खयाल अपना अपना

*खयाल अपना अपना,*
*अंदाज अपना अपना*

*माझे प्रदिर्घ काळ नाशिकला वास्तव्य असुनही माझ्या गावाकडील माणसांच्या मनात/हृदयात देखील मी वास्तव्य करीत असल्याचे माझ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सिध्द झाले आणि मी सदगदीत झालो....!!!!! 😊* 
*तेव्हा आलेला विचार आपल्यापुढे नमुद करतो...*

*तीन/चार रुम किचनचा एखादा फ्लॅट, किंवा प्रशस्त बंगला, दोन चार एकरचे फार्म हाऊस एखाद दोन, चार चाकी गाड्या असं भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो, "अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !"*
*म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय. पण सुखी काही दिसत नाही!*
*आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं, घर भरलेलं असायचं. दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही!*
  *मग आता काय झालं ?*
  *मजा कुठ गेली?*
  *एकटं एकटं का वाटतं ?*
  *छातीत धडधड का होते ?*
*सारखी हुरहुर कशी वाटते ?*
  *कशामुळे करमत नाही ?*
 *कारण...*
*विश्व निर्माण करण्याची व्याख्या आपली कुठेतरी चुकली.* 
*विश्व निर्माण करणं म्हणजे…!* 
 *नाती गोती जपणं*
 *छंद जोपासणं*
 *पाहुणे होऊन जाणं*
 *पाहुण्यांचे स्वागत करणं*
 *खूप गप्पा मारणं*
 *घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं खळखळून हसणं*
 *आणि*
 *काळजातलं दुःख सांगून* *मोकळेपणाने रडणं !!!* 
*या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तरच ”शून्यातून विश्व निर्माण केलं” असं म्हणता येईल.*

*आता सांगा बघु, आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट ?*
 *आपलं खर दुःख आपण मोकळेपणाने किती जणांना सांगू शकतो ?*
 *असे किती मित्र, शेजारी, नातेवाईक आपण निर्माण करू शकलोत ?*
 *नसेल तर मग आपण खऱ्या अर्थाने ” विश्व निर्माण करू शकलो का ?* 
*असेल नसेल तरीही यावर नक्कीच मंथन व्हायला हवे..!!*

*मित्र हो ,*
 *रजिस्ट्रर दस्तऐवजाच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व ?*
 *भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व ?* 
*"लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व ?*
*मुखवटा घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व ?* 
 
*मोठं बनण्याच्या दडपणामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील..  इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील…*
*दुःख व्यक्त करायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल...*
*तर…..* 
 *आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, की विश्वातून शून्य ?*

*अशा अनेक बड्या बड्या रूस्तुमांचा अमरधामकडे जाण्याच्या अंतीम प्रवासाचा मी स्वत: साक्षीदार आहे, त्यावेळची माणसांची अतिशय नगण्य व केविलवाणी उपस्थिती मन विषण्ण करून जाते. आणि मग प्रश्न उपस्थित होतो, त्यांनी नेमके कोणते विश्व निर्माण केले असावे बरे ?*

*शेवटी खयाल अपना अपना अंदाज अपना*   - डॉ. शिरीष राजे 🍃

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार