नमस्कार आपली संस्कृती

●● *नमस्काराचे महत्व* ●●

● *महाभारताचे युद्ध सुरु होते.* 
   *दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे*
   *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*
   *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून* 
   *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी* 
   *होत होती..*

● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर* 
   *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन* 
   *भीष्म पितामह घोषणा करतात की..*

● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."*

● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या* 
   *शिबिरात पोहोचताच पांडवांची* 
   *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या* 
   *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*

● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल* 
   *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या* 
   *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..* 

● *"माझ्या सोबत चल.."*

● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण* 
   *पितामहांच्या कक्षात पोहोचले.* 
   *ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर* 
   *उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,* 
   *आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*
 
● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत* 
   *जाऊन पितामहांना प्रणाम करताच,* 
   *"अखंड सौभाग्यवती भव" असा* 
   *आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*

● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,* 
   *"वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी* 
   *काय आलीस..??"* 

● *"माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*
   *आले आहे आणि ते बाहेर थांबले* 
   *आहेत" असे द्रौपदीने सांगताच* 
   *श्रीकृष्णाला भेटायला पितामह* 
   *बाहेर आले आणि त्या दोघांनी* 
   *एकमेकांना प्रणाम केला..*

● *भीष्म पितामह म्हणाले..*
   *"माझ्या एका वचनाला दुसऱ्या* 
   *वचनाने मात देण्याचे काम फक्त*
   *श्रीकृष्णच करु शकतात.."*
 
● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण* 
   *द्रौपदीला म्हणाले की, "बघ,* 
   *तुझ्या फक्त एक वेळ जाऊन* 
   *पितामहांना नमस्कार करण्यामुळे*
   *तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,* 
   *हे तुझ्या लक्षात आले का..??*

● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह* 
   *भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या* 
   *मान्यवरांना नमस्कार केला असतास* 
   *आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या* 
   *पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू* 
   *पांडवांना नमस्कार केला असता तर* 
   *हि युद्धाची वेळच आली नसती..*

● *अशी असते नमस्कार* 
   *आणि आशीर्वादाची शक्ती..!!*

●● *तात्पर्य..*

● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या* 
   *समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच* 
   *आहे की, कळत नकळत आपल्या* 
   *हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा* 
   *केली जाते..*

● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या* 
   *मंडळीना दररोज नमस्कार करुन* 
   *त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार* 
   *असतील, तर त्या घराघरात वितंडवाद* 
   *सहज टाळता येऊ शकतात..*
   *असे घर स्वर्ग बनू शकते..*

● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*
   *कवच आहे की, ज्याला कुठलेही* 
   *शस्त्र भेदू शकत नाही..* 
 
● *कारण..*

● *नमस्कारात प्रेम आहे..*
   *नमस्कारात विनय आहे..*
   *नमस्कारात अनुशासन आहे..*
   *नमस्कार आदर शिकवतो..*
   *नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..* 
   *नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..* 
   *नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..* 
   *नमस्कारात शीतलता आहे..*              
   *नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*
   *नमस्कार आपली संस्कृती आहे..*
   *ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*

          ●● *सर्वांना सादर नमस्कार* ●●

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार