गरज अलिप्त होण्याची

*गरज अलिप्त होण्याची*
*(Need to Disconnect)*

गेल्या काही महिन्यांत अशा काही गोष्टी वाचायला, पहायला मिळाल्या की खरोखरच त्याच्या वर अतिशय गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.
प्रयागराज येथे कुंभमेळ्यात 10000 तरुणांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली...हे सगळे तरूण उच्च शिक्षित इंजिनिअर, एम बी ए वगैरे असून त्यातील कित्येकजण गल्लेलठ्ठ पगारावर काम करत होते. ते म्हणाले आम्हाला ऐहिक गोष्टीशी Disconnect व्हायचे आहे... मोक्षाचा शोध वगैरे वगैरे...
            गुजरात राज्यातील काही तरुण तरूणींनी करोडो रुपयांची ईस्टेट, संपत्तीचा त्याग करून साधू साध्वी होण्याचा मार्ग पत्करला...त्यांनाही ऐहिक गोष्टीशी Disconnect व्हावे वाटले...
तिसरे ... राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सौ सुप्रिया सुळे यांनी संसदेत " Right to Disconnect " हे खाजगी विधेयक दाखल केले.
वरील तिन्ही गोष्टींचा विचार केला तर असे लक्षात येईल की शांतीपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काही गोष्टीशी Disconnect होणे आवश्यक आहे...माणसं वेगवेगळ्या कारणांमुळे त्यात गुरफटून रहातात...काही उदाहरणे पाहिली की लक्षात येते .....
संत एकनाथ महाराज यांची एक गोष्ट  सांगितली जाते - - - -
एक सावकार ...अतिशय कंजूष ...' चमडी जाय पर दमडी ना जाय ' ही विचारसरणी... एक पैसाही कर्जदाराला सोडणार नाहीत...आयुष्यात कधी देवाचे नाव घेतले नाही...पैसाच त्यांचा देव.. त्यांची परलोक जाण्याची वेळ आली ... शेवटच्या घटका मोजत होते... मृत्यू दारात उभा होता... शेटजी निश्चल पडले होते... सावकाराच्या मुलांनी नाथ महाराजांना विनंती केली की वडिलांच्या कानात चार उपदेशाचे बोल बोला म्हणजे मुक्ती सुखकर होईल.
नाथ महाराज शेठजीच्या कानाजवळ जाऊन मोठ्या आवाजात म्हणाले - " शेटजी , देव देव म्हणा "
सावकार म्हणाले - " वो देव की मत देव लेकीन अपना तगादा रहने देव "
  माणसाची लालूच (Greed ) शेवटच्या घटके पर्यंत सुटत नाही
◆ ◆ ◆ ◆ ◆
मित्राचे नातेवाईक ... अचानक आयुष्यातून एक्झिट घेतली ... वय साठीच्या पुढे दोनेक वर्षे ... आपल्या देशात सरासरी आयुष्य वाढलेले आहे...आणि विशेष म्हणजे डॉक्टर जवळपास असताना ह्याना जोराचा अटॅक आला आणि काही मिनिटांत खेळ खल्लास.
मित्र सांगत होता ... हे गृहस्थाला उभ्या आयुष्यात  दवाखान्याची पायरी चढायची गरज पडली नाही... पण क्षुल्लक कारणावरून दवाखान्यात अ‍ॅडमिट व्हावे लागले - सकाळी डिस्चार्ज मिळणार तोच आयुष्यातून डिस्चार्ज घेतला...
आदल्य रात्री स्वतःच्या मुलाला बोलले , एजन्सीच्या कलेक्शनचा हिशोब विचारला ....
किती हा अट्टाहास ...दवाखान्यात बेडवर असतानाही व्यवहार आणि हिशोब ? ... माणसं किती गुरफटली आहेत संसारात ? ... वाणप्रस्थ अपेक्षित असताना ही मोह सुटत नाही ... आपली पुढची पिढी सक्षम नाही हे गृहीत धरून माणसं वागत असतात.
◆ ◆ ◆ ◆ ◆
सिनेमा हे करमणुकीचे तसेच समाज प्रबोधनाचे माध्यम आहे हे जरी खरं असलं तरी सिनेमा हे समाजाचे reflection आहे हे देखील तेवढेच खरे आहे.
परवा माधुरी दीक्षित अभिनित पहिला मराठी सिनेमा आला होता - " बकेट लिस्ट ".
माधुरी दीक्षित त्यात गृहिणी असते ... घरात मुलं , नवरा, सासू सासरे,आजी सासू आहेत ...ती सगळ्यांना सांभाळत सगळ्यांची काळजी घेत असते .... दुर्दैवाने तिचे र्‍हदय कमजोर असते आणि ते बदलण्याची ( transplant) गरज असते.
सुदैवाने दाता ( Doner ) भेटतो... ऑपरेशन ठरते... माधुरीला ऑपरेशन टेबलवर घेतले जाते...
एवढ्यात - -
ती म्हणते - " माझ्या नवर्‍याला बोलवा , मला त्याच्याशी महत्वाचे बोलायचे आहे "
डॉक्टर परवानगी देत नाही ...मग ती म्हणते की माझा निरोप तुम्ही त्यांना पोहोचवा .... निरोप काय तर - " दूध तापवून ठेवत जा ... मोलकरणीचे खाडे टिपा ... वगैरे वगैरे वगैरे " - सिनेमा मध्ये ती जे काही सांगते ती अतिशयोक्ती वाटत असेल पण ते शंभर टक्के खरे आहे ... आपली आई किंवा सौ. अगदी अमेरिकेत असल्या तरीही तिथून फोन करून सांगतील की गिझरचे बटन बंद केल्याची खात्री करून घ्या - गॅस सुरू राहील , नाॅब निट बंद करा - लाँड्रीला कपडे देताना मोजून द्या वगैरे वगैरे ...
किती हा possessiveness !! प्रत्येकाला आपली जबाबदारी समजते - तुम्ही थोडेसे डिस्कनेक्ट व्हा - Relax !! ... पण नाही माझ्या माघारी घर चालेल की नाही हा अनाठायी घोर त्यांना सतावत असतो...
▪ ▪ ▪ ▪ ▪
एक एक अतिशय brilliant मुलगा...गणित, सायंस मध्ये नेहमी शंभर पैकी शंभर मिळवणारा.
आय आय टी मद्रास मध्ये सिलेक्ट झाला..नेत्रदीपक यश मिळविले.. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून MBA केले.

अमेरिकेत भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आणि तो तेथे settle झाला.
एका सुंदर तामिळ मुलीशी तो विवाहबद्ध झाला.
त्याने  5 बेडरूमचा बंगला आणि लक्झरी कार विकत घेतल्या.
एखाद्या यशस्वी माणसाकडे जे जे काही असते ते सर्व त्याच्या कडे होते.
असे असताना ही काही वर्षांपूर्वी त्याने प्रथम बायको आणि मुलांना गोळ्या घातल्या मग स्वतः आत्महत्या केली.
California Institute of Clinical Psychology ने ह्या केसचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की , अमेरिकेत जेव्हा मंदी आली तेव्हा ह्या मुलाची नोकरी गेली...घरी बसून पुष्कळ दिवस त्याने बेकारीत काढले... तो अर्ध्या पगारावर काम करायला तयार होता तरी त्याला काम मिळाले नाही.
घराचे हप्ते थकले..घर सोडून रस्त्यावर यावे लागले. अतिशय तुटपुंज्या पैशाच्या शिल्लकीवर उपासमारीत दिवस काढावे लागले.
शेवटी त्याच्या बायकोने आणि त्याने हा आत्मघाती निर्णय घेत पहिले मुलांना मारले नंतर बायको शेवटी स्वतः वर गोळी झाडून जीवनाचा अंत केला.
थोडक्यात ...अपयशाची भिती म्हणायचं की अमेरिकेतच रहायचा अट्टाहास का लोक काय म्हणतील ही भिती? ....माणसाला स्वतःच्या जीवापेक्षा यश महत्वाचे आहे?
◆ ◆ ◆ ◆ ◆
आजकाल तरुण IT मध्ये नोकरीला लागलेली  किंवा इंडस्ट्रीत काम करणारी मंडळी ऑफिस मधून खूप उशिरा घरी येतात...दिवस भर ऑफिस मध्ये काम केल्यावरही त्यांचा घरी छळ सुरूअसतो.कंपनीतून
सतत रात्री बे रात्री मेल पाठवणे..फोन करून माहिती घेणे... What's up, मेसेज पाठवून त्याची उत्तरे मागवणे हे प्रकार चालू असतात.नोकरी जाण्याच्या भीतीने ही लोकं सतत बॉस च्या या माऱ्याने मेटाकुटीला येतात...कमीतकमी 12 तास ड्यूटी व नंतर online राहणे...बॉस च्या संपर्कात राहणे हे आता अत्यंत साधारण बाब झाली आहे.
Targets / Deadline achieve  करायचे आहे असे सतत चे दडपण त्यांच्या मनावर असते...घरी आल्यावर ही मंडळी नीट जेवत नाहीत....कुटुंबा बरोबर नीट बोलत नाहीत.....सतत कसल्यातरी तणावा खाली असतात...रात्र रात्र त्यांना झोप नसते. सुट्टी तर नावालाच असते ... नाटक,सिनेमा, फॅमिली फंक्शन मध्ये ही मंडळी भेदरल्यागत मोबाईल कडे पहात असतात... Bonded labour पेक्षा ही वाईट परिस्थिती आहे ह्या लोकांची...
नोकरीची हमी नाही.युनियन वगैरे यांचा पाठींबा नाही.बॉस ला नाखूष केले तर मध्यरात्री सुद्धा मेल पाठवून "उद्या येताना laptop घेवून या " आणि दुसरी नोकरी शोधा असे सांगितले जाते.या सर्व तणावा मुळे तरुणांच्या जीवनातला आनंद हरपून गेला आहे.लग्न झाल्यावर हनीमून साठी जाताना ऑफिस चा laptop घेवून जाणारी आणि online राहून ऑफिस च्या संपर्कात राहणारी तरुण मुले दिसायला लागली आहेत.
हा प्रकार अत्यंत भयानक आहे.अनेक तरुणांना अगदी २५ /३० वर्षाच्या वयात उच्च रक्तदाब ,मधुमेह ,मानसिक व्याधींनी ग्रासलेले आहे.त्यांना आजूबाजूच्या जगात काय चालले आहे त्याची जाणीव नसते .खेळ आणि मनोरंजन यांना ते मुकलेले असतात.आणि समाजातील खूप मोठ्या संख्येने बुद्धिमान मुलांना या तणावाचा सामना करायला लागत आहे.
प्रायव्हेट सेक्टर मधिल नोकरी म्हणजे वाघाच्या पाठीवर बसणे झाले आहे ... उतरलात तर मृत्यू अटळ आहे ... बसून राहीलात तर क्षणोक्षणी साक्षात मरण यातना भोगणे आहे.
थोडक्यात .... कुटुंब आणि सोशल स्टेटस गमावण्याची भिती ....
◆ ◆ ◆ ◆ ◆
102 Not out सिनेमा पाहिलाय् ?
1950 ते 60 किंवा थोडे त्या अगोदरची पिढी....
मुलं , सुना , नातवंडे परदेशात आपापले आयुष्य जगताहेत ...
ही लोकं मात्र ईथे त्यांच्या साठी दिवस रात्र झुरत आहेत...
माणूस मेला तरी ' सध्या वेळ नाही - उरकून घ्या ' असे परदेशातून येणारे निरोप नवीन राहिले
नाहीत ...
लोक मात्र म्हणतात एकदाची ही प्रॉपर्टी त्यांच्या हवाली केली की आम्ही डोळे मिटायला मोकळे...
खरंच आयुष्य कोणासाठी जगतात ? स्वतः साठी की त्यांच्या साठी ज्यांना आपली ममता म्हणजे अडचण वाटायला लागली आहे.
जुन्या विचाराने - जुन्या संस्कारानी बांधून टाकले आहे...बाकी काही नाही ( ह्याचा अर्थ ते वाईट किंवा चुकीचे आहेत असे अजिबात नाही - फक्त आजच्या काळात थोडे misfit वाटतात एवढेच ! )...शांत आयुष्य जगायचे असेल तर हे जुने विचार वगैरे ह्या पासून  Disconnect होणे गरजेचे आहे.
◆ ◆ ◆ ◆ ◆
पूर्वी नव्हते असे नाही पण आजकालच्या काळात पालकांचा मुलांच्या जीवनात व करीअर मध्ये एवढा हस्तक्षेप झाला आहे की करीअर मुलाचे आहे का पालकांचे हे समजणे कठीण झाले आहे.
पूर्वी जेव्हा फक्त दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होते तेव्हा चांगले कार्यक्रम व उत्तमोत्तम कथा प्रसारित केल्या जात... त्या वेळी प्रसारित केली गेलेली एक गोष्ट माझ्या पुसटशी लक्षात आहे...
     एक पौगंड अवस्थेत असलेला हुशार मुलगा अचानक अबोल होतो ( हल्ली त्याला आपण डिप्रेशन वगैरे म्हणतो ). तर हा पोरगा फक्त घोड्याचे चित्र काढत असतो. पालकांना लक्षात येत नाही...ते त्याला सायकॅट्रीस्ट कडे घेऊन जातात... तो मुलाला बोलते करतो - मुलगा सांगतो - " माझे कुटुंबातील स्थान रेसच्या घोड्यासारखे आहे ... प्रत्येकाला वाटते ते म्हणतील ती रेस मी जिंकावी - परिक्षेत टाॅप करावे - खेळात नंबर काढावा - स्कॉलरशीप परिक्षा टाॅप मध्ये यावे.. मला काय करायचे ते कोणी विचारत घेत नाही.. सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत फक्त धावायचं ...कधी हा क्लास कधी तो क्लास..बस्स फक्त
धावायचं ......"
किती विदारक सत्य आहे .....
समजतच नाही...मुलांची इच्छा नसताना पालक त्यांच्या आयुष्यात गुंतले आहेत...आणि आपल्या मर्जीने कोणी ही जगत नाही... ईथे खरोखर Disconnect होणे गरजेचे आहे.
◆ ◆ ◆ ◆ ◆
भिती , लोभ, लालच, प्रेम , मत्सर ह्या गोष्टीचा *अतिरेक* ह्यात माणसं  गुरफटून जातात आणि ते ना स्वतः आनंदी आयुष्य जगतात ना दुसर्‍याला जगू देतात ... म्हणून प्रत्येकाला त्या पासून Disconnect होणे आवश्यक आहे ...Right to Disconnect हा कायदा अस्तित्वात आला तरी माणूस Disconnect होईलच हे सांगणे अवघड आहे पण मनाचा निग्रह केला तर बर्‍याच अंशी ते घडू शकेल.
ह्या विषयावर मी बर्‍याच मित्रांशी , अभ्यासू वरिष्ठ लोकांशी बोललो आणि त्या अनुषंगाने मला जे लक्षात आले ते असे की तुम्ही जर एक पद्धत (methodology) वापरली तर हे होऊ शकते ...
(अ) Find (शोधा ) -  आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात आणि त्या मुळे तुमच्या आसपासचे लोक ,आप्त वगैरे ही परेशान आहेत... उदा - भिती वगैरे वगैरे
(ब) Fix it (निश्चित करा) - एकदा शोध घेतल्यावर त्याचा क्रम निश्चित करा म्हणजे ज्या गोष्टीचा जास्त प्रभाव आहे तिच्या वर अगोदर काम करणे आवश्यक आहे. नव्वद टक्के केसेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारची काळजी,  भिती हेच प्रमुख कारण असते.
(क) Forget (विसरा ) - देवानंद ह्यांच्या ' हम दोनो ' सिनेमात " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया - *हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया* " हे गाणं ऐकलं की Forget शब्दाचा अर्थ कळेल.
(ड) Forgive (माफी ) - माफ करायला शिका तसेच confess (कबूल) करायला शिका.
(ई) Follow ( शिष्यत्व ) - वरच्या सगळ्या गोष्टी सांगणे सोपे आहे - अमलात आणणे अतिशय अवघड असते ...आणि त्या साठी संत साहित्य, विद्वान लोकांचे चरित्र व विचार follow केले तर Disconnect व्हायला खूप मदत होऊ शकेल.
- - - - - - - - - - - - - -

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार