प्रेम-निःस्वार्थ
👌🌹👌 *प्रेम-निःस्वार्थ*
"तू सकाळी आंघोळ झाली, की
आधी काय करतोस...?"
.
अचानक तिने
मला प्रश्न केला...
.
मी उत्तर दिलं, "सगळ्यांत आधी
देवाजवळ दिवा लावतो"....
.
त्यावर तिने विचारलं, "कां...?
.
"आपल्या घरांत तर वीज आहे,
शिवाय दिवसही आहे, तरी
देवाला वेगळा दिवा लावायची
गरज कां भासते...?"..
.
माझ्याकडे ह्या प्रश्नाचं
तसं बघायला गेलं, तर
उत्तरच नव्हतं...
.
तरी मी म्हणालो, की देवापुढे
उभं राहीलं, निरांंजन लावलं,
की मला मनःशांती मिळते"...
.
त्यावर पुढे जे कांही ती
बोलली, ते तुम्हा सर्वांबरोबर
आवर्जून शेअर करावस
वाटतं...
.
ती म्हणाली...
"कदाचित आत्ता मी जे सांगत
आहे, ते तुला काहीसं विसंगत
वाटेल, पण समजून घे"...
.
तुला सांगू कां, प्रत्येक
माणसाची जातकुळी
वेगळी असते...
.
आपण एखाद्याला बघितल्यावर
किंवा त्याच्या वागण्यावरून
कांही विशेष ठोकताळे बांधतो...
.
*कांही माणसं कांही क्षणातच*
*मनांला भावतात, तर कांही*
*कितीही सहवासांत राहिली,*
*तरी ओढ नावाची गोष्ट*
*निर्माणच होत नाही...*
.
मन एक अजीब
रसायन आहे...
.
*फक्त सौंदर्य हे प्रेमांत*
*पडायला कधीच पुरेसं*
*नसतं...*
.
*खूप सुंदर असलेली व्यक्ती*
*जर हट्टी, आत्मकेंद्रीत*
*आणि अहंकारयुक्त असेल,*
*तर ती व्यक्तीदेखील*
*कालांतराने कंटाळवाणी,*
*निरस वाटू लागते, कितीही*
*सुन्दर दिसत असली तरीही...*
.
*कारण शेवटी आपण*
*व्यक्तीच्या स्वभावाबरोबर*
*रहातो...*
.
शरीर तर निमित्तमात्र
आहे...
.
*त्याच व्यक्तीच्या स्वभावांत*
*गोडवा, विनयशीलता आणि*
*शालीनता असेल, तर त्याची*
*कांही क्षण जरी सोबत*
*मिळाली, तरी ती हवीहवीशी*
*वाटते...*
.
तू म्हणतोस देवापुढे निरांजन
लावलं की मन शांत होतं...
.
घरांत दिवे असूनही निरांजनातून
मिळणारा सात्विक प्रकाश हा
आपल्याला अधिक प्रसन्न
करणारा ठरतो...
.
सहवासातील माणसांचं देखील
तसंच असतं...
.
*एखाद्याच्या सौंदर्याने,*
*प्रकाशाने दिपून जाणं,*
*हा काही क्षणांचा खेळ*
*असतो; पण खरं आत्मिक*
*समाधान हे समईच्या*
*इवल्याशा तेजानंच*
*मिळतं...*
.
आयुष्यांतही अनेक लोक
येतात आणि जातात......
.
*कांही जण तुम्हाला दिपवून*
*टाकतात, तर कांही तुमच्या*
*आयुष्यांतील अंधाराची*
*जाणीव करून देतात...*
.
परंतु, ह्या सगळ्यांत खरं प्रेम
समईच्या ज्योतीसारखं रहातं...
.
शांतपणे तेवणारं आणि
मनाला शांती देणारं...
.
*जगांत कुठलीच गोष्ट शाश्वत,*
*निरंतर नसते. पण सात्विक*
*प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं,*
*जगण्याची उमेद देत...*
.
*नातं टिकतं ते फक्त आणि*
*फक्त प्रेम आणि विश्वासाचा*
*आधार घेऊनच आणि*
*ज्या क्षणी तुम्ही त्याला*
*व्यवहाराचे नियम लावायला*
*सुरुवात करता, तेव्हा त्याचा*
*पराभव निश्चित होतो...*
.
अंधारल्या खोलीत लावलेलं
निरांजन जसं दाही दिशा
उजळतं, खरे प्रेमदेखील
तुमची अशीच सोबत करतं...
.
.
प्रेम म्हणजे भक्तिचंच एक
रूप आहे. ज्याच्यात आर्तता
आहे, पण याचना नाही...
*साधा विचार करून बघ,*
*भोवताली दिव्यांची आरास*
*असतानाही आपण समईच्या*
*तेजापुढं नतमस्तक होतो, ते*
*कां...?*
.
कारण, त्या तेजाला
सात्विकतेचा, आपुलकीचा
स्पर्श असतो...!!
.
खरं सांगू...?
.
असं, निरागस, पवित्र आणि
भावनाशील प्रेम लाभणं, ही
आयुष्यांतील सगळ्यांत मोठी
मिळकत असते, असं मला
वाटतं...!!
.
.
त्यावर मी प्रसन्न हसलो...!!
.
कारण, प्रेमाची एक वेगळी
व्याख्या, वेगळ्या शब्दांत,
आज मी अनुभवत होतो...!!!
*©️ व. पु. काळे...*
*ओंजळीतले मोती...*
🪴🧘🏻♀️💫.
Comments
Post a Comment