कुसुमाग्रज
*२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस, मराठी गौरव दिवस*
मराठी मातृभाषेने आपल्याला बोलायला शिकविले, लिहायला शिकवले, आपले विचार व्यक्त करायला शिकवले त्या मातृप्रति आपला असलेला आदर, निष्ठा व्यक्त करण्याचा आजचा दिवस. मराठी भाषा ज्यांच्या लेखणीमुळे इतकी समृद्ध झाली ते म्हणजे *विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज* यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.
*कुसुमाग्रंजाचा अल्प परिचय* :
जन्म : २७ फेब्रुवारी १९१२, (आजपासून १०६ वर्षांपूर्वी) पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू : 10 मार्च १९९९ (वयाच्या ८७ व्या वर्षी), नाशिक, महाराष्ट्र.
राष्ट्रीयत्व : भारत
कार्यक्षेत्र : साहित्यकार, नाटककार, कादंबरीकार, पटकथालेखक, समीक्षक, कवी.
कुसुमाग्रजांनी आपले प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथून व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल जे आता जे.एस. रुंगठा माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाते येथून पूर्ण केले. मुंबई विद्यापीठातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
*करियर* :
कुसुमाग्रज एच. पी. टी महाविद्यालयात असताना त्यांच्या कविता ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकातून प्रकाशित व्हायच्या. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी अस्पृशांच्या काळाराम मंदिरच्या प्रवेशाबाबतच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. १९३३ साली कुसुमाग्रजांनी ‘ध्रुव मंडळ’ स्थापन केले आणि ‘नवा मनु’ या वृत्तपत्रासाठी लेखन सुरु केले. याचा वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह *‘जीवन लहरी’* प्रकाशित झाला. १९३४ साली कुसुमाग्रजांनी इंग्रजी आणि मराठी या विषयांमधुन कला शाखेची पदवी संपादन केली.
१९३६ साली कुसुमाग्रजांनी ‘सती सुलोचना’ या चित्रपटासाठी पटकथा लिहून या चित्रपटात एक भूमिकादेखील केली होती. ‘साप्ताहिक प्रभा’, दैनिक प्रभात’, ‘सारथी’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ यांसारख्या वृत्पात्रांसाठी, साप्ताहिकांसाठी कुसुमाग्रज लिहित होते. १९४२ हे वर्ष कुसुमाग्रज यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरले, कारण यावर्षी मराठी साहित्यातील जनक म्हणून ओळखले जाणारे वी. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रज यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला व त्याबद्दल पुढील उद्गार काढले, “त्याचे शब्द सामाजिक असंतोष निर्माण करतात, पण जुन्या जगाला नवीन मार्ग दाखविण्याचा विश्वास निर्माण करतात”. १९४६ साली कुसुमाग्रज यांनी आपली पहिली कादंबरी ‘वैष्णव’ व पहिले नाटक ‘दूरचे दिवे’ लिहिले.
*कुसुमाग्रजांचे लिखित साहित्य* :
अ) *कवितासंग्रह* : १.विशाखा(१९४२) २.हिमरेषा(१९६४) ३.छंदोमयी(१९८२) ४.जीवनलहरी(१९३३) ५.जाईचा कुंज(१९३६) ६.समिधा(१९४७) ७.कणा(१९५२) ८.किनारा(१९५२) ९.मराठी माती(१९६०) १०.वादळवेल(१९६९) ११.रसयात्रा(१९६९) १२.मुक्तायन(१९८४) १३.श्रावण(१९८५) १४.प्रवासी पक्षी(१९८९) १५.पाथेय(१९८९) १६.मेघदूत(१९५६) १७.स्वागत(१९६२) १८.बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज(१९८९) १९. काव्यवाहिनी २०.साहित्यसुवर्णा २१.फुलराणी २२.पिंपळपान २३.चंदनवेल
ब)*कथासंग्रह* : फुलवाली, छोटे आणि मोठे, सतारीचे बोल आणि इतर कथा, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मंजर, आहे आणि नाही, विरामचिन्हे, प्रतिसाद, एकाकी तारा, वाटेवरल्या सावल्या, शेक्सपिअरच्या शोधात, रूपरेषा, कुसुनाग्रंजाच्या बारा कथा, जादूची होडी.
क) *नाटके* : ययाती आणि देवयानी, वीज म्हणली धरतीला, नटसम्राट, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, वैजयंती, कौंतेय, राजमुकुट, आमचे नाव बाबुराव, विदुषक, एक होती वाघीण, आनंद, मुख्यमंत्री, चंद्र जिथे उगवत नाही, महंत, कैकेयी
ड)*एकांकिका* : दिवाणी दावा, देवाचे घर, प्रकाशी दारे, संघर्ष, बेट, नाटक बसत आहे आणि इतर एकांकिका
इ)*कादंबऱ्या* : वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर.
*पुरस्कार आणि सन्मान* :
१. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष (१९६०)
२. ‘मराठी माती’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६०)
३. ‘स्वागत’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६२)
४. ‘हिमरेषा’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६४)
५. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, गोवा अध्यक्ष (१९६५)
६. राम गणेश गडकरी पुरस्कार (१९६५)
७. ‘ययाती आणि देवयानी’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६६)
८. ‘वीज म्हणाली धरतीला’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६७)
९. मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर चे अध्यक्ष (१९७०)
१०. ‘नटसम्राट’ साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९७१)
११. ‘नटसम्राट, साठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९७४)
१२. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ (१९८५)
१३. पुणे विद्यापीठातर्फे D.Litt ही पदवी प्रदान (१९८६)
१४. ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७)
१५. संगीत नाट्य लेखन पुरस्कार (१९८८)
१६. जागतिक मराठी परिषद, मुंबईचे अध्यक्ष (१९८९)
१७. ‘पद्मभूषण’ पुरस्कार (१९९१)
१८. एका ताऱ्याला ’कुसुमाग्रज’ हे नाव दिले. (१९९६ )
सलाम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment