महात्मा ज्योतिराव फुले
******************************** *✹ २८ नोव्हेंबर ✹* *महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन* ******************************** जन्म - ११ एप्रिल १८२७ (कटगुण,सातारा) स्मृती - २८ नोव्हेंबर १८९० (पुणे) महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कटगुण, सातारा येथे झाला. आपला भारत देश हा मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे. या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले. असेच एक थोर महात्मा म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध. हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी 'सत्यशोधक समाज' संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना 'महात्मा' ही उपाधी १८८८ मध्ये बहाल केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता. *बालपण आणि शिक्षण* : जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यात...