अध्यात्मशास्त्रात ज्ञानाचा अर्थ आहे
👆
*●●●"अध्यात्मशास्त्रात ज्ञानाचा अर्थ आहे – आत्म-ज्ञान." ●"आत्मज्ञानच ज्ञान आहे. बाकी सर्व विज्ञान आहे, माहिती किंवा सूचना आहे." ●असे विज्ञान मनुष्याला बाहेरुन प्राप्त होते. ●"स्थूल असणाऱ्या प्रकृतीलाच अज्ञानी ओळखतात कारण स्थूल हे इंद्रियग्राह्य आहे." परंतु ●"ज्ञानी सूक्ष्मरुपी चैतन्यालाही ओळखतात जे इंद्रियातीत आहे(अष्टावक्र गीता, आजचा भाग)."*
*●आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात थोर उपदेश करत आहे की :*
*अर्जुना ●"जी जाणीव ते ज्ञान"*
*●"जे जाणले जाते(इंद्रियांद्वारा) ते विज्ञान*
*तर्क बुध्दी विचार हे अज्ञान*
*समजो तुला*
*आज आपण आपणच आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या एका मानसिक, काल्पनिक जगात जगात जगत आहोत. आपले हे काल्पनिक जगत, दृश्य, स्थूल(विज्ञान) जगताचाही भाग नाही. हे स्थूल जगत आणि तुमचं मानसिक, काल्पनिक जगत ओलांडल्यावरच, जेथे देव आहे, त्या वास्तव जगतात, सूक्ष्म जगतात आपला प्रवेश होऊ शकणार आहे, अन्यथा नाही. ●स्थूलात(दृश्य जगात) देव नाही, आपल्या मानसिक, काल्पनिक जगात तर नाहीच नाही, हे समजल्यानंतरच मनुष्य जेथे देव आहे, त्या सूक्ष्म जगताकडे, वास्तव जगताकडे वळेल(शिक्षाएं और फिलाॅसफी किसी रूपांतरीत(मनुष्याला परमेश्वरामध्ये) नहीं कर सकती- वे बस प्रेरित कर सकती(धडा देतात) हैं।👆)."*
*ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात पुढे म्हणते :*
*विज्ञान ते जाणले असता*
*बुध्दी जाईल ती अस्ता*
*मग जाणणे ती आत्मसत्ता*
*तेंव्हाच होई*
*बुध्दी ती संपता*
*नि विचार ते विरता*
*तर्काची होता सांगता*
*प्रगटे ज्ञान*
*●●●"जेथे विज्ञान संपते, तेथून ज्ञान सुरू होते !..... ही गोष्ट ●'सत्यच' आहे. ●'खरा देव' फक्त देवळातच नाही, तर सर्वत्र सगळीकडे आहे. ●"CORONA" ला घाबरून, देवळे( शिर्डी, बालाजी, मक्का,मदीना, व्हेटीकन सिटी) मानवांनी सोडले, देवाने नाही. खरा देव तिथे आजही आहे, आणि सर्वत्र सगळीकडे आहे. म्हणून तर तो थोर भक्त प्रल्हादाचे रक्षण करावया दगडी खांबातून प्रकट झाला, प्रल्हादाला अग्नीत टाकल्यावरही अदृश्य, सूक्ष्म नारायणाने त्याचे रक्षण केले. अज्ञानात, विषयातच आपण रममाण असल्यामुळे खरा देव आपण प्राप्त करू शकलो नाही....."●●●*
*आणि शेवटी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्याच सातव्या अध्यायात ज्ञानाचं न भूतो न भविष्यती असे अद्भूत वर्णन करत आहेत. पाहा :*
*●ऐसी इंद्रियातीत स्थिती*
*●जेथे शब्द संपूनी जाती*
*ऐकावी त्या ●आत्मतत्वाची महती*
*म्हणे ज्ञानदेव*
*जेथे आदि प्रकृती(विज्ञान) विसावते*
*जेथे शब्दाचे काही न चालते*
*●"तेथूनी" ज्ञान परम ते*
*प्रकटेल आता*
*सर्व ●"अज्ञान ते हारपता"*
*●"विज्ञानाची होते सांगता"*
*मग उरे ●"वैश्विक जाणीव जी ब्रम्हमयता*
*●तेची ज्ञान*
*आता पुन्हा शेवटी, ●"ज्ञान, चैतन्य काय आहे व मुक्ती कशी मिळते", हे अष्टावक्र महामुनींचा वर पाठवलेला आजचाच भाग पाहा :*
*●"ही जड सृष्टी त्या चैतन्य-तत्वाचीच अभिव्यक्ति आहे. चैतन्याचाच सारा खेळ आहे, त्याचीच लीला आहे. चैतन्याचे नृत्य आहे. समस्त सृष्टीचे आधारभूत तत्व चैतन्य आहे व सर्व चराचरात चैतन्यच व्याप्त आहे." ●"एकेका पदार्थात, व्यक्तित समाविष्ट चैतन्याला आत्मा आणि संपूर्ण सृष्टी मिळून व्याप असणाऱ्या चैतन्याला ●“ब्रम्ह” म्हटले आहे." ●दोन्ही एकच मूल-तत्व आहेत. आत्म्याचे ज्ञान हेच परमात्म्याचे ज्ञान आहे. ●"आत्म्याहून परमात्मा (ब्रम्ह) भिन्न नाही. या आत्म-तत्वाचे ज्ञान झाले म्हणजे सर्व बाबींचे ज्ञान प्राप्त होते." उपनिषदे सांगतात “यस्मिन विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति ।“ (●"ज्याला जाणल्याने सर्व काही जाणले जाते. सर्व सृष्टीचे रहस्य माहित होते. मग माहित करुन घेण्यासारखे काही बाकी रहात नाही.") ●"शरीर, मन, बुध्दि, अहंकार म्हणजे मनुष्य नाही, तर मनुष्य म्हणजे आत्मा आहे." ●"आत्मा हेच त्याचे वास्तविक रुप आहे." ●:तो नित्य, शाश्वत व सनातन आहे." ●"प्रकृति अनित्य आहे. ●"या आत्म्याचे ज्ञान हेच ‘स्व’ चे ज्ञान आहे."*
*●"या ज्ञानप्राप्तीमुळे मुक्ति होते." ●"सृष्टीच्या मूल आधाराचे ज्ञान झाल्यावर संपूर्ण विश्व-प्रपंचाचे ज्ञान होते, भ्रांती नष्ट होते." ●:या ज्ञानाने मनुष्य शांत होतो." ●"साऱ्या सृष्टीव्यापाराचा जे केवळ ‘साक्षी’ किंवा ‘द्रष्टा’ होतो." ●"यामुळे संसार बंधनातून मुक्त होऊन तो स्वतंत्र होतो." ●"ज्ञानाशिवाय मुक्ति होऊ शकत नाही." ●"जीवनाचा परम उत्कर्ष मुक्ति आहे." ●"तीच जीवाची अंतिम स्थिती आहे."*
*तैसे तळमळ असता मनी*
*अवधानाची(श्रेष्ठ श्रवण) गुढी उभारुनी*
*(गुढी पाडवा, येत्या 25 मार्च)*
*ज्ञानाच्या त्या अंगणी*
*जाणे होते●●●*
-- *सादरीकरण*, भिमाशंकर भालके
Comments
Post a Comment