नैराश्याची मूळ
सध्याच्या सामाजिक व्यवस्थेमध्येच आजच्या नैराश्याची मूळ दिसतात.गेल्या 20 वर्षांत मुक्त अर्थव्यवस्थेत पैसा, हुद्दा, प्रतिष्ठा, घर,गाडी,परदेश प्रवास याच महत्व प्रचंड वाढलं. सगळ्यांना या व्यवस्थेनं कोडग,चंगळवादी बनवलं. माणूस महागड्या गाड्या,घर,परदेश प्रवास आणि इतर गोष्टींच्या मागे लागलं. माणूस (स्वभावाने) कसा आह यापेक्षा त्याकडे काय (मालमत्ता) आहे यावरूनच माणसाचं मूल्यमापन आणि त्याची किंमत ठरायला लागली. प्रत्येकजण सीईओ बनायची स्वप्न बघायला लागला. यामुळेच सगळे लोक महत्वाकांक्षी बनले आणि चांगलं समाजकार्य करणं, लोकांना सुशिक्षित करण,सामान्यांपर्यंत ज्ञान पसरवण यांच्याबाबतीत माणसं महत्वाकांक्षी बनली नाहीत तर पैसे आणि प्रसिद्धी च्या बाबतीत महत्वाकांक्षी बनले .पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येत त्या शिखरापर्यंत पोहचन थोड्याच लोकांना शक्य होत असल्यामुळे बहुतांशी लोकांच्या आयुष्याकडून (उगीच वाढलेल्या) अपेक्षा आणि वास्तव यांच्यात खूपच अंतर पडायला लागल. यातून सतत इतरांशी सुरू असलेल्या तुलनेने आगीत तेल ओतण्याचे काम केलं. यातून मग चिडचिड,असंतुष्टता, ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस काम करणं , व्यसनाधीनता ,कुटुंबाबरोबर कमी वेळ घालवणं ,भांडभांडी ,कलह, घटस्फोट आणि शेवटी नैराश्येसारखे गंभीर विकार हा प्रवास सुरु झाला. पण *सुख हे ट्रेडमिल सारख असत. तिथे स्थिर राहण्यासाठीही पळाव लागत.* आपण जरी एखादा हुद्दा,पैसा मिळवण्यात यशस्वी झालो तरी आपण सुखी होत नाही.कारण आपण लगेच इतरांबरोबर आपली तुलना करायला लागतो. मग आपण आपलं ध्येय उंचावतो. त्यातून ही व्यवस्था आपल्याला 'थिंक बिग' च्या नावाखाली तस करायला आणि महत्वाकांक्षी बनायला शिकवते. यामुळेच माणसं पैशांच्या आणि हुद्द्याच्या मागे सुसाट धावत सुटतील , कंपनी साठी दिवसरात्र काम करायला लागतील आणि त्यामुळे यात काही मूठभर श्रीमंत उद्योगपतींचाच फायदा होईतो आणि यातले काही तुकडे त्या कर्मचाऱ्यांकडे किंवा मॅनेजर्स पुढे फेकले की त्यांनाही आपण श्रीमंत झालो अहोत असे वाटेल आणि कंपनीच्या व्यवस्थापनाचा आणि वरिष्ठ, श्रीमंत उद्योगपतींच्या गोटातल्यांचा आपण एक भाग आहोत असं त्यांना वाटायला लागेल. ते त्यांच्याच वागणुकीचे आणि मुल्यांच अनुकरण करायला लागतील अशी त्यांची युक्ती असते. मग सगळी मंडळी छु केल्यासारखं धावत सुटतात. पण त्यातही जिंकणारे मूठभर आणि मागे राहणारे बरेच अस वास्तव असतं. त्यामुळे बहुतांश लोकांच्या बाबतीत त्यांचं ध्येय आणि वास्तव यात दरी पडते. यामुळेच मग सगळे पुन्हा अहोरात्र काम करून आणखीन पैसा, हुद्दा,प्रसिद्धी मिळविण्याच्या मागे लागतात. पण त्याही गोष्टी मिळाल्या तरी आपण सुखी समाधानी असतच नाहीत. थोडक्यात सगळ्यांनी असंतुष्टच असणं या व्यवस्थेला हवं असत. पण यामुळेच अनेक लोकांमध्ये प्रचंड ताण, तणाव ,चिंता आणि नैराश्य निर्माण होत. युनोच्या एक अहवालाप्रमाणे 2025 पर्यंत नैराश्याच आणि एकूणच मनोविकाराच प्रमाण 26% पर्यंत वाढेल. यातला बराच भाग हा चंगळवादी संस्कृती ची आपल्याला देणगी असेल यात शंकाच नाही!
*थोडक्यात , आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल वास्तव यातल्या फरकावर आपलं सुख अवलंबून असत. त्यामुळे सुख हे सापेक्षच असत.*
अच्युत गोडबोले यांच्या
- *मनात*
मानसशास्राची उत्कंठावर्धक रम्य सफर या मधून साभार.
Comments
Post a Comment