाबाहेर जातात आणि जायला हवीतच त्याशिवाय नव्या ताज्या आणि  उपयुक्त माणसांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, भौगोलिक अंतर किंवा कार्यभाग पूर्ण झाल्यावर माणसं निघून गेली तर वाईट वाटून घेऊ नये.... तेच एक्झिट डोअर कदाचित कुणासाठी तरी एन्ट्री डोअर असू शकतं.....

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार