Posts

Showing posts from July, 2020

एकला चालो

*आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?*                     हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. पूर्वी कुठल्याही सणा - समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी आपापल्या वयाच्या पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गोतात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु करीत. मुलांचा कुठलेही खेळणे उपलब्ध नसले तरी धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितवृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही कुटुंबाकुटुंबांमधील मानापमान, माणसांमधील हेवेदावे होते. बायकांमधली असूया, धुसफूस, अबोला असायचा. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह लोकं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती. लग्नांमध्ये मानापानांवरून भांडणे व्हायची, रुसवे फुगवे व्हायचे. वितुष्ट,अबोला असला तरी तो फार थोड्या  ...

गडकोट स्वराज्याचे, महाराजांचे

रायगडावर नगारखानाच्या खाली कितीही हळू आवाजात बोललो तरी सिंहासनाजवळ आजही स्पष्ट ऐकू येत. ध्वनी क्षेपकाचा शोध लागण्यापूर्वी ध्वनी क्षेपकाशिवाय ऐकू येण्याची ही तंत्रप्रणाली शिवाजी महाराजांनी रायगडावर निर्माण केली. आता..आज.. आमच्याकडे ग्राम स्वछता अभियाने आली  रायगडावर आणि कुठल्याही किल्ल्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी बांधलेली शौचालयं, बंधिस्त गटार योजना आजही आम्हाला विस्मय चकित करते. झाडं लावा झाडं जगवा आज आम्ही सांगतो. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज ज्या गडावर गेले त्या गडावर आंब्याची बाग लावली, ज्या किल्ल्यांवर गेले तिथे वनराई फुलवली. काही वर्षांपूर्वी  राजमाचीचं काम चालू होतं. साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला अँटीचेंबर्स राजमाचीच्या खाली सापडला. हि अँटीचेंबर्स संकल्पना आत्ताची, महाराजांनी त्यावेळी अस्तित्वात आणली. महाराजांनी या गडकोटांच्या आधारावरच असे कैक वैज्ञानिक दृष्टिकोन नवे निर्माण केले. आपल्या हालचालींची आपल्या लोकांना माहिती देता यावी यासाठी शिवाजी महाराजांनी या गडकोटांचाच उपयोग केला. कुठलं लाकूड जाळल्यावर काळा धूर येतो, कुठला लाकूड जाळल्यावर पांढरा धूर य...

कभी साथ बैठो

*कभी साथ बैठो..* *तो कहूँ कि दर्द क्या है...* *अब यूँ दूर से पूछोगे..* *तो ख़ैरियत ही कहेंगे...* 2.  *सुख मेरा काँच सा था..* *न जाने कितनों को चुभा गया..!* 3. *आईना आज फिर,* *रिशवत लेता पकड़ा गया..* *दिल में दर्द था और चेहरा,* *हंसता हुआ पकड़ा गया...*   4. *वक्त, ऐतबार और इज्जत,* *ऐसे परिंदे हैं..* *जो एक बार उड़ जायें* *तो वापस नहीं आते...* 5. *दुनिया तो एक ही है,* *फिर भी सबकी अलग है...* 6. *दरख्तों से रिश्तों का,* *हुनर सीख लो मेरे दोस्त..* *जब जड़ों में ज़ख्म लगते हैं,* *तो टहनियाँ भी सूख जाती हैं...* 7. *कुछ रिश्ते हैं,* *...इसलिये चुप हैं ।*  *कुछ चुप हैं,* *...इसलिये रिश्ते हैं ।।* 8. *मोहब्बत और मौत की,* *पसंद तो देखिए..* *एक को दिल चाहिए,* *और दूसरे को धड़कन...* 9. *जब जब तुम्हारा हौसला,* *आसमान में जायेगा..*  *सावधान, तब तब कोई,*  *पंख काटने जरूर आयेगा...* 10. *हज़ार जवाबों से,* *अच्छी है ख़ामोशी साहेब..* *ना जाने कितने सवालों की,* *आबरू तो रखती है...*

पति-पत्नी

          *पति-पत्नी* एक बनाया गया *रिश्ता*... पहले कभी एक दूसरे को *देखा* भी नहीं था... अब सारी *जिंदगी* एक दूसरे के साथ |                        पहले *अपरिचित*,  फिर धीरे धीरे होता *परिचय* | धीरे-धीरे होने वाला *स्पर्श*, फिर *नोकझोंक*.... *झगड़े*... बोलचाल *बंद* | कभी *जिद*,  कभी *अहम का भाव*.......... फिर धीरे धीरे बनती जाती *प्रेम पुष्पों* की *माला* फिर *एकजीवता*, *तृप्तता* | वैवाहिक जीवन को *परिपक्व* होने में *समय* लगता है | धीरे धीरे जीवन में *स्वाद और मिठास* आती है... ठीक वैसे ही जैसे *अचार* जैसे जैसे *पुराना* होता जाता है, उसका *स्वाद* बढ़ता जाता है....... *पति पत्नी* एक दूसरे को अच्छी प्रकार *जानने समझने* लगते हैं, *वृक्ष* बढ़ता जाता है, *बेलें फूटती* जातीं हैं, *फूल आते हैं, फल* आते हैं, रिश्ता और *मजबूत* होता जाता है, धीरे-धीरे बिना एक दूसरे के *अच्छा* ही नहीं लगता | *उम्र* बढ़ती  जाती है, दोनों एक दूसरे पर अधिक *आश्रित* होते जाते हैं, एक दूसरे के बगैर *खालीपन* महसूस होने लगता है |...

औषधी मार्केटिंग चा भयानक विळखा

औषधी मार्केटिंग चा भयानक विळखा पडून भारतीय जनतेचे क्रूरपणे शोषण चालू आहे... यावर प्रकाश टाकणारा अत्यंत अभ्यासपूर्ण लेख, आमचे स्नेही संपादक प्रकाश पोहोरे यांनी लिहिला आहे...वाचा... मनन करा... (लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती)       एका अर्थाने हे बरेच झाले देशाची इडा-पीडा आता गेली आहे असे काही काळ तरी म्हणता येईल. याच व्यक्तीच्या प्रभावामुळे योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध यांसारख्या आयुष मंत्रालयानी मान्यता दिलेल्या एकाही चिकित्सा पद्धतीचा अंशमात्रही स्वीकार देशाच्या प्रशासन व्यवस्थेनी केलेला नाही. अॅलोपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये कोरोनावर एकही खात्रीलायक तपासणी व उपचार किंवा औषध नसताना *प्लाझ्मा थेरपी, हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, रेम्डेसिवीर, लोपींनावीर-रोटिनविर, एण्टेरोफुरोन B1 असल्या अत्यंत विषारी औषधांचा देशातील नागरिकांवर प्रयोग कुणाच्या इशाऱ्यावर करण्यात आला हे देशातील नागरिकांना कळायलाच हवे.* या भयंकर औषधांपेक्षा *हार्वर्ड मेडिकल स्कूलनी आपल्या प्रदीर्घ संशोधनानंतर व युरोपच्या लंडन येथील कॉमन कोल्ड लॅबच्या वैज्ञानिकांनी जवळजवळ १९४९...

'नंतर' ने 'अंतर' वाढते

*'नंतर' ने 'अंतर' वाढते .....* *एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका* व तसे इतरांना दाखवू पण नका. *उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल.*  आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे.  *कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.*  निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत, जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.       आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे,  खूप छान, खूप सुंदर..... आत्ताच दिवस सुरु झाला ...  आणि...

पुणेरी पाट्या

*पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा या भिडूने सुरू केली.* पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त अपमान करून घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ पुणे. आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील पण पहिली फेमस पाटी कोणी लावली त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो. प्रभाकर बाळकृष्ण जोग म्हणजे प्र.बा.जोग विद्वान माणूस विक्षिप्त असतो अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे. प्र बा जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते. ते मूळचे वकील. शिवाय क्रिकेट सामन्याचे अंपायर, पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा. पण त्यांचा सगळ्यात आवडता छंद भांडणे हा होता. पेशाने ते वकील , त्यात सदाशिव पेठ त्यात भांडण्याची खुमखुमी असलेले . म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून तात्विक असायची. गंमत म्हणजे यातूनच त्यांनी मी...

जगण्याची कला शिकवणारा 'गुरु'

🎯 *गुरु !!! ( 'माझ्या नेटक्या गोष्टी'तून' )* तो धिटाईने वृद्ध गुरुसमोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.  कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.  " तुला माझ्या कडून काय हवे आहे ???" गुरूने त्या मुलाला विचारले. "सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे !!!" शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे ??? अजब मुलगा दिसतोय.  "कशाला ???" "शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात. मोठी माणसं  नको तितकी किंव करतात. मला त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो !! मला माझ्या हिमतीवर जगायचंय !! कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे !!" "ठीक  आहे !! पण मी आता तो 'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्या कडे कोणी पाठवलं ???" "सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांचा  'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले....