Posts

Showing posts from January, 2020

ऑक्सिजन

ऑक्सिजन.      *काल एका बस स्टॉप वर बसची वाट पहात होतो. शेजारी एक आजोबा बसलेले होते. हातात एल्युम्युनियमची काठी, कानाला हेडफोन, खांद्यावर शबनम, तोंडात चॉकलेट असावे.* *आजोबा कुठे जायचे ?* *ते म्हणाले पास आहे ,जी बस येईल, त्या बस मध्ये बसायचे आणि फिरायचे.* *एकट्याने  फिरताना भिती नाही वाटत?* *त्या वेळेस ते म्हणाले मागील वर्षी बायको आजारी पडली, शेवटच्या क्षणी मी मुलगा डॉक्टर हजर होतो. बायकोने भितीने माझा हात धरून ठेवला होता तरी मी  वाचऊ  नाही  शकलो. आम्ही  वय झाले म्हणुन बाहेर फिरायचो नाही. ती गेल्यावर माञ मी  हिंमत केली फिरायला सुरवात केली. मन खंबीर केले, आवडेल तिथे जातो, लोकांशी बोलतो, जे बघितले ते मुलाला घरी जाऊन सांगतो. सोबत आधार कार्ड, डॉक्टरांचा मोबाईल नंबर, मुलाचा मोबाईल नंबर, मेडिक्लेम पॉलिसी, औषधे आणि मोजके पैसे ठेवतो आणि फिरतो. जे आवडले ते खातो. एखाद्या  ठिकाणी मुक्काम करावासा वाटला तेथे थांबतो, मुक्कामाचे मुलाला फोन करुन सांगतो. खुप एकटे वाटले की वृध्दाश्रमात जातो, छानपैकी खाण्याचे पार्सल घेतो त्यांच्या सोबत खातो. त्यांच्याशी संवा...

*संघर्ष*

संतती लायक असेल तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही, कारण ते स्वतः कमविल्या शिवाय रहाणार नाहीत.  आणि संतती नालायक असेल, तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही. कारण आपल्या समोरच त्या संपत्तीला  काडी लागल्याशिवाय रहाणार नाहीत.  विठ्ठलपंत आणि रूक्मिणी मातेने देहांत शिक्षा घेतली, त्यावेळी निवृत्ती , ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई यांचे वय काय होते ? त्या वयात निर्माण झालेली जबाबदारी विश्वाचे कल्याण करणारी ठरली.  छत्रपती शिवरायांच्या हातात त्यांच्या चौदाव्या वर्षी पुणे जहांगीर सोपवली गेली .  शहाजी राजांनी वयाच्या पाचव्या वर्षी इंदापूर जहांगीर सांभाळली.  जबाबदारी जेवढ्या लहान वयात अंगावर पडते, तेवढे कर्तृत्व महान होते. म्हणून आपल्या मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा.*                             *संघर्ष* आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, साधे घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तुसुद्धा काढायला घाबरतात. उंच जागी चढतांना आईच्याकडून धीर मिळत नाही. तर "पडशील", "घसरश...

पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते

Image
गुण सांगता... दोषांचे काय? ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केलाक जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.  सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अ‍‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावाकाय?  आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत? हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह ...

पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते

गुण सांगता... दोषांचे काय? ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केलाक जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.  सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अ‍‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावाकाय?  आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत? हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारता...

अति सुखाचा ओला दुष्काळ

अति सुखाचा ओला दुष्काळ ( लेखक प्रवीण दवणे ) .................................. #### *सुख पर्वताएवढं* सुख ! सुख ! सुख ! सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस ! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा ! कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच— सुखाचं नवं रुप— नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं. मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ' अगदी काहीही सोसावं ' लागू नये म्हणून बिचारी धावाधाव ! एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं...अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे. आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी— मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो.त्या—:त्या सणाची , रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी—मेड ! वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही, कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय— यातून अंत:करणाचे त...

मकर संक्रांत

संक्रांतीची माहिती- वाहन - सिंह उपवाहन - हत्ती वस्त्र - पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे , म्हणून पांढरे वस्त्र घालायचे नाही. शस्त्र - भृशुंडी वयाने बाल आहे. वासा करिता चाफ्याचे फुल घेतले आहे. अन्न भक्षण करित आहे. प्रवाळ रत्न धारण केले आहे. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे, ईशान्य दिशेस पहात आहे, म्हणून पूर्व पश्चिम वाणववसा करणे. मुहूर्त - सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यंत आहे. पूजेचा विधी मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणला जातात. या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म...

अति सुखाचा ओला दुष्काळ

अति सुखाचा ओला दुष्काळ ( लेखक प्रवीण दवणे ) .................................. #### *सुख पर्वताएवढं* सुख ! सुख ! सुख ! सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस ! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा ! कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच— सुखाचं नवं रुप— नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं. मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ' अगदी काहीही सोसावं ' लागू नये म्हणून बिचारी धावाधाव ! एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं...अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे. आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी— मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो.त्या—:त्या सणाची , रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी—मेड ! वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही, कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय— यातून अंत:करणाचे त...

mathematics information

आपली मापन माहिती. 🎾 1 इंच  = 2.54 सेमी  🎾  1 फूट = 12 इंच ,30 सेमी   🎾 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी 🎾 1 कि. मी. = 1000 मीटर  🎾 1 मैल  =  1.6 किलोमीटर  🏓1 गुंठा = 100 चौ. मी   🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी. 🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर  🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.  🍇1 डझन = 12 वस्तू / नग  🍇12 डझन = 1 ग्रोस.  🍇 1  दस्ता = 24 कागद.  🍇20 दस्ता  = 1रीम, 480 कागद  🍇1तोळा =  10 ग्रॅम.  ⏱1तास = 60 मिनिटे  ⏱1मिनिट = 60 सेकंद  ⏱1 तास  = 3600 सेकंद  ⏱1दिवस =24तास, 86400सेकंद  ⏱1 दिवस =24 तास =1440 मि. 🔹Trick            💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा   (१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -       १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५ (२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -      ११+१२+१३+१४+१५+१६+१७+      १८+१९+२० = १५५ (३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -       २१+...

खरी शिकवण रिझल्ट

आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे. क्लासमध्ये बघायला या.नाहीतर मी बोलणार नाही" ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो. माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त. मी बावरतच वर्गात नजर फिरवली.मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी ,मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली, माय फादर. ". मीही गुडमॉर्निंग म्हणालो. टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, हिच्या नावापुढे सही करा. " मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, खरेच एवढे बिझी आहोत का आपण ?. विचारतच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, बसुन बघा सगळे पेपर ". असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या. मी तिच्या बेंचवर कसातरी बसलो. बाजुला माझं बाळ. अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५ , ३६. कुठे ३२. टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन , माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय , १० मध्येही नसेल याची खात्री झाली. मीही मग चुक...

मॅटीनी

*मॅटीनी*                         परवा एका फॅमिली गेट टूगेदरला गेलो होतो. एकाने जोक सांगितला. एक मित्र सरदारजी ला  विचारतो "काल भेटला नाही?" सरदारजी "सिनेमा ला गेलो होतो" मित्र "कसा होता? ट्रॅजेडी की कॉमेडी?" सरदारजी "अरे  तो मॅटीनी होता". जोक ऐकून सर्व जण हास्यरसात बुडून गेले. पण मी मात्र मॅटिनी शब्द ऐकला आणि चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या काळात - साधारण १९७०-७१ च्या सुमारास - पोहचलो.                                     मल्टिप्लेक्स हे नावही कोणी ऐकले नव्हते. पण नवीन चित्रपट एका पेक्षा जास्त थिएटर्स मधे लागत होते. पुण्यात कोणताही नवीन चित्रपट लागायचा तेव्हा एक मुख्य थिएटर असायचे आणि तेव्हा नुकत्याच विकसित झालेल्या उपनगरांमधील थिएटरमध्येही तो लागायचा. मुख्य थिएटरमध्ये दुपारी तीन, संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ असे तीन शो दाखवले जायचे. दुपारी बारा वाजताच्या शो ची वेळ - मॅटीनी शो साठी - मुद्दाम जुन्या सिनेमासाठी राखून ठेवल...

झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?*                     -जेफ्री ह्आंल               (नोबेल विजेते-2017) *झोप* (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का? असे ऐकीवात आहे की *लवकर नीजे  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे* हे किती खरे आहे? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का? चला पाहूया.... खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.     *रात्री 10 ते पहाटे 3 या* कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेली असते. तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून  विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात  साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्...