Posts

Showing posts from November, 2022

महात्मा ज्योतिराव फुले

******************************** *✹ २८ नोव्हेंबर ✹* *महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन* ******************************** जन्म - ११ एप्रिल १८२७ (कटगुण,सातारा) स्मृती - २८ नोव्हेंबर १८९० (पुणे) महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कटगुण, सातारा येथे झाला. आपला भारत देश हा मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे. या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले. असेच एक थोर महात्मा म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध. हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी 'सत्यशोधक समाज' संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना 'महात्मा' ही उपाधी १८८८ मध्ये बहाल केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता. *बालपण आणि शिक्षण* : जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यात...

नऊ सूत्र".

"नऊ सूत्र". १) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  - कौरव. २) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील."- कर्ण. ३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल."-  अश्वत्थामा. ४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह. ५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन. ६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते."- धृतराष्ट्र. ७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."  - अर्जुन. ८) "प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही."-  शकुनी. ९) "नीति, धर्म आणि नियत या कर्मा...

कैसे कटा 21 से 60

*21 से 60 वर्ष कमाने में व्यस्त रहे।*  *उनके लिए समर्पित एक रचना🙏* *कैसे कटा 21 से 60*  *तक का यह सफ़र,*  *पता ही नहीं चला ।* *क्या पाया, क्या खोया,* *क्यों खोया,* *पता ही नहीं चला !* *बीता बचपन,*  *गई जवानी*  *कब आया बुढ़ापा,*  *पता ही नहीं चला ।* *कल बेटे थे,*  *कब ससुर हो गये,*  *पता ही नहीं चला !* *कब पापा से*  *नानु बन गये,*  *पता ही नहीं चला ।*  *कोई कहता सठिया गये,* *कोई कहता छा गये,*  *क्या सच है,*  *पता ही नहीं चला !* *पहले माँ बाप की चली,* *फिर बीवी की चली,*  *फिर चली बच्चों की,*  *अपनी कब चली,*  *पता ही नहीं चला !* *बीवी कहती*  *अब तो समझ जाओ,*  *क्या समझूँ,*  *क्या न समझूँ,*  *न जाने क्यों,*  *पता ही नहीं चला !*          *दिल कहता जवान हूँ मैं,* *उम्र कहती है नादान हूँ मैं,*  *इस चक्कर में कब*  *घुटनें घिस गये,*  *पता ही नहीं चला !* *झड़ गये बाल,*  *लटक गये गाल,*  *लग गया चश्मा,*  *कब बदली यह सूरत*  *पता ही नहीं ...

२०२४चा महासंग्राम आणि* *नव्या भारताच्या निर्मितीसाठी

*२०२४चा महासंग्राम आणि*  *नव्या भारताच्या निर्मितीसाठी..!* - ज्ञानेश वाकुडकर ••• ('राष्ट्रप्रथम' या वार्षिकांकाच्या प्रथम दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा विशेष लेख.. साभार. संपादक - चंद्रकांत झटाले) ••• राहूल गांधी यांची पदयात्रा जोरात आहे. प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. राहूल गांधी लोकात मिसळत आहेत. गांधी घराण्याचे ग्लॅमर त्यांच्याकडे जन्मजात होते, पण या पदयात्रेमुळे ते लोकनेते होण्याच्या दिशेने निघाले आहेत. या दृष्टीने त्यांचा पुढील प्रवास महत्वाचा असेल. मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर देश एका मोठ्या संकटात सापडला आहे. आज हुकुमशाहीचा धोका समोर स्पष्टपणे दिसतो आहे. पण सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अनर्थाची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. गोवा अधिवेशनात मोदी यांना भाजपाने प्रचार प्रमूख नियुक्त केले होते. मोदी यांच्या दबावापुढे संघ झुकला आणि संजय जोशी यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतून काढले होते. आणि त्याचक्षणापासून पक्षात मोदी यांची मनमानी सुरू झाली. २०१४ला भाजपा सत्तेत आली. मोदी पंतप्रधान झाले. आणि हिंदुत्ववादाच्या नावाने सनातनी हिंदू किंवा गोडसेवादी हिंदूनी देशात...

क्रूर हिंसेमागे कोणता ब्रेन असतो?हिरवा?

🦅🦅🦅क्रूर हिंसेमागे कोणता ब्रेन असतो? हिरवा?  भगवा?  निळा?  पिवळा?... क्रूर मुस्लीम ब्रेन..हिंदू ब्रेन..ख्रिश्चन ब्रेन.. असा काही स्पेशल ब्रेन असतो का? याचं उत्तर "नाही" असं आहे! दिल्लीतल्या हॉटेल अशोक यात्री मध्ये असंच एका स्त्रीचा खून करणारा होता हॉटेल मॅनेजर केशवकुमार आणि हॉटेलचा मालक सुशील शर्मा. या सुशील शर्माची बायको नयना सहानी तिचा खून करून तिचे हात-पाय तोडून तिच्या धडाला आणि हाडांना हॉटेलच्या किचनच्या तंदूरभट्टी मध्ये कोंबून  जाळले जात होते तेव्हा ते  सापडले. एवढ्या क्रूर पद्धतीने खून करणारे हिंदू होते! म्हणजेच,  क्रूर खून करणारे मेंदू फक्त हिंदूंचेच असतात असे नव्हे!! मुंबईमध्ये नीरज ग्रोव्हर मीडिया एक्झिक्यूटिव्ह होता. मारिया मोनिका सुसाईराज नावाची कन्नड अभिनेत्री ईटीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी मुंबईला आली. ती ग्रोव्हरची मैत्रीण बनली पण त्यांच्यात प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर ग्रोव्हरचा खून करून मारिया व तिचा प्रस्तावित पती जोसेफ या दोघांनी मिळून ग्रोव्हरच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे दोघे ख्रिश्चन होते. ...

लाॅ ऑफ ऍट्रॅक्शन

लाॅ ऑफ ऍट्रॅक्शन। हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरोबर पळुन जातील!  १) *कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा* –  - आज दुकानात नोकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”,  - आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा आहे मग आज!” - पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!” - तो माझ्यावर निष्कारण चिडला, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!”  - तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मिळणार!”  बघा, कसलीही, कितीही भयानक समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते,  “ओह! हे असं आहे का?,  अरे! हे असं पण असतं का?  ओके!” आहे त्याचा स्विकार केल्यास नव्याणव टक्के चिंता पळुन जातात.  समजा, एखादा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार? एक उपाय आहे. डोळे बंद करुन, त्या दुखणार्‍या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्र...

मन:शांती हे औषध आहे.

*मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_ *व्यायाम* हे औषध आहे. *सकाळ/संध्याकाळ चालणे* हे औषध आहे. *उपवास* हे औषध आहे. *कुटुंबासोबत जेवण* हे औषध आहे. *हसणे आणि विनोद* हे देखील औषध आहे. *गाढ झोप* हे औषध आहे. *सर्वांशी मिळून वागणे* हे औषध आहे. *आनंदी राहण्याचा निर्णय* हे औषध आहे. *मनातील सकारात्मकता* हे औषध आहे.   *प्रार्थना हा एक चांगला आध्यात्मिक व्यायाम आणि औषध आहे* . *सर्वांचे भले* हे औषध आहे. *इतरांसाठी प्रार्थना* हे औषध आहे. कधी कधी *मौन* हे औषध असते. *प्रेम* हे औषध आहे. *मन:शांती* हे औषध आहे. _आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत_ आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे? *प्रत्येक चांगला मित्र* हे एक परिपूर्ण *मेडिकल स्टोअर* आहे. *निरोगी रहा आणि आनंदी रहा* ❣️ *दिवसाचा आनंद घ्या* ❣️

संपूर्ण आयुर्वेद शॉर्ट मध्ये

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,* हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही! वाचा आणि पालन करा. || शरीराला आवश्यक खनिजं || *🔺कॅल्शिअम* *कशात असतं* शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर *कमतरतेमुळे काय होतं?* हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🌺🌺🌺े *🔺लोह* *कशात असतं?* खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी *कमतरतेमुळे काय होतं?* शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🌺🌺🌺े *🔺सोडिअम* *कशात असतं?* मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं *कमतरतेमुळे काय होतं?* रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. 🌺🌺🌺े *...

राहून गेलं

*राहून गेलं..* *अपघात झाला आणि ती कोमात गेली; तिला उपचार करणाऱ्या डॉक्टर ला फोन केला, नेमका तो डॉक्टर माझा मित्र निघाला, तो म्हणाला अरे Axonal Injury आहे कदाचित vegetative (कायम स्वरूपी कोमात जाणे) होईल, पेशंट सपोर्ट वर आहे aggressive management न करता सपोर्ट काढले तर सुटका होईल ती ची, तू ये मग बोलू आपण...* *प्रकरण गंभीर होते, मन घट्ट करून  axonal injury म्हणजे काय ते शांत पणे ऐकून घेटले त्या नुसार सपोर्ट काढला तर ती निघून जाईल. पण बऱ्याच गोष्टी राहून जातील,* *मी मुंबईत आणि ती नाशिकला आमच्यात खूप बोलायचं बाकी आहे, मुलींना शिक्षणाला पैसा लागेल म्हणून कुठे फिरायला गेलो नाही ते राहिलंय, तिच्या बरोबर जगायचंच राहिलं आहे.* *म्हणून मी सपोर्ट काढणार नाही, आज तिने थोडी पापणी हलवली आहे लढू शेवट पर्यंत...* *त्यांचा निर्णय पक्का होता त्यांनी सपोर्ट चालू ठेवला ती कधीतरी बरी होईल या भरवश्यावर..* *प्रसंग बरंच काही शिकवणारा होता; 20 वर्ष संसार होऊन बायकोशी बोलायचं आणि जगायचं राहून जातं आणि ते बायको ICU मध्ये असतांना लक्ष्यात येतं किती ही दुर्दैवी वास्तविकता....!!* *अमुक एक करायचं होतं पण राहून गेल...

एच एम व्ही

*देवेंद्रजी, पत्रकार एच एम व्ही, चाय-बिस्कुटवाले का झाले यावर जाहिर परिसंवाद घ्याल का ?* *दत्तकुमार खंडागळे* संपादक वज्रधारी, मो. 9561551006 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही पत्रकारांना उद्देशून ते 'Master of voice' असे म्हंटले होते. त्यानंतर लगोलग भाजपाचे आमदार शहा यांनी चाय-बिस्कुटवाले पत्रकार असे न म्हणता त्यांना "एच एम व्ही" असे म्हणण्याचे आवाहन केले. फडणवीसांचे नेतृत्व मानणा-या आयटी सेल वाल्या पिलावळींनीही तीच री पुढे ओढली. विरोधात लिहीणा-या व बोलणा-या पत्रकारांना उद्देशून "एच एम व्ही" म्हणायला सुरूवात केली. देवेंद्रजींनी पत्रकारांना अप्रत्यक्षपणे कुत्र्याचीच उपमा दिली आहे. एच एम व्ही कंपनीने Master of voice या वाक्याशी संबंधीत लोगो प्रसिध्द करताना ग्रामोफोनसोबत कुत्र्याचे चित्र प्रसिध्द केले होते. फडणवीसांना हे वाक्य उच्चारताना तेच सुचितच करायचे होते. खरेतर फडणवीसांचे हे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. इतक्या उंचीवर गेल्यावर त्यांनी सामान्य व सुमार कार्यकर्यांसारखी भाषा वापरणे योग्य नाही. कारण त्यांच्यासारखे जबाबदार लोग जेव्हा बेजबाबदार ...