Posts

Showing posts from February, 2021

भांडणाचे नियम

मुक्ता पुणतांबेकर यांची पोस्ट *भांडणाचे नियम*  *'घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच'* हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत हे वाक्य शब्दश: खरं ठरतंय.  २४ तास घरात राहून लोक चिडचिडे झाले आहेत. त्यामुळे भांडणं वाढत आहेत.  आमच्याकडे व्यसनाधीनतेच्या सल्लासाठी मुख्यतः फोन येतात. पण काही वेगळ्या कारणांसाठीही येत आहेत. *'घरातली भांडणं'* हा देखील महत्वाचा विषय झाला आहे.  परवाच पत्नीबरोबरच्या सततच्या  भांडणाला वैतागलेल्या एका गृहस्थांचा फोन आला. ते म्हणाले *"तुम्ही सल्लागार आहात तर ही भांडणं थांबवण्याचा उपाय सांगा".* मी त्यांना म्हटलं, *"भांडणं पूर्ण थांबवता तर येणार नाहीत. पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले तर त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल".* *'भांडणाचे नियम'* हे माझे शब्द ऐकताच त्यांना आश्चर्य वाटलं. पण हे नियम समजून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.  म्हणून मी त्यांना विचारलं, *"नुकत्याच झालेल्या भांडणाविषयी सांगा".*  ते म्हणाले, *"कालच हिने मला अजिबात न आवडणारी भाजी केली. माझी चिडचिड झाली. मी तिला बोललो ती ही बोलल...

टर्न ऑफ टाईड

आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.  त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली... शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले ... ‘‘मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची खात्रीही देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी.’’  गॉर्डन तयारच होते... त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले,  ‘‘या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा. पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको. दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’  दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले...  सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली...  त्यावर लिहिले होते ... ‘ऐका.’  काय ऐकायचे... ?  त्यांना प्रश्‍न पडला...  ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले... एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले... झाडीतून वाह...

सहजीवन म्हणजे काय?

••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?*  *आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही...

मराठी

*कृपया वाचावे जमल्यास फॉरवर्ड करावे , झालाच तर थोडाफार मराठीला फायदा होईल .* एक होतं गाव.  "महाराष्ट्र" त्याचं नाव.  गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते.  "मराठी" भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं  नांदत होते.  त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं.  वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.  आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, महाराष्ट्रात होता एक भाग.  "मुंबई" त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव...!"  या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. "अतिथी"  जास्त आणि "यजमान" कमी झाले. मुंबई  कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्न ?मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची ...

थडग्यावरची पाटी*

*लेख : थडग्यावरची पाटी* *लेखक : राजेंद्र वैशंपायन* काही दिवसांपूर्वी मला एका स्नेह्यांनी एक फोटो पाठवला. एका थडग्याचा फोटो होता तो. सर्वसाधारणच थडगं होतं ते पण एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट त्यात होती जी मला भावली ती म्हणजे त्या थडग्यावर असलेल्या संगमरवरी पाटीवरील, कोरलेली दोन वाक्य. ती वाक्य होती मै अहम था । वही वहम था ।। याचा अर्थ असा की मी स्वतःला खूप महत्वाचा किंवा मौल्यवान समजत होतो पण तोच माझा गैरसमज होता. ती दोन वाक्य मला खोल विचारसागरात घेऊन गेली.  आपल्याशिवाय कुणाचं काहीही अडत नाही याची पहिली चाहूल मला मी पहिली नोकरी बदलली तेव्हा लागली. राजीनामा देताना मनात वाटलं होतं की " मी असताना माझी किंमत नाहीये, पण सोडून गेलो ना,  की कळेल माझ्याशिवाय किती अडतं ते !!"  पण तसं खरंच अडलं का कुणाचं? अजिबात नाही. मी नसण्यामुळे अगदी अल्प काळ गैरसोय झाली असेल फार तर, पण अडलं कुणाचं खेटर सुद्धा नाही. पण या प्रसंगामुळे माझ्याबाबतीत मात्र स्वतःविषयीच्या माझ्या एक मोट्ठ्या गैरसमजाला सुरुंग लागला होता. जीवनाच्या या कटूसत्याशी माझी पहिली ओळख झाली होती. "मै अहम था । वही वहम था ।।...

Attachment in Detachment

Attachment in Detachment  Written by Sudha Murthy,  wife of Narayan Murthy.. worth reading, plz dont miss it,  👌👌👌 it is simply mind blowing the way she explained ,in fact  a real eye opener for many of us .  ****she writes 👇🏻**** "When my daughter, the elder of my two, wed and left home, I felt a part of me gone. With a daughter and a son, I know what both mean, differently. When she was in her teens I felt as if she was my "physical extension" ! So when she left home to set up her own, I felt I lost a limb. Next time she came to stay with us, I was astonished how her priorities had changed. We too must've given the same shocks to our own parents ! When she said Amma, she meant her mother-in-law, not me! I felt she was always in a hurry to go back to her house and not stay with me for a few more days.  That was the first time, it dawned on me that I have to start practising detachment with attachment. Two years after my daughter’s marriage, my son lef...

स्विकार करा आणि अयुष्य आनंदात

नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा, व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी, घरी राहणाऱ्याला वाटतं काही तरी करावं पण घराबाहेर पडावं, एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त, वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही, गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा, शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे, देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं, परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो, केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता एक मूल असतं त्याला वाटतं  दोन असती तर, दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत, मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता, मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते, ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल, नावे ठेवणारे रामातही दोष बघतात कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात मिळून काय? नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही. मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे. किती गोंधळ रे देवा हा? तू बसलाय वर निवांत आम्ही मात्र खाली बसलोय धक्के खात! म्हणुन म्हणतो जे आहे ते स्विकार करा आणि अय...

विसरलेले पाकीट...

विसरलेले पाकीट...!!!  असाच एके दिवशी... ऑफीसला निघालो..... किल्ली, रूमाल, लॅपटॉप, टिफीन सगळं घेतलंय नां ... जाताना बायकोने विचारले... तीला एक फ्लाईंगही...दिला.... तीही नई नव्हेली दुल्हनसारखी लाजलीये...  दिवसाची लईच भारी सुरवात... गाडी सुरू केली....  पेट्रोलच्या काट्यानं मान टाकलेली...  पम्पम् करत गाडी पेट्रोल पंपावर... " दोनशेचं टाक रे...." त्यानं गाडीच्या टाकीत भुरूभुरू पेट्रोल ओतायला सुरवात केली.... मी पँटच्या खिशात हात घातला....  तिथली जागा रिकामी! आयला...!!! पाकीट विसरलो.... वरच्या खिशात हात घातला. तो ही रिकामा... बोंबला आता..!!! आयला.... फोनही विसरलो....  माझा चेहरा पार ऊतरलेला...  आजूबाजूला पाहिलं कुणीही ओळखीचं दिसेना.... प्रचंड लाज वाटायला लागली... तसा हा पंप ओळखीचा.... घरापासून दीड किलो मीटरवर गेली वीस वर्ष इथंच पेट्रोल भरतोय... पण हे एकतर्फी प्रेमासारखं...!!! आता पंप ओळख देईल... याची गॅरंटी वाटत नव्हती... दातओठ खावून निर्णय घेतला... ठरलं... गाडी इथंच लावायची....  इथं साली रिक्षाही मिळत नाही... जाऊ दीड किलोमीटर चालत.... घरनं फोन आणि पैसे घ...

कृतज्ञता परमेश्वराप्रति

कृतज्ञता गोष्ट - एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला. सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही. भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला. तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले. धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली. दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली. तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले. दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही. तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच; आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व  सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली. दहावे सफरचंद तर त्याने टाकून दिले. ह्या मानवी वृत...

कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन !

*. . . कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन !* 🔲 तेव्हाचं जीवन कसं शांत, तरल आणि निश्चितीचं होतं. उगवणारा दिवस सार्‍यांनाच प्रेमानं पोटाशी धरायचा आणि जगण्याचं एक निश्चित आश्वासन द्यायचा. ग्रहगोल फार वक्र नव्हते अन् नियतीही तशी सरळ होती. भाकरीचा प्रश्न सोडवताना तिन्ही प्रहर अन् दिवसरात्रीची सीमारेषा ती पुसत नव्हती. जगण्याची गतीही संथ असल्याने चालताना धाप लागत नव्हती आणि त्याचा फारसा भारही नव्हता. तो 50 सीसीच्या लूना टीएफआरच्या आवाक्यात होता. वाढत्या प्रपंचाला बजाज स्कूटरचा आधार होता !   🔲 पूर्वी आपण मर्यादापुरुषोत्तम होतो. दूरदर्शनशी आपला लग्नाच्या बायकोसारखा निष्ठेने संसार चालायचा. रिमोटने शेकडो चॅनेलची छेड काढणं नसायचं. बुधवारच्या चित्रहारची आणि रविवारच्या रंगोलीची आठवडाभर आस असायची अन् अवघ्या चार गाण्यातही आमची सांस्कृतिक भूक भागायची! शोभना जगदीश अथवा सलमा सुलतान शांतपणे समाचार वाचायच्या. 'आसाम मे भारी बाढ' वगैरे टाईपच्या बातम्या असायच्या. 'मौसम की जानकारी ' सांगेपर्यंत त्या शिस्तीने पाहिल्या जायच्या ! उगा आरडाओरड नाही वा दर तासाला ब्रेकिंग न्यूजच्या नावानं हल्लागुल्ला कर...

चौकट आक्रसत चाललीय

_*चौकट आक्रसत चाललीय...*_ लेखक- श्री ‌ प्रभाकर जमखंडीकर.        माझ्या घराजवळच एक लॉन्ड्री आहे. एक 65 वर्षाच्या आजी ती लॉंड्री चालवतात. तशा त्या 'वेल टू डू' फॅमिलीतल्या आहेत. मुलगा त्यांचा इंजिनिअर आहे. पण वेळ छान जावा आणि तब्येत व्यवस्थित रहावी म्हणून त्या काम करतात.          आठवड्यातून दोनदा मी लॉन्ड्रीत जातो. बरेचदा आजींच्या मैत्रिणी तिथे गप्पा मारण्यासाठी जमलेल्या असतात. कधी कधी आजींची नातवंडं सुद्धा तिथे खेळत असतात. खोड्या करतात, भांडतात. आजी सर्वांना मायेनं सांभाळून घेतात.         असाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षाचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड.         तो त्याच्या आजीला सांगत होता, "आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ."       आजीने विचारलं," का रे, काय केलं त्या आजीनं तुला?       तो: "काही नाही असंच....

थडग्यावरची पाटी

*लेख : *थडग्यावरची पाटी *लेखक : राजेंद्र वैशंपायन* काही दिवसांपूर्वी मला एका स्नेह्यांनी एक फोटो पाठवला. एका थडग्याचा फोटो होता तो. सर्वसाधारणच थडगं होतं ते पण एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट त्यात होती जी मला भावली ती म्हणजे त्या थडग्यावर असलेल्या संगमरवरी पाटीवरील, कोरलेली दोन वाक्य. ती वाक्य होती मै अहम था । वही वहम था ।। याचा अर्थ असा की मी स्वतःला खूप महत्वाचा किंवा मौल्यवान समजत होतो पण तोच माझा गैरसमज होता. ती दोन वाक्य मला खोल विचारसागरात घेऊन गेली.  आपल्याशिवाय कुणाचं काहीही अडत नाही याची पहिली चाहूल मला मी पहिली नोकरी बदलली तेव्हा लागली. राजीनामा देताना मनात वाटलं होतं की " मी असताना माझी किंमत नाहीये, पण सोडून गेलो ना,  की कळेल माझ्याशिवाय किती अडतं ते !!"  पण तसं खरंच अडलं का कुणाचं? अजिबात नाही. मी नसण्यामुळे अगदी अल्प काळ गैरसोय झाली असेल फार तर, पण अडलं कुणाचं खेटर सुद्धा नाही. पण या प्रसंगामुळे माझ्याबाबतीत मात्र स्वतःविषयीच्या माझ्या एक मोट्ठ्या गैरसमजाला सुरुंग लागला होता. जीवनाच्या या कटूसत्याशी माझी पहिली ओळख झाली होती. "मै अहम था । वही वहम था ।।...

सर्वे सन्तु निरामयः

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!… कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे :- 1) सतत पॉझीटीव्ह - कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. २) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल. त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एक...

जिवनात गंभीर बनू नका

🌀 *|| जिवनात गंभीर बनू नका ||*🌀 -------------- *♻️ फार गंभीर बनून जगू नका.* हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. *♻️ या जगात आपले काहीच नसते,* त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक ,मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने रहा. *♻️धर्म, जात,तत्व , या गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत,* त्यामध्ये अडकून पडू नका..स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका. *♻️इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका.* त्यांचे जीवन ते जगले. तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या. *♻️आता काळ बदलला आहे.* आपली खरी गरज काय आहे,ओळखा! उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका. *♻️हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना,* क्षुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका. जीवन गंमतीने जगा! *♻️जरा मोकळे पणाने हसा. इतरांनाही आनंदी करा.* लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका. *♻️लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या.* सतत गंभीर बनू नका. ...