औषधी मार्केटिंग चा भयानक विळखा
औषधी मार्केटिंग चा भयानक विळखा पडून भारतीय जनतेचे क्रूरपणे शोषण चालू आहे... यावर प्रकाश टाकणारा अत्यंत अभ्यासपूर्ण लेख, आमचे स्नेही संपादक प्रकाश पोहोरे यांनी लिहिला आहे...वाचा... मनन करा...
(लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती)
एका अर्थाने हे बरेच झाले देशाची इडा-पीडा आता गेली आहे असे काही काळ तरी म्हणता येईल. याच व्यक्तीच्या प्रभावामुळे योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध यांसारख्या आयुष मंत्रालयानी मान्यता दिलेल्या एकाही चिकित्सा पद्धतीचा अंशमात्रही स्वीकार देशाच्या प्रशासन व्यवस्थेनी केलेला नाही. अॅलोपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये कोरोनावर एकही खात्रीलायक तपासणी व उपचार किंवा औषध नसताना *प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, रेम्डेसिवीर, लोपींनावीर-रोटिनविर, एण्टेरोफुरोन B1 असल्या अत्यंत विषारी औषधांचा देशातील नागरिकांवर प्रयोग कुणाच्या इशाऱ्यावर करण्यात आला हे देशातील नागरिकांना कळायलाच हवे.* या भयंकर औषधांपेक्षा *हार्वर्ड मेडिकल स्कूलनी आपल्या प्रदीर्घ संशोधनानंतर व युरोपच्या लंडन येथील कॉमन कोल्ड लॅबच्या वैज्ञानिकांनी जवळजवळ १९४९ ते १९९९ या पन्नास वर्षांच्या अब्जावधी स्टरलिंग पाउंड खर्च करून केलेल्या संशोधनानंतर असे सिद्ध केले की, ILU म्हणजे इंफ्लुएंजा लाइक इलनेस वर कोणतीही लस अॅलोपॅथिक डॉक्टरांना शोधता आलेली नाही; परंतु भारतीय स्वयंपाक घरातील हळद, लसूण, अद्रक, सुंठ, काळीमिरी, पिप्पली, दालचीनी, मध या औषधांचा उपचार सर्व अशा विषाणूजन्य व्याधींवर सर्वोत्तम उपाय आहे.* मग अशा अत्यंत निरापद उपचारांना मज्जाव का करण्यात आला? याबाबत देशातील सर्व डॉक्टर्स व बुद्धिजीवी मौन का बाळगून आहेत? कोरोनावरील उपचारामध्ये इतर शासनमान्य चिकित्सापद्धतींना वाव का दिला गेला नाही? संपूर्ण देशामध्ये एकाही कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करण्याची संधी आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देण्यात का आली नाही? *योग व आयुर्वेदासारख्या जगातील सर्व चिकित्सापद्धतीची जननी असणाऱ्या प्राचीन भारतीय चिकित्सेला ही अपमानास्पद वागणूक देण्याच्या या षड्यंत्रामागे मेडिकल इंडस्ट्रीच्या कोणत्या एजंटचे काम आहे हे देशाला कळायलाच हवे.* आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आदि चिकित्सापद्धतीच्या डॉक्टरांना नॉनमेडिको म्हणून हिणवण्याचा उर्मटपणा या कोरोनाच्या भयंकर (?) आपत्तीत भारतीय मेडिकल कौन्सिलद्वारा कोणाच्या इशाऱ्यावर केला गेला याची उत्तरे देशाला मिळणार नाहीत हे लोकांना माहीत आहे; परंतु देशातील नागरिक आयुषचे अनुसरण करून या भ्रष्ट मेडिकल लॉबीला याचे उत्तर देऊ शकतात. *आता अॅलोपॅथीचे घोर अपयश झाकण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या ट्रायल्स घेण्याचा बनाव केल्या जात आहे;* परंतु अॅलोपॅथीच्या उर्मट डॉक्टरांना एक साधी बाबसुद्धा लक्षात येत नाही, की क्लिनिकल ट्रायल्स या सिन्थेटिक केमिकल औषधांच्या घ्यावयाच्या असतात. कारण त्यामुळे मानवाला फार मोठा धोका असतो. आयुर्वेद तर स्वयंसिद्ध आहे. *गेल्या हजारो वर्षांत आपल्या असंख्य पिढ्यांनी अद्रक, हळद, काळीमिरी, दालचीनी, लसूण, आवळा, मध, गुळवेल, तुलसी, नीम आदि असंख्य आयुर्वेदिक औषधांनी आपले अनेक आजार ठिक केले व आरोग्य टिकविले आहे.* या सर्व औषधी अत्यंत निरापद असल्याबद्दल संपूर्ण जगात कोणीही हरकत घेणार नाही.
अगदी *विश्वविख्यात ब्रिटिश मेडिकल जर्नलने एका संपादकीय लेखात असे स्पष्ट नमूद केले आहे, की भारतामधील अॅलोपॅथिक चिकित्सा प्रणाली संपूर्ण जगातील सर्वात भ्रष्टतम चिकित्सा व्यवस्था आहे. कोरोना सारख्या विषाणूच्या उपचारामध्ये जिथे सर्व तथाकथित केमिकल्स औषधींचा खर्च दोन-तीन हजारांपेक्षा जास्त नाही तिथे प्रत्येक खासगी इस्पितळांमध्ये प्रत्येक रुग्णाला चार ते पाच लाखांचे बिल देण्यात आले. अशा खासगी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची प्रचंड हेळसांड, तपासण्या व उपचारांचा फोलपणा संपूर्ण देशाने अनुभवला आहे. देशभरात अनेक मृत्यू कोरोनामुळे नव्हे, तर या भयंकर अॅलोपॅथिक औषधांनी झाले आहेत.* यातही अत्यंत क्षुब्ध करणारी बाब म्हणजे कोणती औषधी कोणत्या रुग्णाला द्यावयाची ते कम्प्युटरद्वारा लॉटरी पद्धतीने ठरविले जाते. यातही भयंकर बाब म्हणजे WHO ने आता या भयंकर केमिकल अॅलोपॅथिक औषधी सोलीडरिटी ट्रायल्स म्हणजे छोट्या डुक्करांवर त्यांचे परीक्षण न करता सरळ माणसांना देण्यास परवानगी दिली आहे. म्हणजे माणसेच आता गिमीपिग्स म्हणजे डुक्करांसारखीच आहेत हे अप्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे.
*गेल्या पन्नास वर्षांत अॅलोपॅथिक चिकित्सेमुळे संपूर्ण जगामध्ये एकही व्यक्तीचा बीपी, डायबीटीस, हृदयरोग, कॅन्सर, थायरॉइड, एलर्जी, संधिवात, आमवात, रक्तवात, कावीळ, किडनीस्टोन, दमा, एक्झिमा, सोरीयासीस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठ, मूळव्याध, यौनसमस्या, मानसिक विकार असे असंख्य आजार व याशिवाय अगदी केस गळण्यापासून टाच दुखीपर्यंत एकही व्याधी खऱ्या अर्थाने ठिक झाल्याचे एकही उदाहरण शोधूनही मिळणार नाही.* याउलट संपूर्ण जगाला आजारी करून मृत्युच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचविण्याचे सर्वाधिक श्रेय आजच्या अॅलोपॅथिक डॉक्टर्स व महाकाय हॉस्पिटल्सना व औषधींना जाते. कोरोनामुळे संपूर्ण जगातील अॅलोपॅथिक चिकित्साव्यवस्थेचे अपयश जगजाहीर झालेले आहे. जगातील संपूर्ण डॉक्टर्स, महाकाय हॉस्पिटल्स, या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणवून घेणारी सर्व स्पेशालिस्ट व सुपरस्पेशालिस्ट, अक्राळविक्राळ मेडिकल कंपन्या, अत्युच्च तंत्रज्ञान, आयसीसीयू, व्हेंटिलेटर्स, वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या सर्व तथाकथित अत्याधुनिक लॅब या सर्वांना कोरोनाने गुडघे टेकायला भाग पाडले आहे. या सर्व सायंटिफिक म्हणविणाऱ्या तपासण्यांची व उपचारांची निरुपयोगिता, त्यातील पोरकटपणा, रिपोर्टमधला सावळा गोंधळ, खतरनाक केमिकल औषधांच्या दुष्पप्रभावामुळे मृत्यू पावलेल्या अगदी तरुण व स्वस्थ डॉक्टर्स व लोकांची मोठी संख्या हे सर्व कशाचे द्योतक आहे? जगभरातील कोणत्याही आजारामुळे मरणाऱ्या लोकांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला आहे, असे भासवून संपूर्ण जगाला दहशत पसरविण्याचे कारस्थान करण्याची काही ठरलेली उदि्दष्ट्ये आहेत.
*१.कोरोनावरच्या लसीच्या संशोधनासाठी सर्व देशांकडून हजारो अब्ज रुपयांचा निधी उकळणे.*
*२.लस शोधल्यानंतर त्याच्या दुष्प्रभावाने लोकांचा हकनाक बळी गेल्यास अशा मेडिकल कंपन्यांवर कोणतीही गदा येणार नाही यासाठी सर्व देशांच्या कायद्यामध्ये मेडिकल कंपन्यांना हवे असलेले बदल करणे.*
*३.कोरोनासाठी लागणाऱ्या अब्जावधी टेस्टिंग किट पाच ते दहा पट चढ्या दराने विकत घेण्यासाठी सर्व राष्ट्रांना भाग पाडणे.*
*४. HCQS, रेम्डेसिवीर, लोपींनावीर-रिटोणाविर, एण्टेरोफुरोन बी1 यासारखी अत्यंत महागडी व अत्यंत विषारी औषधे याच कंपन्यांकडून विकत घेण्यासाठी त्या त्या देशातील शासनावर दबाव निर्माण करणे.*
*५.पीपीई किट व मास्क सारख्या अनावश्यक गोष्टींचे महत्त्व वाढवून अब्जावधी रुपयांची रोजची कमाई करणे.*
*६.व्हेंटिलेटर्स व तत्सम मेडिकल उपकरणांच्या विक्रीला प्रचंड मागणी निर्माण करणे.*
*७.सामान्य लोकांमध्ये आजारांची प्रचंड भीती निर्माण करून अधिकाधिक लोकांना अगदी सामान्य सर्दी-तापेसारख्या त्रासासाठी हायटेक तपासण्या व उपचार घेण्यास बाध्य करणे.* आज सामान्यपणे लोक अशा त्रासांसाठी क्वचितच मोठ्या इस्पितळात जातात.
*८.चुकून एखादी लस शोधता आलीच, तर जगातील साडेसातशे कोटी पेक्षा जास्त लोकांनी ही लस टोचून घ्यावी यासाठी वातावरण निर्मिती करणे.*
*९.अशा लसी व औषधी घेण्यासाठी संपूर्ण जगभरातील लोकांना/ शासनाला दरवर्षी किंवा ठराविक मुदतीनंतर विकत किंवा शासनामार्फत देण्यासाठी दबाव निर्माण करणे.*
**(परंतु या दोन ते अडीच महिन्यांच्या काळात सर्वांच्या प्रकर्षाने लक्षात आली असेल ती म्हणजे देशातील ९० टक्के खासगी दवाखाने बंद असूनही समाजामध्ये आजारी पडण्याचे व मृत्युचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. *कोरोना पूर्वी व दरम्यान स्मशानभूमीत किती मृतदेह आले याची माहिती घेतली तरी सर्व पितळ उघडे पडेल.*)** खरेतर अगदी मेडिकल सायन्सच्याच सिद्धांतानुसार कोणताही विषाणू किंवा जिवाणू इतका शक्तीशाली कधीच नसतो की तो अगदी स्वस्थ व्यक्तीला आजारी करू शकेल. लुईस पाश्चर या संशोधकाने १८६४ साली सिंगल जर्म थेअरीचा शोध लावला. १८७० सालापर्यंत संपूर्ण जगाने याला मान्यतासुद्धा दिली होती; परंतु पुढच्या दहा वर्षांतच अनेक संशोधकांनी विशिष्ट जिवाणू किंवा विषाणूमुळे अमुक आजार होतो हे चुकीचे आहे हे सिद्ध केले. म्हणून १८८० च्या दशकात आपल्या पूर्वीच्या सिद्धांताला उलटवत याच लुईस पाश्चरानी पुन्हा नवीन सिद्धांत प्रतिपादित केला तो म्हणजे *NOT THE SEED, SOIL IS IMPORTANT CAUSE OF INFECTIVE DISEASES.* याचा अर्थ कोणताही आगंतुक आजार हा विषाणू किंवा जिवाणूमुळे उत्पन्न होत नसून विशिष्ट अवयवांच्या दुर्बलता व त्यामुळे निर्माण झालेल्या आजारामुळे तिथे जिवाणू किंवा विषाणू उत्पन्न होतात. जिवाणू किंवा विषाणू सतत आपले स्वरूप बदलत असतात. *HOST* म्हणजे रुग्णशरीर त्यातील *एंव्हायर्न्मेंट* म्हणजे वातावरण म्हणजे आरोग्य उत्तम किंवा दुर्बल असणे यामुळेच विषाणू आदिचा संसर्ग होऊन व्याधी निर्माण होतात. एखादा आजार विषाणू किंवा जिवाणू आदिमुळे होत असेल तर अशा जीवजंतूंना नष्ट करण्यासाठी *अँटीबायोटिक्स व अँटीव्हायरल* औषधांची लाखो कोटींची बाजारपेठ प्रत्येक देशात कायमस्वरूपी तयार होते व या कंपन्यांच्या प्रचंड नफ्यामध्ये मोठी वाढच होते; परंतु रुग्ण शरीर निरोगी झाले, त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपाय केले, तर असे आजार पुन्हा येण्याची शक्यता अत्यंत कमी होते. त्यामुळे अशा औषधांची संपूर्ण बाजारपेठ नाहीशी होईल अशी साधार भीती या कंपन्यांना वाटते. म्हणून मेडिकल सायन्सला हा सिद्धांत फायद्याचा नाही असे समजल्यावर पहिल्या सिद्धांताचीच री ओढण्याचे कार्य ह्या नफेखोर मल्टीनॅशनल मेडिकल कंपन्यांनी आजतागायत केले आहे.
हे स्पष्ट समजण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय मूळचे हृदयरोग शल्यविशारद डॉ. संदीप जौहर यांचे पुस्तक ‘‘DOCTORED’’ अमेरिकेत अलीकडेच प्रसिद्ध झाले असून त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे.
*१. अॅलोपॅथिक चिकित्सा व्यवस्था ही अमरवेलीसारखी असून ज्या समाजाच्या आश्रयाने राहते तिलाच संपविल्याशिवाय थांबणार नाही.*
*२. आजचे हॉस्पिटल्स हे सेवा नसून लोकांचे आरोग्य संपविणारी इंडस्ट्री झाले आहेत. महात्मा गांधींनी तर आपल्या हिन्द स्वराज १९३० साली लिहिलेल्या या पुस्तकात अशा इस्पितळांना पापाचा पाया म्हटले आहे.*
*३. डॉक्टर आता देव नसून दानव झाले आहेत. हॉस्पिटल्स महाकाय राक्षसासारखे झाले आहेत.*
*४. रुग्ण आता माणूस नसून क्लाईंट किंवा कस्टमर झाला आहे.*
*५. अॅलोपॅथिक चिकित्सापद्धतीमुळे आजचा सर्व सभ्य समाज व संपूर्ण विश्वातील मानवजात रुग्ण झाले आहेत.*
जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या ह्या कालावधीत कोरोनाबाबत अनेक प्रकारचे उलटसुलट मतप्रवाह सर्वांनी अनुभवले; परंतु अगदी परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनसामान्य भांबवून गेला आहे. शासन, प्रशासन व बहुतांश डॉक्टर्स व कॉलर ट्यून आपल्याला कोरोनाबाबत अत्यंत भीतीदायक वातावरणात घेऊन जातात. तर क्वचित समाजातील काही जागृत व विचारवंत मंडळी कोरोनाला अजिबात घाबरू नका असे छातीठोकपणे सांगताना आढळतात. टीव्हीवरील बातम्या आदि बघितल्या की भीतीची प्रचंड छाया निर्माण होऊन भल्याभल्यांची गाळण उडते. अशातच एखादी सोशल मीडियावरील पोस्ट, वर्तमानपत्रातील एखादा लेख मनाला सुखावणारी हळुवार फुंकर घालतात. सारांश म्हणजे आजची प्रचलित अॅलोपॅथिक चिकित्सा व्यवस्था मानवाला कोरोनाच, नव्हे तर अगदी सामान्य सर्दी ते कॅन्सर पर्यंत कोणत्याही आजारापासून वाचवण्यात संपूर्ण अपयशी ठरत असेल, भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा पार करून मानवाला विनाशाकडे नेण्याची सर्व चिन्हे स्पष्ट दिसत असतील, तर अशा व्यवस्थेला तिच्या सर्व शाखांसहित जगातून हद्दपार केले पाहिजे आणि आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी म्हणजेच ayush आयुषचाच आधार घेतला पाहिजे, अन्यथा मानवाचा विनाश अटळ आहे.
Comments
Post a Comment