आस्तिक किंवा नास्तिक

*आस्तिक किंवा नास्तिक हा* *प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे,* तरी डोळसपणे विचार पूर्वक सत्य काय आहे हे जाणून घ्या...
०१) माणूस सोडून एकही प्राणी देव मानत नाही...

०२) जिथं माणूस नाही पोहचला तेथे मंदिर, मस्जिद किंवा चर्च नाही सापडले...

०३) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत याचाच अर्थ मानवाला जशी कल्पना सुचली तसा देव तयार झाला...

०४) जगात अनेक धर्म व पंथ व स्थानिक देवता आहेत याचाच अर्थ देव सुद्धा एक नाही...

०५) सातत्याने नवनवीन देव तयार होत आहेत...

०६) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत...

०७) "मानला तर देव नाही तर दगड" ही म्हण उगीचच नाही तयार झाली...

०८) "तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी" हे संत वचन...

०९) जगातील देवतांचे वेग वेगळे आकार व त्यांना प्रसन्न करण्याच्या वेगवेगळ्या पुजा...

१०) आतापर्यंत ठामपणे मला देव भेटला असे कुणी सांगु शकला नाही आणि याचा प्रत्यक्ष पुरावाही देऊ शकला नाही...

११) देव मानणारा व न मानणारा ही सारखेच आयुष्य जगतो...

१२) देव कुणाचेच काहीही भले वा वाकडे करू शकत नाही...

१३) देव कोणताही भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, चोरी, बलात्कार, आतंकवाद, अराजकता रोखू शकत नाही...

१४) लहान, निष्पाप बालकांवर गोळ्या घालणाऱ्यांचे हात धरू शकत नाही...

१५) मंदिर, मठ, आश्रम, प्रार्थना स्थळे व देवांचे वास्तव्य ज्या ठिकाणी मानले जाते त्या ठिकाणी सुद्धा बालके, स्त्री सुरक्षित नाहीत...

१६) मंदीर मस्जिद व चर्च पाडताना देव एकदाही आडवा आला नाही की बांधताना नगर पालिकेची परवानगी घेतली नाही... 

१७) अभ्यास न करता एकाही देवाने विद्यार्थ्याला पास केल्याचे आठवत नाही...

१८) केदारनाथमध्ये एकाच वेळी १०००० लोक मेली, वर्षानुवर्षे मक्का मदिनेत चेंगरा-चेंगरी होऊन हजारो लोक मेलेत. एकालाही त्याने वाचवले नाही...

१८) ब-याच देवांचा २५ 
वर्षापूवी मागमुसही नव्हता ते प्रख्यात देव झाले आहेत...

१९) स्वतःस भगवान म्हणून घेणारे सध्या जेलची हवा घेत आहेत, का त्यांना भगवान बाहेर काढत नाहीत? 

२०) जगात २५० कोटी लोक देवच मानत नाहीत तरी ते समाधानाने व आनंदाने रहात आहेत...

२१) हिंदु अल्लाला मानत नाही, मुस्लीम देवाला मानत नाही, ईसाई देव व अल्लाला मानत नाही, हिंदू मुस्लिम गॉड मानत नाही तरीही कोणत्याही देवाने एकमेकांला विचारले नाही की असं का?

२२) एक धर्म म्हणतो त्याला आकार नाही दुसरा त्या देवाला आकार देवून फॅन्सी कपडे घालतो तिसरा वेगळच काही तरी सांगतो म्हणजे नेमके चाललय तरी काय या देशात? 

२३) देव आहे तर लोक धाक का पाळत नाहीत? 

२४) समाजात घातक गोष्टी का करतात? 

२५) जो मांसाहार करतो तोही जगतो, नाही करत तोही जगतो, आणि जो दोन्हीही खातो तोही जगतोच की...

२६) निरपराधांची हत्या होते, स्त्रियांचे - मुलींचे बलात्कार होतात तेव्हा देव कुठे असतात? 

२७) आपल्याकडे ३३ कोटी पेक्षा अधिक देवी-देवता, अधिक महाराज अधिक अल्लाह अधिक गॉड अधिक संत, महंत यांचा अक्षरशः ऊत आला आहे तरी पाऊस नाही, गरीबीपासून मुक्ती नाही, शेतक-यांच्या आत्महत्या कमी नाहीत बलात्कार कमी नाही, रोगराई कमी नाही, भ्रष्टाचार कमी नाही.
'देव-देवतांच्या पुजा करण्या पेक्षा महापुरुषांचे विचार मनात रुजवले पाहिजेत.या सर्व बाबी वरून लक्षात येते की माणसाला देवाचा धाक नाही..

आपले संस्कार,रुढी,परंपरा 
या गोष्टींचा आपल्या मनावर एवढा पगडा पडला आहे की यातून बाहेर पडायची आपली मानसिकता व संवेदनाच बधीर झाली आहे.

कारण देवाचा निर्माता मानव आहे या बाबच तो लक्षात घेत नाही. बिच्चारे देव तरी काय करणार? यावर उपाय एकच...

     प्रयत्नवादी बनणे..
     विज्ञानवादी बनणे ... 
     सत्यावर विश्वास ठेवणे..

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार