Posts

Showing posts from June, 2021

अलिप्त होण्यातलं सुख'

वाचनात आलेलं छानसं काही... *'अलिप्त होण्यातलं सुख'* ......... डॉ. अनुराधा पंडितराव                   लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. 'माझी परडी', 'माझी फुलं' ह्या' मी' पणाचा भारी अभिमान वाटे.           एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, 'माझी फुलं' रहात नसून 'त्याची फुलं' होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे 'मी पणा' देखील नकळत देवाला अर्पण होत असे.           खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, 'माझ्या कळ्या' , 'माझी फुलं'. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!          आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझ...

कोणीतरी आहे' ही वृत्ती घातक

' कोणीतरी आहे' ही वृत्ती घातक.  पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला, की  जगातल्या सर्व दुःखांचे मूळ, देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यतः साठविलेले आहे.  या दोन गोष्टींत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला.  पैशाचा विचार करता असे दिसले की, आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही, आणि त्याचा लोभही नाही.  आता दुसर्याला पैसा द्यायचे म्हटले, म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केलाच पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी होईल; नंतर पैसे मिळविणे, आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे.  पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. कारण दुसर्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला,  तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल, आणि दुसर्याला पैसा देण्याची बुद्धी मारील.  म्हणजे परिणाम असा होणार की, दुसर्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणा मात्र आधी नसलेल्या पैशाचा लोभ उत्पन्न झाला. ह्यात दुसर्याचे काम तर नाहीच, आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देहदुःखाच...

एक प्लेट दोस्ती

😄एक प्लेट दोस्ती😋     आज  प्रथमच मी  हॉटेल *मैत्री*  मध्ये एकटी जेवायला गेले.खर तर घरात जेवण तयार होते पण  एकटे जेवायचा कंटाळा आला होता.   उगाssच.. विशेष काही नाही.    मी नेहमी कॉर्नर चे टेबल पकडते, एकतर दुसरे काय ऑर्डर करतात हे कळते आणि मी किती हादडून खाते 😉हे कुणाला दिसत नाही.  नेहमीचा वेटर पाणी टेबला वर ठेवून म्हणाला"काय मॅडमआज एकट्याच?  त्याने मेनू कार्ड हातात दिले.  ( थोड्या वेळाने)  वेटर, "मॅडम ऑर्डर ??" पाणी पिता पिता कुठेतरी त्याचा प्रश्न डोक्यात होताच  "आज एकट्याच!!?" वेटर नेहमीचाच आणि आमच्या मैत्रिणींचा अड्डा बर्‍याच वेळा इथे जमतो त्या मुळे  तो मला बर्‍या पैकी ओळखत असे .    मेनू कार्ड  त्याच्या हातात देवून म्हणाले,  *एक प्लेट दोस्ती* मी थोडे खोचक पणे  सांगितले  " नक्की मॅडम" त्याने मात्र मिश्किल पणे हसत उत्तर दिले. .  थोड्या वेळाने हातात मोठी स्पेशल महाराजा थाळी घेऊन तो आला म्हणाला,  मॅडम,  "मैत्री स्पेशल".   ह्या थाळी च्या साम्राज्यात आपले ...

सूर्यनमस्कार

*सूर्यनमस्कार : - आरोग्य चमत्कार!!! सूर्यनमस्कार : - कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.... एका सुर्यनमस्काराने सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा. संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, बांधेसूद , सुडौल झालेले नक्कीच दिसाल.… ३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट....… ३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास बघा बरं : - वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज ,  टेनिस= २३२ कॅलरीज,  बास्केट बॉल= २६५ कॅलरीज, बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज,  फुट बॉल=२९८ कॅलरीज,  जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज, रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज,  धावणे= ४१४ कॅलरीज,  #सूर्यनमस्कार= #४१७कॅलरीज. वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..? ‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत....’       कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा  वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अति उत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत त...

जिवनातील "परतफेड

 "परतफेड" आणि उरलेले आयुष्य आनंदात कसे जगावे, तर वाचून पहाच* *कसे आहात..?"* *एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला.., आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो..* *तो म्हणाला.. "भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधी सुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."* *त्यानंतर त्याने जे काही सांगितलं.. त्यामुळे माझा अंतरबाह्य असा कायापालट झाला..!* *"त्याने काय सांगितलं..??"* *तो शांतपणे म्हणाला.. "की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाही किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्यामुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"* *"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी.."* *जसं तुमचा आयुष्यात अचानक तुमचा जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा ...

आपल्याला दुखावलं

🙏🏻 एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला.. कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना  वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच ! भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो.. आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.  त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.  आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या हो...

विंटेज

*विंटेज* माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळस धरायला सुरुवात केली आहे. 5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खर तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली.. एकटीच....  आता मी माझं रुटीन सेट करून घेतलंय.. सकाळी जरा लवकरच उठतो,त्याच काय आहे मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात यायला जरा उशीरच होतो त्यांना म्हणुन सकाळी चहा बरोबर जरा गप्पा पण होतील असं मला वाटायचं.. हो वाटायच.. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत.. नाही नाही गैरसमज करून घेऊ नका सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात तसे काही माझे मुलगा किंवा सुन नाहियेत... वडिलांची आणि सासर्‍यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात.. माझी तक्रार काही नाही.. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली म्हणुन चहा करायला घेतला पण नेमकं दूध उतू गेलं  सगळा ओटा खराब झाला..सुन नाराज झाली.. मला काही बोलली नाही पण तीच्या हालचाली मधून ते स्पष्ट जाणवत होत.. त्या दिवशी मुलानी लगेच फर्मान काढले.."बाबा उद्यापासून आमच आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रूम मधे" असाच एकदा नातवाला एकदा म्हणालो चल तुला...