आताशा मला जमायला लागलंय
*आताशा मला जमायला लागलंय...!*
आयुष्यातल्या
प्रत्येक टप्प्यावर
जे जे मला दुखवत गेले
त्या त्या सगळ्यांना
न दुखावता सोडून देणं
आताशा मला जमायला लागलंय...
संघर्षाच्या
किंवा
वादविवादाच्या क्षणी
वाद न घालता
तेथून दूर निघून जाण्यातच खरी परिपक्वता असते,
माझ्या बरोबर घडणाऱ्या
अनेक वाईट गोष्टींचा
उहापोह करून
त्यात शक्ती खर्ची घालून,
आजुबाजूला
जे जे उत्तम आहे
त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातोय हे जाणवायला लागलंय...
आलेल्या अनुभवांतून
बाहेर पडत
स्वतःला सावरून,
शिकून
मोठं होणं जमायला लागलंय...
कोणत्याही
न पटणार्या गोष्टींवर
काहीही न बोलणे
म्हणजे त्यांना संमती असणे
गरजेचे नाही,
कधी-कधी
काहीही न बोलणं
किंवा
कोणतंही प्रत्युत्तर न देणं...
खूप काही बोलून जातं,
आपण लोकांवर
किंवा
त्यांच्या विचारांवर
बंधनं आणू शकत नाही
पण
आपण स्वतःच्या मनावर मात्र बांध घालू शकतो.
आपण अशा लोकांच्या वागण्याला
किती मनावर घ्यायचे,
त्यांना किती महत्त्व द्यायचं,
त्यांनी बोललेल्या
वाईट साईट गोष्टी
किती डोक्यात साठवून ठेवायच्या
आणि
स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं,
हे ठरवणं गरजेचं असतं,
बऱ्याचदा असे वागणारे
किंवा
बोलणारे लोक
दुसऱ्याबद्दल वाईट बोलताना स्वतःचा हीन दर्जा ही दाखवून देत असतात.
अशा लोकांच्या आधारहीन शब्दांची
आताशा मन मजा घ्यायला लागलंय...
कधीकधी परिस्थितीला
आहे तसंच सोडून देणं
आणि
शांत राहणं सोईचं ठरतं,
लोकांना कुठल्याही गोष्टींचं स्पष्टीकरण देत बसणं
आणि
त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं
बावळट पणाचं आहे, हे कळल्यावर
मी आताशा मला त्या दृष्टीनं घडवायला लागलोय...
मी इतके दिवस
ज्याचा प्रकर्षांने शोध घेत होतो,
ती मनःशांती,
समाधान मला मिळालं
जेव्हा ठरवलं
की मी अशा लोकांपासून लांब राहावे,
जे मला चांगलं म्हणत नाही.
कारण
त्यांच्या दृष्टीने मी जर चांगला नाही
तर मी स्वतःला त्यांच्या साच्यात बसवणे योग्य नाही.
कुठलेही वादविवाद
किंवा
भावना नसलेले संबंध
मला नको आहेत.
समोर दुसऱ्याला चांगलं म्हणून
मागे वाईट वागणार्या,
बोलणार्या,
वरवर संबंध ठेवणार्या
लोकांना आता मी
कटाक्षाने दूर ठेवायला हवं,
हे पटायला लागलंय...
माझ्या स्वतःच्या
आनंदाचा ठेवा
मला सापडलाय
आणि
उशीरा का होईना
पण मी आताशा त्या वाटेवर
समाधानानं पावलं टाकायला लागलोय...
*अाताशा मला समजायला लागलयं हळूहळू....*😌
~ अनामिक
...
Comments
Post a Comment