प्रत्येक क्षण आनंदाने जगा
आडवे धागे -उभे धागे
सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील असं नाही. काही वेळा तुम्हौ बरोबर असून तुम्हाला चुकीचे ठरवलं जाईल. तुम्हाला अस वाटेल की तुम्ही इतरांपेक्षा सरस असून तुमच्याऐवजी इतरांना संधी मिळाली आहे. पण हेही लक्षात घ्या की, ब-याचदा इतरजण तुमच्यपक्षा सरस असतांना संधी तुम्हाला मिळाली आहे.
तुमची स्पर्धा ,तुमचे निकष तुमचे मापदंड हे फक्त तुमच्यासाठी असले पहिजेत. तुम्ही तुमची तूलना इतरांशी करु नका. बरीच प्रलोभने तुम्हाला खुणवतील. सगळेच असं करतात,मग मी का करु नये? किन्वा मी केल तर बिघडलं कुठं?असही तूम्हाला वाटेल. पण अस excuse स्वत:ला देऊ नका. जे काही निकष असतील ते स्वत:ला लावा.
कधी कधी असही होइल,की तूम्हाला असं वाटेल की हे माझ्या बाबतीतच का होतय,हा त्रास मलाच का?
जगात कोट्यवधी लोक असे आहेत की जे तुमच्यपेक्षा कैक्पट अधिक दू:ख भोगतत. त्रास सहन करतात त्या मानाने तुमच्यपक्षा सुखी आसणा -यांची संख्या तुलनेने कमी आहे.
अनेकदा तूम्हाला अपमान सहन करावा लागेल. तुमची चूक नसतांना तुमच्यावर त्याची जबाबदारी येइल. काही लोक स्वत:वरिल प्रकाश झोत टाळण्यासाठी तुमचे नाव घेतील,तूम्हाला लक्ष्य बनवलं जाईल ,पण यामुळे डगमगुन जाऊ नका. ज्या झाडाला फळ अधिक लोक त्यालाच दगड मारतात.
कधी कधी असही होइल की तुमच्यावर,तुमच्या कामावर प्रचंड टीका होइल. कोणी तुमचा दृष्टीकोन समजून घेणार नाहीत,निराश झाल्यासारखं वाटेल.पण निराश होऊ नका.जितक चांगल करता येइल तेवढे करा,मात्र जे अटळ आहे,जे तुमच्या नियन्त्रनाबहेर आहे,ते आहे तस स्विकारा आणि त्यातून मार्ग काढा,यश अपयश या सापेक्ष गोष्टी आहेत एकुण आयुष्याचा आलेख मांडला तर असं लक्षात येत की या दोन्हीना तेवढच महत्व आहे, तर अपयश जीवनाच्या वळणावर एक नवीन वाट उघडून देते,अनेक शालेय परिक्षेत अपयशी झालेली माणसं पुढे आयुष्यात महान खेळाडू,नेते, अभिनेते झाले आहेत त्यामूळे एका अप्यशाने खचून जाऊ नका.
ब-याचदा लोक काय म्हणतील यामुळे आपण जीवनाच्या छोट्या आंनंदला मुकतो .तूम्हाला टपरीवर ऊभं राहुन फक्कड चहा प्यायचा असतो, पावसात पूर पाहताना कणिस खायचा असतो,गणपतीच्या मिरवणूकीट फेटा बांधून मोठा ढोल वाजवायचा असतो पण केवळ मी कोण आहे आणि लोक काय म्हणतील या विचारानेच तुम्ही तुमची इच्छा मारुन टाकतात. एक लक्षात घ्या आयुश्यतून निघुन गेलेला क्षण फिरुन परत येणार नाही हा क्षण म्हणजेच जिवन आहे.
थोडं डोळे उघडून पहिले तर असं लक्षात येते की,हजारो हात तुमच्या साठी राबतायेत ,त्यांनी तुमच्यासाठी रस्ते बनवले आहेत,कोणी अन्न पिक्वतौ आहे,तर कोणी धरण बांधतो आहे. त्यामूळे तुम्ही बिनधास्त रस्त्यावर गाडी चालवत आहत,घरी तूम्हाला जेवन मिळते आहे,पानी मिळते आहे,त्या मोबदल्यात आम्ही जगाला अस काय देत आहोत की जगक्डू न आम्ही यशाची,फायद्याची येवढी अपेक्षा करावी.
कोणी एका शायराने म्हटलं आहे,
"हर किसिको मुक्क्मल जहां नही मिलता,
किसिको जमीं,तो किसिको आस्मान नही मिलता"
तेव्हा निराश न होता प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे.
डॉ धर्मेंद्र मुल्हेरकर,नाशिक
Comments
Post a Comment