आयुर्वेद चिकित्सा
एकवेळ तुम्ही आयुर्वेद चिकित्सा घेऊ नका. पण घ्यायचीच असेल तर ती
नैचरोपैथी अथवा एन.डी. (Naturopathy Diploma)
अशी डिग्री लावलेल्यांकडून तर कधीच घेऊ नका.
बी.ए.एम.एस. ही डिग्री असेल तरच आयुर्वेदिक डॉक्टर समजा.
*गाेमुत्र चिकित्सा देणारे, शिवाम्बू चिकित्सा देणारे, पंचगव्य चिकित्सा देणारे, नैचरोपैथी चिकित्सा देणारे आयुर्वेदिक डॉक्टर नसतात*
--------------------------
साेशल मेडीयावरील आरोग्य सल्ले फक्त सरळ डिलीट करा, मतिभ्रष्ट हाेते.
*साईड इफेक्ट नसतात करुन बघायला काय हरकत आहे अशा गाेंडस गैरसमजूती ने काय हाेते त्याचे दाेन उदाहरणे खाली वाचा*
*(1)* संधीवातासाठी लसणाच्या पाकळ्या उकळून दूध प्या असा एक मेसेज हाेता, उपाय बराेबर हाेता, पण ते बनवायचे किती, प्रमाण किती घ्यायचे, काेणाला चालते हा विचार न करता एका मासिक पाळीमध्ये रक्त जास्त झालेल्या महिलेने ताे प्रयोग संधीवाताचा त्रास जास्त आहे म्हणून केला, रक्तस्रावाचे प्रमाण खूप वाढले गर्भाशय पिशवी काढून टाकावी लागली. *अतिशयोक्ति नाही सत्य घटना आहे*
*(2)* सध्या वजन कमी करण्यासाठी मेथी आेवा धने जिरे असा एक मेसेज पदार्थ बदलून बदलून फिरत असताे, वजन जास्त असलेल्या व पित्ताचा व अल्सरचा त्रास असलेल्या एका व्यक्तिने ताे प्रयोग काही दिवस केला, अल्सर चे प्रमाण वाढले, मुळव्याधीचा त्रास सुरु झाला सरळ आपरेशन करावे लागले.
** - *आयुर्वेद हे फार खोल शास्र आहे आणि ते नैचरोपैथीपेक्षा खूप खूप वेगळे आहे.*
** हिरवे दिसते म्हणून आयुर्वेद होत नाही .
** फेयर अँन्ड लव्हली मध्ये काेरफड टाकली म्हणून ती आयुर्वेदिक हाेत नाही.
** काेलगेट मध्ये लवंग टाकली म्हणून संपुर्ण काेलगेट आयुर्वेदिक आहे असे म्हणता येत नाही.
** चहा पत्तीत सुंठ टाकली म्हणून आयुर्वेदिक चहा म्हणता येणार नाही किंवा ताे सर सकट सर्वांना चालणार नाही.
** फसाफस फेस येणारा शांपू आयुर्वेदिक नसताेच.
*रस्त्यावर वाटेल तिथे, गटारीच्या कडेला, कसल्याही तेलात, स्वच्छता नसलेल्या ठिकाणी वडापाव पाणीपुरी भेळ कसलाही विचार न करता खाल्ली जाते, आजारी पडून डाँक्टरांची औषधी घेताना त्याला आवर्जुन विचारले जाते डॉक्टर या औषधांचा काही साईड इफेक्ट नाही ना?*
---------------------
सैद्धांतिक वापरले नाही तर साईड इफेक्ट हा होतोच. *मीठ - मिरची चवीपूरती खाल्ली तर चांगले जास्त खाल्ले तर काय त्रास हाेताे सर्वांना माहीतच आहे*
** उपवास बस्ती व्यायाम हे आयुर्वेदाने मोजून मापून सांगितले आहे. कसेही केले तर अतिरेक होतो.
** आयुर्वेद शिकायला फुकट ८ वर्ष लागत नसतात.
** आयुर्वेदातील सर्वाधिक गैरसमज नैचरोपैथीमुळे आलेत. पाणी ढोसू ढोसू अंग सुजू लागते तरी *तहान लागेल तेवढेच पाणी प्या* असा सल्ला देणारा वैद्यालाच हजार प्रश्न विचारले जातात.
** मध व गरम पाणी एकत्र स्लो पॉइझन आहे कळेपर्यंत मज्जाक्षय होत आलेला असतो.
** गूळाने प्रमेह होतो सांगितल्यावर धक्का बसतो,
** दही गरम असते विश्वास बसत नाही
-----------------
*नैचरोपैथी आणि आयुर्वेद हे पूर्ण वेगळे आहेत!कि हे कायम लक्षात असू द्या*
*हर्बल म्हणजे आयुर्वेदिक नाही हे ही तितकेच लक्षात असू द्या*
--------------------
मान्यताप्राप्त आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनच आयुर्वेदिक उपचार घ्या, काेणीतरी म्हणत असेल हे आयुर्वेदिक आहे घ्या-असे फुकट सल्ले उपचार घेउ नका.
*मला डॉक्टरांनी बायपास सर्जरी सांगितली आहे, मला मुळव्याधीचा खुप त्रास आहे - खुप रक्त जात आहे काही घरगुती उपाय आहे का? असे प्रश्न आजीबाईच्या बटवा सारख्या ग्रुप मध्ये विचारून स्वताच्या आरोग्याशी खेळू नका*
Comments
Post a Comment