आयुष्य कसं चवीनं जगायचं !!!
शुभ्र दही पाहिलं ...
की तोंडाला पाणी सुटतं,
खायचा मोह होतो.
पण चमचा बुडवला,
की दही मोडणार,
थोड्या वेळाने चोथापाणी होणार,
हे ठरलेलं !
पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?
At the end of the day,
ते आंबट होऊन जाईल.
अजून काही दिवस तसंच ठेवलं,
तर खराब होऊन जाईल.
मग उपयोग काय त्या
perfectly set झालेल्या दह्याचा ?
मनात विचार आला,
आयुष्याचंही असंच असतं ... नाही का ?
दह्यासारखं 'set' झालेलं आयुष्य
नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं
तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल.
.... वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज,
आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच !
आयुष्य जगायला तर हवंच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या
form मध्ये अनुभवायचं !
कधी साखर घालून,
तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत,
तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत !
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला ना, ह्या ताकाचा ...
हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.
अर्थात, कुठचाही अतिरेक झाला
तर आयुष्य पांचटच होतं !
हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत
वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा !
पूर्ण दही संपवायच्या आधी,
रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं !
'उद्याचं' दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी,
दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायचं.
मला ठाऊक आहे ... रोज ही भट्टी जमेलच असं नाही.
पण नासलंच समजा कधी,
कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.
मग त्याकरता दुसर्याकडून विरजण मागायची वेळ आली ... तरी त्यात कमीपणा नसतो.
पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !
आयुष्य कसं ' चवीनं ' जगायचं !!!
Comments
Post a Comment