negative thoughts
कलुषीत विचारांची दिशा...
करते आरोग्याची दशा ....
लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात म्हणजे वयाच्या 5 ते 15 वर्षांपर्यंत त्यांच्यावर बलात्कार झाले, भरपूर शारीरिक अत्याचारही झाले. त्यामुळे त्यांचा जीवनाकडे व अवतीभवती बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तो इतका नकारात्मक होता की हे संपुर्ण जग वाईटच आहे. सर्व पुरुष हे घाणेरडे आसतात व मी जगायला लायक नाही. पुढे ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ झाल्या व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके त्यांनी वाचली. पुढे वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात यें की, ज्यांनी आपल्याशी वाईट कृत्य केले ते ते करून निघूनही गेले; याचा त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. पण त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय ?तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? आपल्या दृष्टीने तर नक्कीच नाही. तरीही ‘लुईस हे’ यांनी त्यांना मनापासुन माफ़ करायचे ठरवले. आणि आपल्या मनाची, विचारांची स्वच्छता करायचे ठरवले. आणि त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना लुईस हे यांनी मनापासून माफ केले. ही प्रोसेस तशी प्रदिर्घ काळ चालणारी होती. परंतु ठाम निर्धाराने व महत्प्रयासाने ते ही प्रोसेस करीत राहील्या. तेथपर्यंत की जोपर्यंत त्या सर्वांविषयी त्यांची घृणा, तिरस्कार मिटत नाही. हळुहळु त्यांना यात यश मिळाले. आणि इकडे दुसरे महद आश्चर्य असे घडले की, त्यांचेवर कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) अथवा इलाज न करता त्या कर्करोगापासुन पूर्णपणे मुक्त झाल्या. पुढे वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत त्या जगभर लेक्चर देत फिरत होत्या.
त्यांनी आपल्या स्वानुभवावर आधारीत पुढे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे - *’यू कॅन हील युवर लाईफ’.* .....
त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल हे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
दुसरे उदाहरण ‘ब्रँडन बेज’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता. बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलाजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा. एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची व विचारांची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफीत तो ट्युमरच नाहीसा झाला व त्या नॉर्मल झाल्या. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी 'The Journey' या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो - So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो? जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? आपलंच शरीर!
जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार/मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात. पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.
त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची 15 मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात. दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटतेसुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.
प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की मला खात्री आहे की रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दास घासायला, अंघोळ करायला/हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.
सर्वांना दीपवलीच्या हार्दिक शुभेच्छा
ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी जावो . ...
_ डॉ. शिरीष राजे ...🌱
मानसशास्रतज्ञ, नाशिक.
9823185285
Comments
Post a Comment