पुस्तकातून ज्ञान
*वाचन का आवश्यक आहे ?* 📖....
*एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्या च्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !*
.................................
*श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरा साठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.*
................................
*जगाचा आता पर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईल मुळे.*
.................................
*पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.*
.................................
*वाचना मुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.*
................................
*टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचना साठी फक्त माणूस जागेवर लागतो.*
................................
*वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीने ही श्रीमंत होतात.*
................................
*वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.*
................................
📖 *टी.व्ही मोबाईल मुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचना मुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.*
.................................
📔 *वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे.. अशी एक म्हण प्रचलित आहे.*
.................................
*वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.*
.................................
*वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.*
.................................
*काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.*
.................................
*वाचना मुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर होतो.*
..............................
*जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.*
................................
📒 *आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकाला च आपला मित्र बनवा.*
.................................
*टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईल मुळे थकवा येतो तर वाचना मुळे तरतरी.*
.................................
📚 *जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.*
................................
*तुमच्या ध्येया वरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.*
.................................
*ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येया विना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.*
.................................
📖 *जगात जेवढे लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.*
Comments
Post a Comment