सुरम्य संध्याकाळ अर्थात सेकंड इनिंग

*"चला स्वागत करूया उतार वयाचे"*
*सुरम्य संध्याकाळ अर्थात सेकंड इनिंग*
 नमस्कार मी जयश्री शहा धुळे , संस्थापक अध्यक्ष सावली ज्येष्ठ महिला नागरिक संघ 

मंडळी आज मी तुमच्याशी काही विचार शेअर करायला आले आहे साधारण वयाच्या 55 नंतर आपल्या निवृत्तीचे वेध लागतात व 60 वर्षांनंतर तर चक्क सर्वार्थांनी निवृत्ती येते मुलांच्या संगोपनाची, शिक्षणाची , लग्नाची जबाबदारी संपलेली असते. आपला जर व्यवसाय असेल तर नकळत तो आपण पुढच्या पिढीवर सोपवलेली असते  आणि सर्विस जॉब करत असू तर रीतसरच  निवृत्त झालेला असतो. पूर्वी याला उतारवय, म्हातारपण, वार्धक्य असे म्हणतात. खरंतर म्हातारा म्हटलेलं कोणालाही आवडत नाही आता मात्र या वयात 'सीनियर सिटीजन' असे छान नाव मिळाले आहे. आपल्या जीवनाच्या बालपण, तारुण्य, वार्धक्य अशा तीन अवस्था असतात. पूर्वी याला वानप्रस्थाश्रम असे म्हणत मात्र हे निवृत्तीचे वय म्हणजेच ही सेकंड इनिंग आपल्याला संध्याकाळ झाल्याचे जाणून देते व संध्याछाया भिवविती हृदया अशी कातर अवस्था आपली होते. कारण जबाबदार्‍या कमी झालेल्या असतात , कामाचा भार हलका ,कमी झालेला असतो . त्यामुळे भरपूर मोकळा वेळ मिळतो. आजपर्यंत असा रिकामा एवढा वेळ आपल्याला न मिळाल्यामुळे , त्याची सवय नसल्यामुळे एकटे , एकाकी वाटू लागते . शरीराची कार्यक्षमताही कमी झाल्याचे जाणवते. घरातली माणसे जरी आपल्याशी खूप बोलत नसली तरी आपलेच अवयव एक एक करून बोलू लागतात. डायबेटीस, सांधेदुखी, कंबर दुखी ,मोतीबिंदू ,अपचन, विस्मरण इत्यादी आजारांशी आपल्याला सामना करावा लागतो. आपले इन्कम कमी झाले तर औषध गोळ्या मुळे खर्च वाढलेले असतात. आपण काही करत नसल्यामुळे निरोपयोगी झालो आहोत, आपली कोणाला गरज नाही ही भावना पोखरू  लागते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पुढील पिढीवर अवलंबून राहावे लागते, व तेच नेमके आपल्याला आवडत नसते, सोसत नसते.
 परंतु मित्रांनो निवृत्ती हा जीवनाचा पूर्णविराम नसून आयुष्यातील एक स्वल्पविराम आहे. विज्ञानाने आयुर्मान वाढले आहे, निराश होऊ नका . अजून बरेच आयुष्य बाकी आहे. जीवन छान आहे, छान ठेवणे, छान वाटणे आपल्याच हाती आहे.

 मंडळी आपण जसे आपल्या तरुणपणी पुढे आपल्याला पैसे लागतील, मुलांची शिक्षणे, लग्न करावयाची आहेत म्हणून जसे पैशाचे नियोजन करतो, करावयाचे ही असतेच. तसेच उतारवयातही औषधे, मोठे आजारपण, प्रवास इत्यादींसाठी ही खर्च असणार म्हणून स्वतः करता व आपल्या पार्टनर करता म्हणजे जोडीदारा करता पण , आर्थिक नियोजन प्रथम पासूनच करावे की  जेणेकरून आपण आर्थिक दृष्ट्या तरी परावलंबी राहणार नाही. हे जसे आर्थिक नियोजनाचे तसेच आपल्या उतारवयात निवृत्तीनंतर जो भरपूर मोकळा वेळ मिळेल त्याचे काय करायचे याचे नियोजनही आपल्या तरुणपणापासूनच निदान वयाच्या 50 पासून तरी करायलाच हवे.
 लक्षात ठेवा मंडळी आनंदी माणूस सर्वांना आवडतो. सततच  रडगाणे सांगणारा, गाणारा मनुष्य कोणालाच आवडत नसतो. सुरेश भट आपल्या एका गजल मध्ये  म्हणतात -

अखेर मला जाताना सरणावर कळले होते| मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते||

 म्हणून स्वतःला सुखी आनंदी ठेवायचे असेल तर आर्थिक स्वावलंबन, फिटनेस व छंद या त्रिसूत्री लक्षात ठेवावी - अमलात आणावी.

 उतारवयात स्वतःला फिट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. साठी ही खरंतर तरुणपणापासूनच निदान वयाच्या पन्नाशी नंतर तरी सकाळी फिरणे ,योगासन प्राणायाम, हास्य  वगैरे चा एकादा  समवयस्क ग्रुप केल्यास प्रकृती चांगली राहते.निदान वेदना प्रकृतीच्या तक्रारी  कमी होतात . समवयस्क मध्ये  मन ही रिलॅक्स राहते .

तरुणपणी अनेक गोष्टी आपण वेळेअभावी केलेल्या नसतात ही हीच वेळ असते, आपले छंद पुन्हा नव्याने जागविण्याची!  गाणे, पेंटिंग पर्यटन, बागकाम, वाचन-लेखन, तीर्थयात्रा, बुद्धिबळ इत्यादी यातील आपल्याला आवडणारी झेपणारी सोयीची गोष्ट निवडून मनापासून स्वानंद सुखाय त्यात रमणे. मैत्रिणींनो आपला फिटनेस चांगला ठेवण्यासाठी जसा व्यायाम आवश्यक आहे, तसा आहारही हलका पचेल असा, पण सकस, सर्व विटामिन्स, प्रोटिन्स यांनी युक्त हवा. तसेच आहाराला जोडीला डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी, कॅल्शिअम किंवा एखादे सप्लीमेंट्री फूड चाही  अवश्य वापर करावा.

 मन रिलॅक्स आनंदी ठेवले की आपोआप सकारात्मक विचार येतील. जे आहे ते आनंदाने मान्य केलंत की सारं काही सुसह्य होतं. वय वाढले तरी मन नेहमी तरुण पाहिजे. यासाठी मन नेहमी गुंतलेले हवे. घर कामात जमेल तशी सुना मुलांना मदत करावी. सकाळी दूध आणणे , बाग असल्यास पाईप ने पाणी घालने, नातवंडांना गाणी गोष्टीत रमवणे , शाळे साठी रिक्षा बस पर्यंत सोडणे,आणणे , हुकूम सोडू नयेत , आपल्या या छोट्या गोष्टींमुळे पुढच्या पिढीत व आपल्यात एक सुसंवाद राहतो.

लक्षात ठेवले पाहिजे की पुढच्या पिढीच्या संसारात व्यवहारात , ढवळाढवळ करू नये. त्यांचे निर्णय त्यांना घेवू द्यावेत .स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे आहे. मागितला तरच सल्ला द्यावा. सारख्या सूचना करू नयेत . आपणही कधी सुनेच्या भूमिकेत होतो हे लक्षात ठेवावे . मंडळी आमच्या वेळी असे होते, आमच्या वेळी तसे होते, याचा सारखा गजर करू नये . पुढील पिढीशी जुळवून घेणे, सीनियर सिटीजन ला खूप गरजेचे आहे .

हे युग कॉम्प्युटरचे , इंटरनेटचे आहे. खरं तर जेष्ठांसाठी ही पर्वणी वरदान आहे .आपण ज्येष्ठांनी जरूर कॉम्प्युटर शिकून घ्यावा. क्लासला जावे, नाहीतर आपली नातवंडे आपला गुरू असतात,  त्यांच्याकडूनही आपल्याला हे आधुनिक तंत्रज्ञान शिकता येईल . मात्र त्यांच्या सवडीने , गोड बोलून त्यामुळे नातवंडात व आपल्याला एक मैत्रीचे नाते, अटॅचमेंट व सुसंवाद राहील .एकदा का तुम्ही कॉम्प्युटर शिकलात, की सारे जग तुमच्या एका मुठीत म्हणजे एका माऊस मध्ये येईल. म्हणतात ना करलो जग मुठ्ठीमे ,  गुगलवर सर्च करता, तुम्हाला जुनी-नवी गाणी, हव्या त्या कविता, स्वयंपाकाची रेसिपी, चांगली व्याख्याने , जे हवे ते मिळत . घरी बसून तुम्ही अगदी परदेशी असणाऱ्या नातेवाईकांशी , नातवंडांशी गप्पा मारू शकता. सिनेमे नाटके गाण्याच्या मैफिली ऐकू शकता. 

तुम्हाला वेळ पुरणार नाही उतारवयातही आपल्याला जगण्याला नवी दृष्टी, नवा अर्थ आणि आयाम देणे, स्वतः जगणं समृद्ध करणे, आपल्याच हाती आहे . मग बघा उतार वयाचे , म्हणजेच आपल्या संध्याकाळचे रंग सुद्धा केशरी नारंगी रंगाणी उजळून ,आपली संध्याकाळ झळाळून उठेल.

हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी मंगेश पाडगावकर म्हणतात तुम्ही ठरवा ...

पेला भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं.
पेला अर्धा  सरला आहे असा सुद्धा म्हणता येते. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
 तुम्हीच ठरवा ....
सांगा कसं जगायचं की  गाणं म्हणत ....

मित्रांनो,  आपल्या ज्येष्ठांना भले ऊर्जा कमी असेल, मानवा आहे, कल्पकता प्रतिभा ओसरली असेल, मान्य आहे, पण अनुभवाचे कुंभ भरलेले आहेत. अनुभवांचा खजिना भरला आहे . आपल्या जवळ अनेक कला आहेत. उदाहरणार्थ सुबक रांगोळी, जुन्या ओव्या ,जात्यावरची गाणी ,खाण्याचे रुचकर पौष्टिक पदार्थ, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती औषध , या सर्वांचा उपयोग तारतम्याने, विवेकाने आपण आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी करता येईल . मात्र त्यात इद न मम  अशी भावना ठेवावी, कुठलही आन n आणता  इतरांना जे  देता येईल ते द्यावे . ज्या  निवृत्त शिक्षिक असतील, किंवा   शिकवण्याची आवड असली , त्या व्यक्तींनी आपल्या आयत्या वेळात समाजातील, गल्लीतील, कॉलनीतील गरजू मुलांना काही वेळ शिकवले तर यासारखे दुसरे समाधान नाही . पुण्य लाभेल ते वेगळेच . आतापर्यंत आपण काम करत होतो अजूनही दिवसभर नसले , तरी प्रकृती चांगली असल्यास एखादे कामही करू शकतो.  एखाद्या स्वयंसेवी संस्थे बरोबर समाजासाठी आरोग्य, पर्यावरण ,शिक्षण, संस्कार यांच्यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्यास जे समाधान आहे ते स्वतःहून बघावं . त्यामुळे आपला स्वतःचा आनंद व मी काहीतरी करू शकतो/ शकते हा आत्मविश्वास येतो. मी निरूपयोगी नाही हे आत्मभान तेंव्हा  सुखद जीवन जगण्याचे नवे बळ देईल . जगणं सुंदर करू पाहणारी एक प्रगत दृष्टी आपण मिळवूयात.

 एक कवियत्री म्हणते 
ये देहलीज एक एसी देहलीज है 
जहा मन सच्चा होता है,
हाथ में खिलोना हो ना हो, पर मन बच्चा होता है|

 मला पुढच्या पिढीला एवढेच सांगायचे आहे की लक्षात ठेवा महावृक्ष ही उन्हाळा सोसतो,  पावसाळा पेलतो, घरटातल्या पिलांना जीवापाड जपतो.
 म्हणून म्हणते मित्रांनो ,
पेड फल नही देते तो क्या, छाया तो देते है ,
उन्हे अंगण मे रहने दो , बडोंके हात अच्छे लगते है, उने साथ मे रहने दो 

मित्रांनो वार्धक्यच्या उंबरठ्यावर आधुनिक काळाने स्वावलंबन अन् आत्मनिर्भर तेची    आधुनिक काठी ज्येष्ठांच्या  हाती दिली आहे . 

स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःचं अस्तित्व, सुख, आरोग्य, अबाधित ठेवण्यासाठी ज्येष्ठांनी स्वतःला सक्षम ठेवले पाहिजे.

श्रीमती जयश्री अभिमन्यू शाह
अकबर चौक 
धुळे 

(लेख आवडला असल्यास नावा सहीत forward करावा )

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार